शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
2
रुपयाची ऐतिहासिक घसरण! डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ९० च्या खाली, तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?
3
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
4
किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर
5
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
6
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
7
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
8
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
9
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
10
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
11
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
12
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
13
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
14
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
15
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
16
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
17
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
18
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
19
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
20
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
Daily Top 2Weekly Top 5

उच्चदाब विद्युत तारांखाली घरे

By admin | Updated: December 19, 2014 01:57 IST

नियमानुसार उच्चदाब विद्युत मनोऱ्यांपासून दोन्ही बाजूस साडेआठ मीटर जागा सोडून बांधकाम करावे लागते. परंतु आधीच अनधिकृत बांधकामांना ऊत आला

नीलेश जंगम ल्ल पिंपरीअति उच्च दाब वाहिन्यांच्या आजूबाजूला घरे उभारून हजारो नागरिक मृत्यूच्या छत्रछायेत राहत आहेत. वादळी वारा, पावसाळ्यात या वाहिन्या तुटल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, अशी स्थिती मोरेवस्ती-चिखली परिसरात निर्माण झाली आहे.नियमानुसार उच्चदाब विद्युत मनोऱ्यांपासून दोन्ही बाजूस साडेआठ मीटर जागा सोडून बांधकाम करावे लागते. परंतु आधीच अनधिकृत बांधकामांना ऊत आला असताना यात भर म्हणजे मनोऱ्याच्या बाजूला मनोऱ्यावरील उच्चदाब विद्युत वाहिनीखाली लोकांनी घरे बांधली आहेत. घराच्या छतावर पत्रा असल्याने धोकादायक परिस्थिती आहे.शिवरकर चौक ते साने चौक या विकसित आराखड्यातील २४ मीटर रस्त्याला आणि अष्टविनायक चौक ते चिखली-आकुर्डी या १८ मीटर चिंचेचा मळा रस्त्यावरुन विद्युत मनोऱ्याची रांग गेली आहे. वाहिन्यांची रांग गेल्याने त्या वेळी शेतकऱ्यांना मोबदला देऊन जागेचा ताबा घेण्यात आला. या मनोऱ्याच्या रांगेच्या दोन्ही बाजूला ८०० ते १२०० मीटर लांबीच्या बसक्या घरांच्या सोसायट्या, गल्ल्या आहेत. संतकृपा हौसिंग सोसायटी ते श्री गणेश कॉलनीपर्यंत जवळपास ५० सोसायट्या आहेत. या सर्व सोसायट्यांतील रहिवाशांची संख्या सुमारे ४० हजार इतकी आहे. लांबच लांब सोसायटीच्या गल्ल्या असल्याने मनोऱ्यांच्या रांगेखाली रस्ता तयार करण्यात आला. यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटला; परंतु त्यालगत बांधकाम करीत लोकांनी जोखीम पत्करली आहे.मनोऱ्यांच्या खालून जाणारा रस्ता काही ठिकाणी २५ फुटी, ३० फुटी, तर काही ठिकाणी ५० फुटांइतका आहे. रस्ता झाल्याने वर्दळ वाढू लागली आहे. रस्त्यालगत राहणाऱ्या लोकांनी उत्पन्नाचे साधन म्हणून रस्त्याच्या बाजूची भिंत पाडून त्या ठिकाणी शटर बसविले आहे. चार पत्रे टाकून दुकाने थाटली. काही लोक स्वत: दुकान चालवतात, तर काहींनी भाड्याने दिली आहेत. काही लोकांनी तर घराच्या बाजूला तिन्ही बाजूने पत्रे ठोकून वरुन पत्र्याचे छत तयार करून दुकाने थाटली आहेत. यामुळे रस्त्याची रुंदी कमी-जास्त होत गेली. बांगड्या, चप्पल, किराणा, केश कर्तनालय, मोबाइल, भाजीविक्री, इस्त्री, स्टेशनरी, पानटपरी, डेअरी, लेडीज शॉपी, पार्लर अशा स्वरूपाची ३०० हून अधिक दुकाने या रस्त्यालगत मनोऱ्यांच्या तारांच्या खालीच थाटली आहेत. पावसाळ्यात येथे दुकानाच्या पत्र्यांमध्ये वीज प्रवाह असतो. छत्री घेऊन चाललेल्या व्यक्तीच्या छत्रीला सुद्धा विजेचा धक्का बसतो.इतकी धोकादायक परिस्थिती असतानाही थोडेफार पैसे कमविण्याच्या लालसेपोटी लोकांनी स्वत:चा जीवही धोक्यात घातला आहे.