शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
2
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
3
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
4
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
5
चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
6
वरमाला झाली, वधू स्टेजवरून उतरली... अन् थेट प्रियकरासोबत पळून गेली! सप्तपदीपूर्वीच लग्नात मोठा राडा
7
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठी आर्थिक विधेयकं संसदेत मांडली जाणार
8
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार?
9
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
10
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
11
भावा जिंकलस! 'बिग बॉस १९'च्या टॉप ५मध्ये पोहोचला प्रणित मोरे, 'या' दिवशी पार पडणार ग्रँड फिनाले
12
"भाऊ, मी तुलाही मानतो...", रितेश देशमुखच्या 'त्या' प्रश्नावर प्रणित मोरेने दिलं उत्तर; पाहा Video
13
New Rules 1 December 2025: आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
14
Sunil Gavaskar: सचिन तेंडुलकर की कोहली? वनडेतील सर्वोत्तम फलंदाज कोण? गावस्कर म्हणाले...
15
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
16
'गुरुजन' इतके क्रूर होऊच कसे शकतात? आपण फार मोठी जोखीम स्वीकारतो आहोत
17
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
18
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
19
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
20
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाचा प्रश्न सुटण्याची आशा

By admin | Updated: March 9, 2016 00:48 IST

भामा-आसखेड धरणातून पुण्याला पाणी नेण्याच्या योजनेमुळे भामा-आसखेड धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. आळंदीचा पाणीप्रश्नही सुटण्याच्या मार्गावर

राजगुरुनगर : भामा-आसखेड धरणातून पुण्याला पाणी नेण्याच्या योजनेमुळे भामा-आसखेड धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. आळंदीचा पाणीप्रश्नही सुटण्याच्या मार्गावर असल्याने ही योजना म्हणजे धरणग्रस्तांसाठी आणि आळंदीवासीयांसाठी इष्टापत्ती ठरू शकेल. मात्र, या धरणातून शेतीला पाणी मिळण्याची शक्यता आता मावळत चालली आहे. पुनर्वसनाचा प्रश्न व पुण्यासाठीच्या पाण्याची पाईपलाईन या संदर्भात पालकमंत्री गिरीष बापट यांनी आज मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत भामा आसखेड प्रकल्पांतील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी येत्या ८ दिवसांत अ‍ॅक्शन प्लॅन करून सादर करा, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. भामा आसखेड धरणाचे पाणी पुण्याला देण्यावरून निर्माण झालेल्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली बैठक फिसकटली होती तेव्हापासून काम बंदच होते. पुण्याच्या पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने काम सुरु व्हावे असा प्रशासनावर दबाव होता, तर दुसर्या बाजूला धरणग्रस्तांचे प्रश्न सुटल्याशिवाय पाणीयोजनेचे काम करू देणार नाही अशी खेडच्या लोकांची भूमिका होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी आजच्या बैठकीत निर्णय झाले. यामुळे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटेल अशी आशा निर्माण झाली आहे. संपादित झालेली पण बुडीत क्षेत्रात न गेलेली जमीन शेतक-यांना परत देणे या प्रश्नांचे काय होणार हा प्रश्न शिल्लक आहेच. शेतीला पाणी देण्याबाबत शासन काय भूमिका घेणार आणि कालवे करणार कि नाही ? याबाबतही आता उत्सुकता आहे.