शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
2
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
3
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
4
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
5
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
6
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
7
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
8
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
9
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
10
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
11
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
12
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
13
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
14
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
15
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
16
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
17
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
18
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
19
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
20
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!

केद्रांच्या पथकाचे ‘वरातीमागून घोडे"""" ; अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाकडे निधी नसल्याने केंद्राकडे निधीची मागणी करण्यात आली होती. यावरून बरेच राजकारण देखील झाले. अखेर केंद्र शासनाने ऑक्टोबर महिन्यांतील नुकसानीची पाहणी करण्यासाठी एक पथक डिसेंबरच्या शेवटी पुणे दौ-यावर पाठवले आहे.

तब्बल तीन महिन्यांनंतर हे पथक येत आहे. दरम्यानच्या काळात नुकसानग्रस्त भागाची शेतकऱ्यांकडून दुरूस्ती, डागडुजी करण्यात आली आहे. यामुळेच केंद्रीय पथकाला झालेले नुकसान नक्की काय दाखविणार असा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

पुणे विभागात १४ ऑक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे ८७ हजार ४१६ हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले. यात सर्वाधिक फटका सोलापूर, पुणे आणि सांगली जिल्ह्याला बसला. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. विभागात तब्बल एक हजार २९ जनावरे पाण्यात वाहून गेली. या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक पुणे विभागाच्या दौऱ्यावर आले आहे. बुधवारी (दि. २३) हे पथक पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.