शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्याला विमानतळ परतण्याची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिक्रापूर : जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलेले राजकीय, शासकीय ग्रहण अद्यापही सुरूच आहे. सुरुवातीला खेड भागात होणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिक्रापूर : जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलेले राजकीय, शासकीय ग्रहण अद्यापही सुरूच आहे. सुरुवातीला खेड भागात होणारे हे विमानतळ पुरंदर भागात गेल्यानंतर तेथील विरोधामुळे पुन्हा एकदा खेड भागात येईल, अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत.

विमानतळाला पूरक व महत्त्वाची दळणवळण सुविधाची मुख्य गरज असलेल्या पुणे जिल्ह्यात महत्त्वाचे असलेले आशिया खंडातील रांजणगाव एमआयडीसी शिक्रापूर, सणसवाडी, चाकण, खेड, भोसरी एमआयडीसी त्याचबरोबर नगर, नाशिक व मुंबई या सर्व भागाला मध्यवर्ती ठिकाण म्हणून खेड विमानतळाची जागा सुरुवातीला पाहण्यात आली होती. काही तांत्रिक अडचणीमुळे विमानतळ पुरंदरला नेण्यात आले. परंतु हे विमानतळ खेड भागातच व्हावे यासाठी पुन्हा मागणीने जोर धरला आहे.

औद्योगिक पट्याला गरज असलेले व दळणवळणची योग्य दिशा असल्याने या भागातच विमानतळ योग्य असल्याचे अनेक जाणकारांचे मत असले तरी तांत्रिक बाबींच्या सर्वेक्षणानंतर विमानतळ याची दिशा बदलण्यात आली होती. नुकतेच खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी एका कार्यक्रमात या भागात विमानतळ व्हावे यासाठी मागणी केली असून, या भागातील शेतकऱ्यांचा विरोधदेखील काहीसा कमी झाला असल्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड भागात होईल, अशी अपेक्षा या भागातून व्यक्त होत आहे.

२०१७ मध्ये खेड व पुरंदरमधील विमानतळाबाबत संभ्रम निर्माण होऊन दोन्ही भागांत मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली होती. आजही पुरंदर भागात विमानतळाला काहीसा मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. खेड भागातील एसईझेडच्या दुसऱ्या टप्प्यातील जमीन संपादन प्रक्रिया विरोधानंतर बंद करण्यात आली. परंतु अजूनही काही भागातील भूसंपादनाचे सातबारावरील शिक्के काढलेले नाहीत. सध्या खेड सेझ प्रकल्पाला घरघर लागल्यानंतर विमानतळाला असलेला विरोध काहीसा कमी झाला आहे. मागील दहा ते बारा वर्षांत या भागाला वरदान ठरणारे विमानतळ तसेच पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प होण्याच्या आशेने या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण वाढले. त्याचबरोबर औद्योगिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर झाली. सध्या रेल्वे प्रकल्प काहीसा मार्गी लागत आहे. विमानतळ अद्याप निश्चित नसल्याने या भागातील गुंतवणूक केलेल्या अनेक उद्योजकांनी धीम्या गतीने आपले काम चालू केले होते. २०१५ मध्ये खेड भागात विमानतळ होणाऱ म्हणून अनेक छोट्या-मोठ्या गुंतवणूकदारांनी या भागात जमिनी विकत घेतले असून कोट्यावधी रुपये या भागात गुंतवले आहेत. त्यानंतर विमानतळाची दिशा बदलल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले होते. पुन्हा एकदा विमानतळ या भागात येईल, अशी अशा नागरिक व्यक्त करत आहेत.

चौकट

सर्वात सुरवातीला २०१४ -१५ मध्ये चाकणजवळील सातगाव भागात विमानतळही सर्वेक्षण झाले. त्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाने चाकणऐवजी दुसरी जागा शोधण्याच्या सूचना केली. केंदूर, निमगाव, दावडी, कनेरसर या भागांतील काही जागा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्व्हे करण्यात आला होता. सध्या या भागातील विमानतळाचा विरोध काहीसा संपला असून या भागात विमानतळ व्हावे, अशी अपेक्षा आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे.