शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्यात धक्कादायक रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
5
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
6
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
7
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
8
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
9
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
10
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
11
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
12
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
13
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
14
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
15
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
16
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
17
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
18
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
19
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
20
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते

वसतिगृहातील स्वयंपाकगृहे अस्वच्छच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2015 01:40 IST

विद्येचे माहेर असलेल्या पुण्यातील नामांकित शाळा व महाविद्यालयांतील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अस्वच्छ स्वयंपाकगृहात शिजविलेले अन्न खाऊनच गुजराण करावी लागत

राहुल शिंदे/सायली जोशी,  पुणेविद्येचे माहेर असलेल्या पुण्यातील नामांकित शाळा व महाविद्यालयांतील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अस्वच्छ स्वयंपाकगृहात शिजविलेले अन्न खाऊनच गुजराण करावी लागत असल्याचे चित्र समोर आले असून, बहुतेक शाळा-महाविद्यालयांत वॉटर प्युरिफायरच नसल्याने टाकीतून आलेले पाणीच प्यावे लागत असल्याची माहिती ‘लोकमत’ पाहणीतून समोर आली आहे. यामुळे शहरातील वसतिगृहातील मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सेवासदन संस्थेतील ५१ विद्यार्थिनींना वसतिगृहातील अन्नामुळे विषबाधा झाल्याची घटना समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने सेवासदन संस्थेला भेट दिली. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना संस्थेच्या वसतिगृहात वॉटर प्युरिफायर बसविले नसल्याची नोंद घेऊन कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधींनी हुजूरपागा, पुणे विद्यार्थी गृह, स. प. महाविद्यालय व बीएमसीसी महाविद्यालयातील वसतिगृहातील मुलांच्या मेसमधील स्वयंपाकगृहाची पाहणी केली. त्यात हुजूरपागा वगळता एकाही ठिकाणी वॉटर प्युरिफायर व स्वच्छतेबाबत काळजी घेतली जात नसल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे पाण्याच्या टाकीजवळच उरलेले अन्न टाकले जात असल्याचेही आढळले. त्यामुळे पाण्याच्या टाकीजवळचा परिसरही अस्वच्छ दिसला. शैक्षणिक संस्थाचालक कंत्राटदारांकडे सर्व जबाबदारी सोपवून निर्धास्त होतात. मात्र, संस्थाचालकांनी वेळोवेळी वसतिगृहाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.वसतिगृहातील मुलांशी मेसबाबत विचारले असता जेवणाचा दर्जा चांगला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वसतिगृहातील सुमारे ६० ते ७० विद्यार्थीच मेसमध्ये जेवण करत असल्याचेही मेसचालकांनी सांगितले. अस्वच्छतेने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यातपुणे विद्यार्थी गृहाच्या सदाशिव पेठेतील वसतिगृहातील स्वयंपाकगृहात पाल फिरत असल्याचे दिसले. तसेच या ठिकाणी गव्हाचे पीठ उघडे ठेवण्यात आले होते. त्यामुळे मुले खात असलेल्या अन्नाच्या सुरक्षेच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच ही खोलीही अतिशय अस्वच्छ असल्याचे दिसले. या ठिकाणी भिंती आणि जमीन अतिशय कळकट होती. भाज्या आणि इतर किराणा सामान ठेवण्यासाठी असलेल्या खोलीतही कचरा होता. या खोलीत मांजरींचाही यथेच्छ वावर होता. भाज्या उघड्या अवस्थेत ठेवलेल्या होत्या. इतकेच नाही तर साठवणीची खोली असताना कचरा टाकण्याच्या टोपल्याही या ठिकाणीच ठेवल्या होत्या. पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी वॉटर प्युरिफायर नसल्याने विद्यार्थ्यांना टाकीत जमा होणारे पाणी प्यावे लागते. या ठिकाणी ५ वी ते १० वीचे २०० विद्यार्थी असून, त्यांच्या आरोग्याबाबत शाळा प्रशासन गंभीर नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीतील पदाधिकारी वसतिगृहाला अचानकपणे भेट देऊन वसतिगृहात मेसमध्ये जेवण करतात. त्यामुळे मुलींच्या वसतिगृहात नेहमीच उत्तम जेवण मिळते. मुलांच्या वसतिगृहाबाबत तक्रारी असतील तर त्याबाबत सूचना संबंधितांना दिल्या जातील. मुलांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये, यासाठी ठोस पाऊल उचलले जाईल. - विकास काकतकर, उपाध्यक्ष ,नियामक मंडळ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी