शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी किती वेळा सांगायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, पुणे- नाशिकसह अन्य राष्ट्रीय महामार्गांची कामे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. यापूर्वी देखील रखडलेल्या कामांचा आढावा घेतला, तरी प्रोजेक्ट पूर्ण होत नाही. किती वेळा सांगायचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करा, अशा कडक शब्दांत गुरूवारी पुण्यात आढावा बैठकीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरू असलेल्या पुण्यात पालखी मार्गांच्या कामाचा आढावा गडकरी यांनी एका खासगी हॉटेलमध्ये घेतला. पुणे विभागातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या प्रकल्पांच्या सद्य:स्थितीचा गुरूवार (दि.26) रोजी पुण्यात आढावा घेतला. या बैठकीला नॅशनल हायवेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, एखादा प्रोजेक्ट काही कारणास्तव लांबला तर खर्चात वाढ होते. या दोन्ही मार्गांचे भूसंपादन तातडीने पूर्ण करा. गरज असल्यास अधिकाऱ्यांनी वेळोवळी बैठका घेऊन विषय मार्गी लावा. केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग विकासासाठी राज्याला विशेष प्राधान्य दिले आहे. मोठ्या प्रमाणात कामाांना सुरुवात झाली आहे. ही कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. परत परत सांगोतय काही अडचण असेल तत्काळ सांगा, मात्र कोणताही प्रकल्प रखडता कामा नये. पुणे-सातारा महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग, दोन्ही पालखी मार्ग, चांदणी चौकातील ब्रीजचे काम तत्काळ मार्गी लावण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा.

पालखी मार्ग हा लोकांच्या श्रध्देचा विषय असल्यामुळे या कामाला निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प करा. केेंद्रशासनाने राष्ट्रीय महामार्गासाठी ऐंशी टक्के जमीन अधिग्रहित केल्यानंतर कामाला सुरुवात करावी हा नियम असल्यामुळे प्रत्येक महामार्गावर या नियमांच्या आधारे आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. केंद्रशासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे.

------

भूसंपादनचे साडेपाचशे कोटींचे वाटप

जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांच्याकरिता जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत तब्बल साडेपाचशे कोटीं रुपयांचे वाटप पाच महिन्यांमध्ये केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गडकरी यांना दिली. राहिलेल्या प्रकल्पांचे ही तातडीने वाटप करण्याच्या सूचना गडकरी यांनी केल्या.