शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी किती वेळा सांगायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, पुणे- नाशिकसह अन्य राष्ट्रीय महामार्गांची कामे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. यापूर्वी देखील रखडलेल्या कामांचा आढावा घेतला, तरी प्रोजेक्ट पूर्ण होत नाही. किती वेळा सांगायचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करा, अशा कडक शब्दांत गुरूवारी पुण्यात आढावा बैठकीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरू असलेल्या पुण्यात पालखी मार्गांच्या कामाचा आढावा गडकरी यांनी एका खासगी हॉटेलमध्ये घेतला. पुणे विभागातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या प्रकल्पांच्या सद्य:स्थितीचा गुरूवार (दि.26) रोजी पुण्यात आढावा घेतला. या बैठकीला नॅशनल हायवेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, एखादा प्रोजेक्ट काही कारणास्तव लांबला तर खर्चात वाढ होते. या दोन्ही मार्गांचे भूसंपादन तातडीने पूर्ण करा. गरज असल्यास अधिकाऱ्यांनी वेळोवळी बैठका घेऊन विषय मार्गी लावा. केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग विकासासाठी राज्याला विशेष प्राधान्य दिले आहे. मोठ्या प्रमाणात कामाांना सुरुवात झाली आहे. ही कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. परत परत सांगोतय काही अडचण असेल तत्काळ सांगा, मात्र कोणताही प्रकल्प रखडता कामा नये. पुणे-सातारा महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग, दोन्ही पालखी मार्ग, चांदणी चौकातील ब्रीजचे काम तत्काळ मार्गी लावण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा.

पालखी मार्ग हा लोकांच्या श्रध्देचा विषय असल्यामुळे या कामाला निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प करा. केेंद्रशासनाने राष्ट्रीय महामार्गासाठी ऐंशी टक्के जमीन अधिग्रहित केल्यानंतर कामाला सुरुवात करावी हा नियम असल्यामुळे प्रत्येक महामार्गावर या नियमांच्या आधारे आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. केंद्रशासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे.

------

भूसंपादनचे साडेपाचशे कोटींचे वाटप

जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांच्याकरिता जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत तब्बल साडेपाचशे कोटीं रुपयांचे वाटप पाच महिन्यांमध्ये केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गडकरी यांना दिली. राहिलेल्या प्रकल्पांचे ही तातडीने वाटप करण्याच्या सूचना गडकरी यांनी केल्या.