शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

पुनर्वसनाचा प्रश्न सुटण्याची आशा

By admin | Updated: March 9, 2016 00:48 IST

भामा-आसखेड धरणातून पुण्याला पाणी नेण्याच्या योजनेमुळे भामा-आसखेड धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. आळंदीचा पाणीप्रश्नही सुटण्याच्या मार्गावर

राजगुरुनगर : भामा-आसखेड धरणातून पुण्याला पाणी नेण्याच्या योजनेमुळे भामा-आसखेड धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. आळंदीचा पाणीप्रश्नही सुटण्याच्या मार्गावर असल्याने ही योजना म्हणजे धरणग्रस्तांसाठी आणि आळंदीवासीयांसाठी इष्टापत्ती ठरू शकेल. मात्र, या धरणातून शेतीला पाणी मिळण्याची शक्यता आता मावळत चालली आहे. पुनर्वसनाचा प्रश्न व पुण्यासाठीच्या पाण्याची पाईपलाईन या संदर्भात पालकमंत्री गिरीष बापट यांनी आज मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत भामा आसखेड प्रकल्पांतील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी येत्या ८ दिवसांत अ‍ॅक्शन प्लॅन करून सादर करा, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. भामा आसखेड धरणाचे पाणी पुण्याला देण्यावरून निर्माण झालेल्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली बैठक फिसकटली होती तेव्हापासून काम बंदच होते. पुण्याच्या पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने काम सुरु व्हावे असा प्रशासनावर दबाव होता, तर दुसर्या बाजूला धरणग्रस्तांचे प्रश्न सुटल्याशिवाय पाणीयोजनेचे काम करू देणार नाही अशी खेडच्या लोकांची भूमिका होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी आजच्या बैठकीत निर्णय झाले. यामुळे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटेल अशी आशा निर्माण झाली आहे. संपादित झालेली पण बुडीत क्षेत्रात न गेलेली जमीन शेतक-यांना परत देणे या प्रश्नांचे काय होणार हा प्रश्न शिल्लक आहेच. शेतीला पाणी देण्याबाबत शासन काय भूमिका घेणार आणि कालवे करणार कि नाही ? याबाबतही आता उत्सुकता आहे.