शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

लॉकडाऊन झाल्याने बँकांचे हप्ते भरायचे कसे? बँकेकडून तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:10 IST

--------- कोरोनाने घटवले उत्पन्न: कर्जहप्ता भरण्याची भेडसावते चिंता लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: हॉटेलसाठी कर्ज काढले होते, कोरोनाने टाळेबंदी लादली. ...

---------

कोरोनाने घटवले उत्पन्न: कर्जहप्ता भरण्याची भेडसावते चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: हॉटेलसाठी कर्ज काढले होते, कोरोनाने टाळेबंदी लादली. चांगले सुरू असलेले हॉटेल बंद ठेवावे लागले, कर्जाचे हप्ते थकले, बँक मागे लागली आहे. त्यामुळे आता करायचे काय ? असा प्रश्न कर्जदारांना सतावत आहे.

कोरोनाच्या महिनाभर आधीच मालासाठी कर्ज घेतले. माल आला, पेमेंट केले आणि टाळेबंदी सुरू झाली. सगळा माल खराब झाला. कर्जाचे हप्ते देता येईना, मालही विकता येईना अशी स्थिती आहे. सारख्या नोटिसा येत आहेत.

नोकरी मिळाली,लग्न झाले, फ्लँट घेतला. मोठे कर्ज काढले. पगार चांगला असल्याने हप्त्यांची काळजी नव्हती. पण कोरोना आला. दोन चार महिन्यातच नोकरी गेली. पगार बंद झाला. हप्ते थकले. बँक बहुधा आता घरावर जप्ती आणणार असे दिसते आहे.

पहिले उदाहरण हॉटेलचालकाचे, दुसरे एका व्यापार्याचे तर तिसरे आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याचे. असे फक्त पुण्यातच लाखापेक्षा जास्त कर्जदार आहेत. अनेकांची हॉटेल बंद झाली, दुकान बंद करावे लागले व नोकरी कितीजणांची गेली याची गणतीच नाही.

ज्या बळावर कर्ज काढण्याचे धाडस केले ते ऊत्पन्नच राहिले नाही. पण कर्ज कायम राहिले. त्याचे हप्ते व्याजासह वाढतच राहिले. यातून बाहेर कसे पडायचे, हा आर्थिक अडचणीचा चक्रव्युह भेदायचा तरी कसा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. काहीजण धडाडी दाखवत बाहेर पडतात तर काही खचून जात स्वतःचे, कुंटुबाचेही बरंवाईट करून घेतात.

कर्ज देणाऱ्या बँकांना या स्थितीशी काहीही देणेघेणे नाही. सर्व बँकांची कर्जदारांची एकत्रित नोंदही नाही, प्रत्येक बँक आपापल्या कर्जदारांना नोटिसा पाठवून हप्ता जमा करण्याचा तगादा लावत आहे, फार हप्ते थकले तर जप्तीसारखी कारवाईचा करत आहे. बँकाकडून किमान नोटिसांसारखी कायदेशीर कारवाई तरी होते, खासगी वित्तीय कंपन्या, तर गुंडांनाच वसुली अधिकारी बनवून वसुली करत आहे.

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात रिझर्व्ह बँकेने ३ महिने वसुली करू नका असा आदेश काढला. त्यात पुन्हा ३ महिने वाढ केली. कोरोनाने बिघडलेली आर्थिक स्थिती आहे तशीच आहे, सवलत मात्र बंद झाली. त्यामुळे वसुलीसाठी सर्वच बँका हिरिरीने पुढे झाल्यात.

नोटिसा पाठवून, कारवाया करून कर्जदारांचे मानसिक स्वास्थ्य घालवत आहेत.