शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

... तर आदिवासी स्वसंरक्षण कसे करू शकतील?

By admin | Updated: December 22, 2014 23:29 IST

भीमाशंकर अभयारण्यात राहणारा आदिवासी पिढ्यान्पिढ्या येथील जंगलात राहत आहे. जंगलातील कंदमुळे खाऊन शिकारी करून हा आदिवासी समाज वाढला

भीमाशंकर : भीमाशंकर अभयारण्यात राहणारा आदिवासी पिढ्यान्पिढ्या येथील जंगलात राहत आहे. जंगलातील कंदमुळे खाऊन शिकारी करून हा आदिवासी समाज वाढला आहे. या लोकांनी जंगल राखले, प्राणी वाढवले. जंगलात फिरताना त्यांच्याकडे स्वसंरक्षणासाठी कुऱ्हाड, कोयते नसतील, तर ते त्यांचे स्वसंरक्षण कसे करू शकतील? वन विभागाने आदिवासी शेतकऱ्यांना अटक करून त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणली असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई कर्णिक यांनी सांगितले.कुसुमताई कर्णिक गेली ३५ वर्षे आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात काम करीत आहेत. भीमाशंकर अभयारण्य घोषित झाल्यापासून येथील गावांच्या हक्कासाठी त्यांनी लढा दिला आहे. अभयारण्यातील गावे उठवली जाऊ नयेत, यासाठी त्यांनी आंदोलने केली आहेत. पिंपरगणे येथील पाच शेतकऱ्यांना शिकारीसाठी जात असल्याप्रकरणी अटक करण्यात असल्याचे त्यांना समजताच या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी कुसुमताई कर्णिक यांनी घोडेगाव येथे येऊन येथील ग्रामस्थांशी चर्चा केली. या वेळी कुसुमताई कर्णिक म्हणाल्या, की जंगलात राहणाऱ्या माणसाला जंगलाचे कायदे चांगले समजतात. त्यामुळे जंगलात राहणारा आदिवासी शिकार करतो, यात चूक मानता येणार नाही. कायदे आत्ता झाले आहेत. हे आदिवासी पिढ्यान्पिढ्या जंगलात राहत आहेत. जंगलातील कंदमुळे खाऊन शिकारी करून हा आदिवासी समाज वाढला आहे. या आदिवासींनीच जंगल राखले, प्राणी वाढवले.शासन कु ऱ्हाडबंदी, कोयताबंदी करेल, पण जंगलात राहणाऱ्या माणसाकडे ही हत्यारे पाहिजेतच. शहरात कोणी कुऱ्हाड, कोयता घेऊन फिरले तर ठीक नाही; मात्र जंगलात राहणाऱ्या माणसाकडे ही हत्यारे नसतील, तर तो त्याचे संरक्षण करू शकत नाही. जंगलात फिरताना झाड आडवं आलं, तर त्याची फांदी तोडावीच लागते. भीमाशंकर अभयारण्यात असणारी गावे पूर्वीपासून आहेत. येथील गावांना शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. अभयारण्य जाहीर झाल्यानंतर येथील गावांना उठवण्याचे कारस्थान चालले होते. परंतु, आम्ही ते हाणून पाडले. लोक स्वत:हून जंगलातून निघून जावेत, यासाठी वन विभाग अशा प्रकारे त्रास देत आहे. महिला कोयता घेऊन फिरल्या, तर त्यांचे कोयते जप्त केले जातात, हा कोणता कायदा. पिंपरगणे गावाजवळच वाघोबाचे देऊळ आहे. वाघाबरोबरच राहायचे तर कसे राहावे, याची चांगली समज या लोकांमध्ये आहे. वन विभागाने ही कारवाई करून त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणली आहे, असे कुसुमताई कर्णिक म्हणाल्या. (वार्ताहर)