शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहे सरकारनेच चालवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ऊसतोडणी कामगारांसाठी जाहीर केलेली वसतिगृहे खासगी संस्थांना चालवण्यासाठी देऊ नये, ती सरकारी यंत्रणेमार्फतच चालवावीत, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ऊसतोडणी कामगारांसाठी जाहीर केलेली वसतिगृहे खासगी संस्थांना चालवण्यासाठी देऊ नये, ती सरकारी यंत्रणेमार्फतच चालवावीत, असे ऊसतोडणी कामगारांचे मत आहे. संघटना तशी मागणी सरकारकडे करणार आहेत.

ऊसतोडणी कामगारांच्या मुलांची शिक्षणाची नेहमीच परवड होते. विशेषतः हंगाम सुरू झाला की मुले आईवडिलांबरोबर जातात आणि त्या काळापुरते त्यांचे शिक्षण थांबते. त्यावर उपाय म्हणून सरकारने ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार, वाहतूक मुकादम युनियन ही ऊसतोडणी कामगारांची बरीच जुनी, प्रमुख संघटना आहे. अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांंनी सांगितले की, सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहेत. मात्र ही वसतिगृहे खासगी संस्थांना चालवायला देऊ नयेत. अशा संस्था कामकाज नीट करत नाहीत. सरकारी यंत्रणेवर वचक ठेवता येतो, जाब विचारता येतो. खासगी संस्था म्हणून कार्यकर्तेच संस्था चालवायला घेतात व अनिर्बंध होतात. तसे व्हायला नको.

महाराष्ट्र श्रमिक ऊसतोड व वाहतूक कामगार संघटनेचे अध्यक्ष जीवन राठोड म्हणाले की, सरकारकडून फक्त आनंद देणाऱ्र्या घोषणाच होत आहेत. महामंडळाचा निर्णय अजून प्रत्यक्षात आलेला नाही. टनामागे १० रुपये घेणार होते ते आता पुढच्या हंगामावर गेले. वसतिगृहांची मागणी आम्ही अनेक वर्षे करत होतो. आता निर्णय झाला, चांगले आहे, पण त्याचीही अंमलबजावणी पुढच्या हंगामात होणार आहे.

ऊसतोडणी कामगारांमध्ये गेली अनेक वर्षे काम करणारे बीडचे डॉ. संजय तांदळे म्हणाले की, वास्तविक ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी निवासी शाळा करायला हव्यात. या मुलांची त्यांच्या पालकांना कामावर गेले की काळजी लागून राहते. निवासी शाळा असतील तर पालक निर्धास्त राहतील. सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे तशी मागणी केली असून त्यांनी यावर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे, असे डॉ. तांदळे यांनी सांगितले.

निर्णयाबद्दल संभ्रम

ऊसतोडणी कामगारांमध्ये सरकारच्या या निर्णयाबद्दल संभ्रमाचे वातावरण आहे. प्रत्यक्षात येईल तेव्हा खरे असेच त्यांच्यातील अनेकांना वाटते. घोषणा होतात, पण आमच्यापर्यंत काहीच येत नाही असाच आतापर्यंतचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.