शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

पुनर्वसनाचा प्रश्न सुटण्याची आशा

By admin | Updated: March 9, 2016 00:48 IST

भामा-आसखेड धरणातून पुण्याला पाणी नेण्याच्या योजनेमुळे भामा-आसखेड धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. आळंदीचा पाणीप्रश्नही सुटण्याच्या मार्गावर

राजगुरुनगर : भामा-आसखेड धरणातून पुण्याला पाणी नेण्याच्या योजनेमुळे भामा-आसखेड धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. आळंदीचा पाणीप्रश्नही सुटण्याच्या मार्गावर असल्याने ही योजना म्हणजे धरणग्रस्तांसाठी आणि आळंदीवासीयांसाठी इष्टापत्ती ठरू शकेल. मात्र, या धरणातून शेतीला पाणी मिळण्याची शक्यता आता मावळत चालली आहे. पुनर्वसनाचा प्रश्न व पुण्यासाठीच्या पाण्याची पाईपलाईन या संदर्भात पालकमंत्री गिरीष बापट यांनी आज मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत भामा आसखेड प्रकल्पांतील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी येत्या ८ दिवसांत अ‍ॅक्शन प्लॅन करून सादर करा, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. भामा आसखेड धरणाचे पाणी पुण्याला देण्यावरून निर्माण झालेल्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली बैठक फिसकटली होती तेव्हापासून काम बंदच होते. पुण्याच्या पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने काम सुरु व्हावे असा प्रशासनावर दबाव होता, तर दुसर्या बाजूला धरणग्रस्तांचे प्रश्न सुटल्याशिवाय पाणीयोजनेचे काम करू देणार नाही अशी खेडच्या लोकांची भूमिका होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी आजच्या बैठकीत निर्णय झाले. यामुळे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटेल अशी आशा निर्माण झाली आहे. संपादित झालेली पण बुडीत क्षेत्रात न गेलेली जमीन शेतक-यांना परत देणे या प्रश्नांचे काय होणार हा प्रश्न शिल्लक आहेच. शेतीला पाणी देण्याबाबत शासन काय भूमिका घेणार आणि कालवे करणार कि नाही ? याबाबतही आता उत्सुकता आहे.