शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

आगळ्यावेगळ्या प्रयोगाने पवित्र इंद्रायणी जलपर्णीमुक्त!

By admin | Updated: June 6, 2016 00:37 IST

नद्यांमधील जलपर्णीचा विळखा हा सगळीकडेच डोकेदुखीचा विषय ठरत असताना अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणीला मात्र आगळ्या-वेगळ्या यशस्वी प्रयोगाद्वारे जलपर्णीमुक्त करण्यात यश आले

भानुदास पऱ्हाड,  शेलपिंपळगाव नद्यांमधील जलपर्णीचा विळखा हा सगळीकडेच डोकेदुखीचा विषय ठरत असताना अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणीला मात्र आगळ्या-वेगळ्या यशस्वी प्रयोगाद्वारे जलपर्णीमुक्त करण्यात यश आले आहे. हे स्वच्छतेचे मॉडेल याच पद्धतीने राज्यातही राबवल्यास नद्या जलपर्णीतून मुक्त होऊन मोकळा श्वास घेऊ शकतील. पुणे जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच नद्यांच्या पात्रातील पाण्याला जलपर्णीचा विळखा आहे. जलपर्णीचे दुष्परिणाम लक्षात घेऊन प्रशासनाने ती हटविण्यासाठी प्रयत्नही केले. परंतु जलपर्णीचा गुंतत चाललेला विळखा कायमस्वरूपी सोडविण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. मात्र याला अपवाद ठरला तो आळंदी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख दत्तात्रय भगवानराव सोनटक्के यांनी केलेल्या प्रयोगाचा. इंद्रायणीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरलेली होती. सोनटक्के यांनी एक अनोखी शक्कल लढविली आणि ते त्यात यशस्वीही झाले. इंद्रायणीच्या संपूर्ण पात्राला पुरेल इतके सुमारे १२५ प्लास्टीकचे रिकामे ड्रम आणले. त्यांना सळइने भोके पाडण्यात आली. एक इंचाचा वायररोप नदीच्या एका बाजूला घट्ट करून पाणी साठवण बंधाऱ्याच्या सुमारे ६०० मीटर अंतर दूर त्याला नदीच्या दुसऱ्या तीरावर पसरविण्यात आले. त्यानंतर एका पाठोपाठ एक ड्रम रोपमध्ये ओवून ती बाजू क्रेनच्या साह्याने उंचावून ड्रमचा हार बनविण्यात आला. नदीच्या पाण्यावर या हाराला पसरविण्यात आले. मधोमध होल केल्याने ते अर्धे पाण्यात तरंगत राहिल्याने जलपर्णीला ड्रमच्या हाराचा आपोआप अडथळा निर्माण झाला. त्यानंतर पाणीसाठवण बंधाऱ्याचे काही दरवाजे खुले करून उरलेल्या ६०० मीटर अंतरातील जलपर्णी सलग चार - पाच दिवस आदिवासी मजुरांनी मोठ्या मेहनतीने बांबू, लोखंडी हुक, लोखंडी आकडे आदी अवजारांच्या साह्याने पाण्यापासून दूर करून पात्र जलपर्णीमुक्त केले. सध्या इंद्रायणी नदीचे पात्र जलपर्णी विरहित असून, पात्रात स्वच्छ पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे चालू वर्षी पंढरपूर आषाढी पायीवारीसाठी आलेल्या माऊलीभक्तांना दुगंर्धीमुक्त पाण्यात पवित्र स्नान करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इतरांनीही राबवावा असा प्रयोगवारंवार प्रयत्न करूनही जलपर्णीचा तिढा सुटत नव्हता. परिणामी शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. पाणीपुरवठा विस्कळीत होत होता. अखेर खूप विचार करून हा प्रयोग निश्चित करून अमलात आणायचे ठरवले. सर्वांच्या सहकार्याने हा प्रयोग यशस्वी झाला आहे. इतरांनी हा प्रयोग राबवून नद्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.- दत्तात्रय सोनटक्के, पाणीपुरवठा विभागप्रमुख, आळंदी नगर परिषद