शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:12 IST

या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, गुणवत्तेला अधिक महत्त्व दिले पाहिजे. प्रामाणिक कष्ट म्हणजेच गुणवत्ता होय. गुणवत्ता ...

या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, गुणवत्तेला अधिक महत्त्व दिले पाहिजे. प्रामाणिक कष्ट म्हणजेच गुणवत्ता होय. गुणवत्ता ही श्रीमंतांची जहागिरी नसून परिश्रमातून गुणवत्ता तयार होत असते. दहावी, बारावीच्या परीक्षेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण संपादन करून राज्य पातळीवरील यश संपादन केले आहे. तालुक्यातील कल्याणी तुकाराम माने हिने दहावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक आणि उत्कर्ष योगेश शिंदे याने बारावीच्या परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवून ग्रामीण भागातील गुणवत्ता सिद्ध केली आहे. दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रभर आपले नाव उज्ज्वल केले आहे.

यशाकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. शिक्षक, विद्यार्थ्यांनी ऋणानुबंध जपण्याचे काम करीत समाजासाठी कार्य केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा आदर्श सातत्याने डोळ्यांसमोर ठेवून आपली वाटचाल करावी. खडतर परिस्थितीमध्ये यश प्राप्त करण्यास महत्त्व असते तसेच यशामध्ये शिक्षक अर्थात गुरूला महत्त्व असल्याचे या वेळी प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

या वेळी भिगवण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, सर्व प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायणदास रामदास हायस्कूलचे मुख्याध्यापक विकास फलफले यांनी केले. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले, तर आभार उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांनी मानले.

१४ इंदापूर

इंदापूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सन्मान करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व मान्यवर.