अवसरी : आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील घोडनदीवरील कोल्हापुर पद्धतीचे अनेक बंधारे पाण्याअभावी कोरडे पडले आहे. तातडीने (डिंभे धरण हुतात्मा बाबु गेणु जलाशयातुन) पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.आंबेगाव तालुक्याला जीवनदाईनी असणारी घोडनदी काही गावांनी पाण्याअभावी कोरडी पडु लागली आहे.घोडनदीवर असणारे कोल्हापुर पद्धतीचे बंधारे कोरडे पडले आहे.परिणामी या नदीवरील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारी बंद पडण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे घोडनदीला (डिंभे धरण हुतात्मा बाबु गेणु जलाशयातुन) पाणी सोडावे अशी मागणी शेतकरी करत आहे. चालु वर्षी पावसाळा चांगला झाल्याने डिंभे धरण पुर्ण भरले होते.सध्या धरणातही भरपुर पाणीसाठा आहे. घोडनदीवरील कोल्हापुर पद्धतीच्या बंधाऱ्याला ढापे टाकले असुन पाणी अडवण्याची उपाययोजना केलीआहे.पण सध्या नदीतील पाणी दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.सध्या शेतातील शेतीपिकांनापाणी देण्यासाठी शेतकरी नदीवरील पाणी उपसा करतात.त्यामुळे साठलेले पाणी कमी होऊ लागले आहे.येत्या आठ ते दहा दिवसात घोडनदीवरील जवळपास सर्वच बंधारे कोरडे ठाक होण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे घोडनदीला डिंभे धरणातुन पाणी सोडणे गरजेचे बनले आहे.
घोड नदीवरील बंधारे कोरडे
By admin | Updated: November 17, 2016 02:27 IST