शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

उच्चदाब विद्युत तारांखाली घरे

By admin | Updated: December 19, 2014 01:57 IST

नियमानुसार उच्चदाब विद्युत मनोऱ्यांपासून दोन्ही बाजूस साडेआठ मीटर जागा सोडून बांधकाम करावे लागते. परंतु आधीच अनधिकृत बांधकामांना ऊत आला

नीलेश जंगम ल्ल पिंपरीअति उच्च दाब वाहिन्यांच्या आजूबाजूला घरे उभारून हजारो नागरिक मृत्यूच्या छत्रछायेत राहत आहेत. वादळी वारा, पावसाळ्यात या वाहिन्या तुटल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, अशी स्थिती मोरेवस्ती-चिखली परिसरात निर्माण झाली आहे.नियमानुसार उच्चदाब विद्युत मनोऱ्यांपासून दोन्ही बाजूस साडेआठ मीटर जागा सोडून बांधकाम करावे लागते. परंतु आधीच अनधिकृत बांधकामांना ऊत आला असताना यात भर म्हणजे मनोऱ्याच्या बाजूला मनोऱ्यावरील उच्चदाब विद्युत वाहिनीखाली लोकांनी घरे बांधली आहेत. घराच्या छतावर पत्रा असल्याने धोकादायक परिस्थिती आहे.शिवरकर चौक ते साने चौक या विकसित आराखड्यातील २४ मीटर रस्त्याला आणि अष्टविनायक चौक ते चिखली-आकुर्डी या १८ मीटर चिंचेचा मळा रस्त्यावरुन विद्युत मनोऱ्याची रांग गेली आहे. वाहिन्यांची रांग गेल्याने त्या वेळी शेतकऱ्यांना मोबदला देऊन जागेचा ताबा घेण्यात आला. या मनोऱ्याच्या रांगेच्या दोन्ही बाजूला ८०० ते १२०० मीटर लांबीच्या बसक्या घरांच्या सोसायट्या, गल्ल्या आहेत. संतकृपा हौसिंग सोसायटी ते श्री गणेश कॉलनीपर्यंत जवळपास ५० सोसायट्या आहेत. या सर्व सोसायट्यांतील रहिवाशांची संख्या सुमारे ४० हजार इतकी आहे. लांबच लांब सोसायटीच्या गल्ल्या असल्याने मनोऱ्यांच्या रांगेखाली रस्ता तयार करण्यात आला. यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटला; परंतु त्यालगत बांधकाम करीत लोकांनी जोखीम पत्करली आहे.मनोऱ्यांच्या खालून जाणारा रस्ता काही ठिकाणी २५ फुटी, ३० फुटी, तर काही ठिकाणी ५० फुटांइतका आहे. रस्ता झाल्याने वर्दळ वाढू लागली आहे. रस्त्यालगत राहणाऱ्या लोकांनी उत्पन्नाचे साधन म्हणून रस्त्याच्या बाजूची भिंत पाडून त्या ठिकाणी शटर बसविले आहे. चार पत्रे टाकून दुकाने थाटली. काही लोक स्वत: दुकान चालवतात, तर काहींनी भाड्याने दिली आहेत. काही लोकांनी तर घराच्या बाजूला तिन्ही बाजूने पत्रे ठोकून वरुन पत्र्याचे छत तयार करून दुकाने थाटली आहेत. यामुळे रस्त्याची रुंदी कमी-जास्त होत गेली. बांगड्या, चप्पल, किराणा, केश कर्तनालय, मोबाइल, भाजीविक्री, इस्त्री, स्टेशनरी, पानटपरी, डेअरी, लेडीज शॉपी, पार्लर अशा स्वरूपाची ३०० हून अधिक दुकाने या रस्त्यालगत मनोऱ्यांच्या तारांच्या खालीच थाटली आहेत. पावसाळ्यात येथे दुकानाच्या पत्र्यांमध्ये वीज प्रवाह असतो. छत्री घेऊन चाललेल्या व्यक्तीच्या छत्रीला सुद्धा विजेचा धक्का बसतो.इतकी धोकादायक परिस्थिती असतानाही थोडेफार पैसे कमविण्याच्या लालसेपोटी लोकांनी स्वत:चा जीवही धोक्यात घातला आहे.