शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

आगळ्यावेगळ्या प्रयोगाने पवित्र इंद्रायणी जलपर्णीमुक्त!

By admin | Updated: June 6, 2016 00:37 IST

नद्यांमधील जलपर्णीचा विळखा हा सगळीकडेच डोकेदुखीचा विषय ठरत असताना अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणीला मात्र आगळ्या-वेगळ्या यशस्वी प्रयोगाद्वारे जलपर्णीमुक्त करण्यात यश आले

भानुदास पऱ्हाड,  शेलपिंपळगाव नद्यांमधील जलपर्णीचा विळखा हा सगळीकडेच डोकेदुखीचा विषय ठरत असताना अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणीला मात्र आगळ्या-वेगळ्या यशस्वी प्रयोगाद्वारे जलपर्णीमुक्त करण्यात यश आले आहे. हे स्वच्छतेचे मॉडेल याच पद्धतीने राज्यातही राबवल्यास नद्या जलपर्णीतून मुक्त होऊन मोकळा श्वास घेऊ शकतील. पुणे जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच नद्यांच्या पात्रातील पाण्याला जलपर्णीचा विळखा आहे. जलपर्णीचे दुष्परिणाम लक्षात घेऊन प्रशासनाने ती हटविण्यासाठी प्रयत्नही केले. परंतु जलपर्णीचा गुंतत चाललेला विळखा कायमस्वरूपी सोडविण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. मात्र याला अपवाद ठरला तो आळंदी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख दत्तात्रय भगवानराव सोनटक्के यांनी केलेल्या प्रयोगाचा. इंद्रायणीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरलेली होती. सोनटक्के यांनी एक अनोखी शक्कल लढविली आणि ते त्यात यशस्वीही झाले. इंद्रायणीच्या संपूर्ण पात्राला पुरेल इतके सुमारे १२५ प्लास्टीकचे रिकामे ड्रम आणले. त्यांना सळइने भोके पाडण्यात आली. एक इंचाचा वायररोप नदीच्या एका बाजूला घट्ट करून पाणी साठवण बंधाऱ्याच्या सुमारे ६०० मीटर अंतर दूर त्याला नदीच्या दुसऱ्या तीरावर पसरविण्यात आले. त्यानंतर एका पाठोपाठ एक ड्रम रोपमध्ये ओवून ती बाजू क्रेनच्या साह्याने उंचावून ड्रमचा हार बनविण्यात आला. नदीच्या पाण्यावर या हाराला पसरविण्यात आले. मधोमध होल केल्याने ते अर्धे पाण्यात तरंगत राहिल्याने जलपर्णीला ड्रमच्या हाराचा आपोआप अडथळा निर्माण झाला. त्यानंतर पाणीसाठवण बंधाऱ्याचे काही दरवाजे खुले करून उरलेल्या ६०० मीटर अंतरातील जलपर्णी सलग चार - पाच दिवस आदिवासी मजुरांनी मोठ्या मेहनतीने बांबू, लोखंडी हुक, लोखंडी आकडे आदी अवजारांच्या साह्याने पाण्यापासून दूर करून पात्र जलपर्णीमुक्त केले. सध्या इंद्रायणी नदीचे पात्र जलपर्णी विरहित असून, पात्रात स्वच्छ पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे चालू वर्षी पंढरपूर आषाढी पायीवारीसाठी आलेल्या माऊलीभक्तांना दुगंर्धीमुक्त पाण्यात पवित्र स्नान करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इतरांनीही राबवावा असा प्रयोगवारंवार प्रयत्न करूनही जलपर्णीचा तिढा सुटत नव्हता. परिणामी शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. पाणीपुरवठा विस्कळीत होत होता. अखेर खूप विचार करून हा प्रयोग निश्चित करून अमलात आणायचे ठरवले. सर्वांच्या सहकार्याने हा प्रयोग यशस्वी झाला आहे. इतरांनी हा प्रयोग राबवून नद्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.- दत्तात्रय सोनटक्के, पाणीपुरवठा विभागप्रमुख, आळंदी नगर परिषद