शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

खेडवासीयांच्या आशा पल्लवीत

By admin | Updated: July 16, 2017 03:41 IST

पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलेले राजकीय, शासकीय ग्रहण अद्यापही सुरू आहे. जागा शोधण्याच्या शर्थीच्या प्रयत्नात विकासाच्या

- लोकमत न्यूज नेटवर्कशिक्रापूर : पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलेले राजकीय, शासकीय ग्रहण अद्यापही सुरू आहे. जागा शोधण्याच्या शर्थीच्या प्रयत्नात विकासाच्या दृष्टीने पुणे जिल्ह्याचा मानाचा तुरा मानले जाणाऱ्या विमानतळाची दिशा पुन्हा एकदा खेड-शिरूर भागात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. चाकण किंवा खेड-शिरूर भागात विमानतळ होणे अपेक्षित होते. त्या दृष्टीने मागील तीन-चार वर्षांत सर्वेक्षणही करण्यात आले होते. चाकण, भोसरी, खेड, रांजणगाव, शिक्रापूर, सणसवाडी, पिंपरी-चिंचवड या राज्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक पट्ट्याला या विमानतळाचा फायदा झाला असता. त्याचबरोबर मुंबई-नाशिकला जवळ असे, या भागातील विमानतळ ठरले असते. त्यादृष्टीने विमानतळाला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. परंतु राजकीय व शासकीय उदासीनतेची ‘माशी शिंकली’ आणि या भागातील आंतरराष्ट्रीय विमानतळ तांत्रिक अडथळ््याचे कारण देत पुरंदर येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आता पुन्हा एकदा खेड ‘सेझ’ भागात विमानतळ होईल, अशी अपेक्षा राजकीय व शासकीय पातळीवर व्यक्त होत आहे. या भागातील ‘सेझ’ संपादित जमिनीत आंतरराष्ट्रीय विमानतळाचा सर्व्हे २०१५ मध्ये झाला आहे. त्यातील त्रुटी दूर झाल्यास पुन्हा एकदा विमानतळाची दिशा बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चाकणजवळील सातगावात सुरुवातीला विमानतळासाठी सर्वेक्षण झाले. त्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाने चाकणऐवजी दुसरी जागा शोधण्याची सूचना केली. केंदूर, निमगाव, दावडी, कन्हेरसर या भागातील काही जागेचा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्व्हे करण्यात आला होता.विमानतळ आले तर लोकांच्याच हिताचे : सुरेश गोरेखेड विभागामध्ये विमानतळ येण्याबाबत सध्या तरी कुठलाही निर्णय झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे मात्र लोकांच्या आशा आकांक्षा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत, हे खरे. जर विमानतळ खेडमध्ये आले तर चांगलेच आहे. ते लोकांच्या हिताचेच ठरेल. परंतु त्यासाठी लोकांची जमीन देण्याची तयारी असायला हवी. खेडमध्ये आता जी जमिन शिल्लक आहे त्यामध्ये विमानतळ होऊ शकते का हे पाहावे लागेल. परंतु विमानतळ होण्यासाठी जनमताचा रेटा मात्र लागेल. सेझ, विमानतळ, रेल्वेच्या गाजराने गुंतवणूकदार हैराणमागील आठ वर्षांत खेड व शिरूर भागात सेझचे १७ गावांपैकी पहिल्या टप्प्यात ५ गावांत संपादन झाले. त्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी या भागात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यातच विमानतळ व नंतर रेल्वेच्या सर्व्हेनंतर खेड व शिरूर भागात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक जमीन खरेदी विक्रीत झाली. परंतु अचानक रात्रीतून विमानतळ व रेल्वे दुसरीकडे गेल्याने गुंतवणूकदारांच्या झोपा उडाल्या आहेत. या भागातील विकासाला मोठी खीळ बसली आहे. पुन्हा एकदा विमानतळाच्या चर्चेने या भागात दिलासा मिळाला असून सेझ, विमानतळ, रेल्वेचे गाजर मात्र सर्वांचेच हृदयाचे ठोके चुकवत आहे.