शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलची झालीत मंगल कार्यालये, शासनाच्या नियमाकडे दुर्लक्ष करतविवाह सोहळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:10 IST

चाकण पंचक्रोशीतील अनेक हॉटेल व्यवसायिकांनी राज्य शासनाच्या नियमानुसार पन्नास लोकांच्या नावाखाली विवाह सोहळे लावण्यास सुरुवात केली आहे. परंतु या ...

चाकण पंचक्रोशीतील अनेक हॉटेल व्यवसायिकांनी राज्य शासनाच्या नियमानुसार पन्नास लोकांच्या नावाखाली विवाह सोहळे लावण्यास सुरुवात केली आहे. परंतु या विवाह सोहळ्याना अगदी शंभर, दोनशे, तीनशे ते पाचशेच्यावर लोक अगदी दाटीवाटीने उपस्थित असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये अनेक लोक मास्क न घालता असतात. हॉटेल व्यवसायिकांकडून राज्य शासनाच्या सर्व नियमांची पायमल्ली केली जात आहे. पन्नास लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यापेक्षा किती तरी जास्त लोक उपस्थितीत राहत आहेत.

मंगल कार्यालयात गर्दीत लग्न सोहळा संपन्न होत असल्यास त्यांच्यावर नियम मोडल्याचे गुन्हे दाखल करण्यात येत आहे. यामुळे मंगल कार्यालय मालक जास्त लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे करण्यास परवानगी देत नाहीत. त्यामुळे विवाह सोहळे आयोजकांकडून हॉटेलांना पसंती दिली जात आहे. केवळ वेगळा मार्ग आणि हॉटेल किती लोक उपस्थित आहेत हे कोणालाही कळत नाही परंतु याउलट परिस्थिती असून शेकडो लोकांच्या गर्दीत लग्न समारंभ पार पडत आहे. यामध्ये अनेक जण बिना मास्कचे असतात,दाटीवाटीने लोक बसल्याने सोशल डिस्टंस पळाले जात नाही. सॅनिटाइझर तर कुठेही दिसत नाही.राज्य शासनाच्या नियमांची पायमल्ली होत आहे.

हॉटेल व्यवसायिकांनी केवळ धंदा मिळत असल्याने त्यांच्याकडून विवाह सोहळे आयोजकांना नियम पाळण्याची जबरदस्ती करत नसल्याचे चित्र लग्न सोहळ्यात गेले की दिसून येत आहे. मंगल कार्यालयाच्या निम्म्या पैशांत हॉटेलमधील लग्न पार पडत असल्याने हॉटेलाना पसंती दिली जात आहे. हॉटेलमध्ये केवळ नावालाच प्रवेशद्वारावर सॅनिटाइझर व टेंप्रिचर मशीन ठेवलं जातं मात्र त्याचा वापर करताना दिसत नाही.

राज्य शासनाने फक्त पन्नास लोकांच्याच उपस्थितीत विवाह सोहळे करण्यास परवानगी दिली आहे.मात्र या नियमाकडे दुर्लक्ष करून शेकडो लोकांच्या गर्दीत विवाह समारंभ आयोजित केले जात आहेत.यामुळे कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरीही लोकांनी मास्क वापरणे,सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे. हॉटेलमध्ये असे गर्दीत लग्न समारंभ होत असतील तर त्याबाबत आमच्याकडे तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.

- प्रकाश धस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण