शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

वसतिगृहे सरकारनेच चालवावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ऊसतोडणी कामगारांसाठी जाहीर केलेली वसतिगृहे खासगी संस्थांना चालवण्यासाठी देऊ नये, ती सरकारी यंत्रणेमार्फतच चालवावीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ऊसतोडणी कामगारांसाठी जाहीर केलेली वसतिगृहे खासगी संस्थांना चालवण्यासाठी देऊ नये, ती सरकारी यंत्रणेमार्फतच चालवावीत असे ऊसतोडणी कामगारांचे मत आहे. संघटना तशी मागणी सरकारकडे करणार आहेत.

ऊसतोडणी कामगारांच्या मुलांची शिक्षणाची नेहमीच परवड होते. विशेषतः हंगाम सुरू झाला की मुले आईवडिलांबरोबर जातात आणि त्या काळापुरते त्यांचे शिक्षण थांबते. त्यावर उपाय म्हणून सरकारने ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार संघटनेचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांंनी सांगितले की, सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहेत, मात्र ही वसतिगृहे खासगी संस्थांना चालवायला देऊ नयेत. अशा संस्था कामकाज नीट करत नाहीत. सरकारी यंत्रणेवर वचक ठेवता येतो, जाब विचारता येतो. महाराष्ट्र श्रमिक ऊसतोड व वाहतूक कामगार संघटनेचे अध्यक्ष जीवन राठोड म्हणाले की, सरकारकडून फक्त आनंद देणाऱ्या घोषणाच होत आहेत. महामंडळाचा निर्णय अजून प्रत्यक्षात आलेला नाही. टनामागे १० रुपये घेणार होते ते आता पुढच्या हंगामावर गेले. वसतिगृहांची मागणी आम्ही अनेक वर्षे करत होतो. निर्णय झाला, चांगले आहे, पण अंमलबजावणी पुढच्या हंगामात होणार आहे. ऊसतोडणी कामगारांमध्ये काम करणारे बीडचे डॉ. संजय तांदळे म्हणाले की, वास्तविक ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी निवासी शाळा करायला हव्यात. सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे तशी मागणी केली आहे.