शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अग्निशमन यंत्रणेची विश्वासार्हता ‘रुग्णालय’ भरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:09 IST

२५ टक्के रुग्णालयांची प्रक्रिया अपूर्ण : महापालिकेकडे केवळ कागदोपत्री नोंद लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित ...

२५ टक्के रुग्णालयांची प्रक्रिया अपूर्ण : महापालिकेकडे केवळ कागदोपत्री नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित असल्याचे हमीपत्र जमा केल्यावर महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. मनुष्यबळाअभावी रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ अग्निशामक विभागाकडून केले जात नाही. रुग्णालयांना अधिकृत केलेल्या यंत्रणांकडून तपासणी करून घेऊन केवळ हमीपत्राचा कागद अग्निशामक विभागाकडे जमा करायचा असतो. यंत्रणा तपासून घेण्याची जबाबदारी सर्वस्वी रुग्णालय व्यवस्थापनाची असते. त्यामुळे अग्निशमन यंत्रणेची विश्वासार्हता ‘रुग्णालय’ भरोसे असल्याचे आढळून आले आहे.

‘महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनिमय २००६’ हा कायदा २००८ मध्ये लागू झाला. त्यातील कलम ३ (३) प्रमाणे प्रत्येक रुग्णालयाला दर वर्षी त्यांच्या इमारतीतील अग्निशमन यंत्रणा अधिकृत यंत्रणेकडून तपासून घ्यावी लागते. यंत्रणेकडून रुग्णालयाला ‘बी’ फॉर्म दिला जातो. त्याची प्रत महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाकडे देणे अपेक्षित असते. पुण्यातील एकूण रुग्णालयांपैैकी ७५ टक्के रुग्णालयांचेच ‘बी फॉर्म’ अग्निशामक विभागाकडे आले आहेत. उर्वरित रुग्णालयांनी तर तेवढीही काळजी घेतलेली नाही.

अधिकृत परवाना काढल्याशिवाय आणि नोंदणी केल्याशिवाय कोणताही दवाखाना किंवा रुग्णालय सुरू करता येत नाही. परवाना काढताना अग्निशामक विभागाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र आवश्यक असते. अग्निशमन यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित असल्याचे हमीपत्र मिळाल्यानंतरच अग्निशामक विभागाकडून हे प्रमाणपत्र दिले जाते. परवाना आणि ना हरकत प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे लागते. ना हरकत प्रमाणपत्र अग्निशामक विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून त्यांचा परवाना नूतनीकरण केले जाते.

चौकट

महापालिकेच्या सर्व इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवण्याचे काम भवन विभागाकडे आहे. त्यामुळे महापालिका रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणा व्यवस्थित असावी आणि ती तपासून घ्यावी, असे पत्र अग्निशामक विभागाने भवन विभागाला दिले आहे. अग्निशमन यंत्रणांच्या दर्जाची खातरजमा शासनाने पुण्यातील ५० संस्थांना अधिकृत केले आहे. मात्र या संस्थांकडून त्यांच्या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित संस्थांवर कोणी आणि काय कारवाई करावी, यासंदर्भात प्रशासनात संभ्रम आहे.

चौकट

“एखाद्या रुग्णालयाची अग्निशमन यंत्रणा बंद असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना अग्निशामक दलातर्फे नोटीस दिली जाते. रुग्णालयांना दिलेल्या मुदतीत यंत्रणा कार्यान्वित करुन न घेतल्यास त्यांचे वीज आणि पाणी तोडण्याचे अधिकार अग्निशामक दलाकडे आहेत.”

- प्रशांत रणपिसे, विभागप्रमुख, अग्निशामक विभाग, पुणे महापालिका