शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

ग्रामीण भागात हॉटेल व ढाबे बिनदिक्कत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:10 IST

नीरा : एकीकडे कोरोनाचे सावट गंभीर होत असताना दुसरीकडे शासनाचे नियमच लोकांपर्यंत न पोहोचल्याने शासन राबवत असलेला मिनी लॉकडाऊन ...

नीरा : एकीकडे कोरोनाचे सावट गंभीर होत असताना दुसरीकडे शासनाचे नियमच लोकांपर्यंत न पोहोचल्याने शासन राबवत असलेला मिनी लॉकडाऊन केवळ चेष्टेचा विषय ठरत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व हॉटेल्स, ढाबे बंद ठेवण्याचे आदेश दिलेले असतानाही ग्रामीण भागात मात्र सर्रासपणे हॉटेल्स व ढाबे सुरू आहेत. ‘‘आम्ही काय करू? आम्हाला सांगितलेच नाही बंद ठेवायला.’’ असे म्हणत हॉटेलचालक बेफिकिरी व्यक्त करत आहेत तर प्रशासकीय उदासीनतेने मिनी लॉकडाऊन ओपनच राहिला आहे.

जिल्हा प्रशासनाने शनिवारपासून मिनी लॉकडाऊन जाहीर करत हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. फक्त पर्सल किंवा घरपोच सेवा रात्री अकरापर्यंत देता येणार होत्या. पण ग्रामीण भागात याचा वेगळा अर्थ काढत सर्रास शनिवार दिवसभर तर रविवारी दुपारपर्यंत हॉटेल व रेस्टॉरंट सुरू ठेवली. आम्हाला ग्रामपंचायतीच्या प्रशासनाकडून तशा सूचनाच दिल्या नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

नीरा (ता. पुरंदर) येथे शनिवार दिवसभर तर रविवारी दुपारपर्यंत हॉटेल व रेस्टॉरंट सुरू दिसल्याने नागरिकांत कुजबुज सुरू झाली. काही सजग नागरिकांनी महसूल प्रशासनाला याबाबत कल्पना दिली. दुपारी एकच्या सुमारास महसूल व ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले व घंटागाडीतील स्पीकरद्वारे हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांना सूचना दिल्या. यानंतर हॉटेल व रेस्टॉरंट बंद करत फक्त पार्सल सेवा सुरू करण्यात आली.

काल शनिवारी नीरा ग्रामपंचायतीच्या सभागृहात आपत्ती व्यवस्थापनाची तातडीची बैठक झाली. या बैठकीला ग्रामपंचायतीचे सरपंच, उसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस, पोलीस पाटील, आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते. पण महसूल विभागाचे तलाठी किंवा मंडलाधिकारी उपस्थित नव्हते. या बैठकीत जिल्ह्यातील मिनी लॉकडाऊन किंवा हॉटेल व रेस्टॉरंट संदर्भात कोणतीच चर्चा झाली नाही. फक्त व्यावसायिकांची कोरोना चाचणी, व्यावसायिकांना वेळेची बंधने व मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कडक कारवाईबाबतच चर्चा झाली.

शुक्रवार दि.२ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना विषाणू मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण बाबतचे सुधारीत आदेश काढले. काल झालेल्या नीरेतील बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचे वाचन झालेच नाही. कारण तहसीलदारांनी हे आदेश तलाठ्यांमार्फत देणे अपेक्षीत होते. पण तलाठ्यांच्या गैरहजेरीत ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने तातडीची बैठक घेऊन फक्त बैठकीचा फार्स केला, अंमलबजावणी मात्र शून्य केली. होम टु होम सर्वे करण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वयंसेवक नेमायचे ठरवले पण मानधन देऊन.