शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

... तर आदिवासी स्वसंरक्षण कसे करू शकतील?

By admin | Updated: December 22, 2014 23:29 IST

भीमाशंकर अभयारण्यात राहणारा आदिवासी पिढ्यान्पिढ्या येथील जंगलात राहत आहे. जंगलातील कंदमुळे खाऊन शिकारी करून हा आदिवासी समाज वाढला

भीमाशंकर : भीमाशंकर अभयारण्यात राहणारा आदिवासी पिढ्यान्पिढ्या येथील जंगलात राहत आहे. जंगलातील कंदमुळे खाऊन शिकारी करून हा आदिवासी समाज वाढला आहे. या लोकांनी जंगल राखले, प्राणी वाढवले. जंगलात फिरताना त्यांच्याकडे स्वसंरक्षणासाठी कुऱ्हाड, कोयते नसतील, तर ते त्यांचे स्वसंरक्षण कसे करू शकतील? वन विभागाने आदिवासी शेतकऱ्यांना अटक करून त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणली असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई कर्णिक यांनी सांगितले.कुसुमताई कर्णिक गेली ३५ वर्षे आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात काम करीत आहेत. भीमाशंकर अभयारण्य घोषित झाल्यापासून येथील गावांच्या हक्कासाठी त्यांनी लढा दिला आहे. अभयारण्यातील गावे उठवली जाऊ नयेत, यासाठी त्यांनी आंदोलने केली आहेत. पिंपरगणे येथील पाच शेतकऱ्यांना शिकारीसाठी जात असल्याप्रकरणी अटक करण्यात असल्याचे त्यांना समजताच या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी कुसुमताई कर्णिक यांनी घोडेगाव येथे येऊन येथील ग्रामस्थांशी चर्चा केली. या वेळी कुसुमताई कर्णिक म्हणाल्या, की जंगलात राहणाऱ्या माणसाला जंगलाचे कायदे चांगले समजतात. त्यामुळे जंगलात राहणारा आदिवासी शिकार करतो, यात चूक मानता येणार नाही. कायदे आत्ता झाले आहेत. हे आदिवासी पिढ्यान्पिढ्या जंगलात राहत आहेत. जंगलातील कंदमुळे खाऊन शिकारी करून हा आदिवासी समाज वाढला आहे. या आदिवासींनीच जंगल राखले, प्राणी वाढवले.शासन कु ऱ्हाडबंदी, कोयताबंदी करेल, पण जंगलात राहणाऱ्या माणसाकडे ही हत्यारे पाहिजेतच. शहरात कोणी कुऱ्हाड, कोयता घेऊन फिरले तर ठीक नाही; मात्र जंगलात राहणाऱ्या माणसाकडे ही हत्यारे नसतील, तर तो त्याचे संरक्षण करू शकत नाही. जंगलात फिरताना झाड आडवं आलं, तर त्याची फांदी तोडावीच लागते. भीमाशंकर अभयारण्यात असणारी गावे पूर्वीपासून आहेत. येथील गावांना शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. अभयारण्य जाहीर झाल्यानंतर येथील गावांना उठवण्याचे कारस्थान चालले होते. परंतु, आम्ही ते हाणून पाडले. लोक स्वत:हून जंगलातून निघून जावेत, यासाठी वन विभाग अशा प्रकारे त्रास देत आहे. महिला कोयता घेऊन फिरल्या, तर त्यांचे कोयते जप्त केले जातात, हा कोणता कायदा. पिंपरगणे गावाजवळच वाघोबाचे देऊळ आहे. वाघाबरोबरच राहायचे तर कसे राहावे, याची चांगली समज या लोकांमध्ये आहे. वन विभागाने ही कारवाई करून त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणली आहे, असे कुसुमताई कर्णिक म्हणाल्या. (वार्ताहर)