शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांच्या जागेवर बनताहेत गृहसंकुले

By admin | Updated: August 13, 2014 04:35 IST

अनेक उद्योजकांनी कारखान्यांसाठी घेतलेल्या मोक्याच्या जागांवर आलिशान गृहप्रकल्प, व्यापारी संकुल उभारण्यास प्रारंभ केला

संजय माने, पिंपरीअनेक उद्योजकांनी कारखान्यांसाठी घेतलेल्या मोक्याच्या जागांवर आलिशान गृहप्रकल्प, व्यापारी संकुल उभारण्यास प्रारंभ केला. औद्योगिक क्षेत्राचे निवासी क्षेत्रात रूपांतर करण्याची कायद्यात तरतूद आहे. त्याचा फायदा उठवला. अनेक बड्या उद्योजकांनी कामगारांना कामावरून कमी करून उत्पादन प्रकल्प अन्यत्र हलविले. कारखान्याच्या जागांवर इमारतीचे उंच इमले उभारले. औद्योगिकचे निवासी क्षेत्रात रूपांतर करून त्यांनी बांधकाम क्षेत्रातही पदार्पण केले. या बदलात लाखो कामगार विस्थापित झाले आहेत.औद्योगिकचे निवासी क्षेत्रात रूपांतर करण्याची कायद्यातील तरतूद उद्योजकांच्या पथ्यावर पडली आहे. गेल्या दहा वर्षांत त्याचा अनेक उद्योजकांनी फायदा उठवला आहे. आतापर्यंत सुमारे १२० एकर जागेचे औद्योगिकमधून निवासी क्षेत्रात रूपांतर करण्यात आले आहे. मुंबई-पुणे महामार्गालगतच्या मोक्याच्या कारखान्यांच्या जागेवर असेच शॉपिंग मॉल, हॉटेल असे प्रकल्प उभारण्याचे उद्योजकांचे प्रयोजन आहे. विकास नियंत्रण नियमावली आणि शहराच्या विकास आराखड्याचे नियोजन करताना, अशाच प्रकारे उद्योजकांचे हित साधण्याचा प्रयत्न झाला आहे. पूर्वी दाट लोकवस्तीच्या भागात औद्योगिक क्षेत्र घोषित कसे केले. असा प्रश्न सहज कोणालाही पडल्याशिवाय राहात नाही. शहरातील औद्योगिक भूखंडावर अधिमूल्य आकारून निवासी अथवा व्यावसायिक बांधकाम करण्यास परवानगी देण्याचा निर्णय २००४ मध्ये शासनाने घेतला. त्याबाबतचा अध्यादेश महापालिकेस प्राप्त होताच, तीन वर्षांत महापालिकेने ११ प्रकरणांना मंजुरी दिली. औद्योगिकचे निवासी वापरात रूपांतर करताना विशिष्ट अधिमूल्य आकारण्यात येत होते. दहा टक्के अधिमूल्य आकारण्याची तरतूद होती. मात्र प्रकल्प पूर्णत्वास आले, तरी महापालिकेला सुविधा क्षेत्रासाठी दहा टक्के जागा देण्यास विलंब केला गेला. महापालिकेला १० हजार ८७४ चौरस मीटर जागा ताब्यात मिळाली आहे. उर्वरित जागा ताब्यात घेण्याचे अद्याप प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेने १७ ठिकाणच्या औद्योगिक भूखंडाचा निवासी वापर करण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये सर्व्हे क्रमांक ४२ ७०, ३८७६, ५७६३, ५८४२, २१०, २०९, ३३, ३४, १४२, १७१, १७२, १७३, ११८१, ११८२, २९ या ठिकाणच्या कंपन्यांच्या जागांचे निवासी क्षेत्रात रूपांतर झाले आहे. शासनाचे हे धोरण उद्योजकांसाठी लाभदायक ठरले असले तरी कामगार वर्गासाठी मात्र नुकसानकारक ठरू लागले आहे. या जागेवरील कंपन्या स्थलांतरित झाल्या. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या हातचा मात्र रोजगार गेला.