शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

‘ध्वज उंच धरू या मराठी विकासाचा!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:11 IST

पालकांचा ओढा व देशातील प्रादेशिक भाषांचे गुंतागुंतीचे राजकारण पाहता इंग्रजीचे प्राधान्य या देशात कायम राहणार आहे, त्यामुळे इंग्रजी, हिंदी ...

पालकांचा ओढा व देशातील प्रादेशिक भाषांचे गुंतागुंतीचे राजकारण पाहता इंग्रजीचे प्राधान्य या देशात कायम राहणार आहे, त्यामुळे इंग्रजी, हिंदी आणि अन्य भाषांच्या माध्यमांच्या शाळांमध्ये विध्यार्थ्यांना कायदा करून सक्तीने मराठी शिकवणे, मराठी भाषा ही सर्वार्थाने ज्ञान, विज्ञान व रोजगाराची भाषा होण्यासाठी संशोधन व लक्ष केंद्रित असे उच्च दर्जाचे उपक्रमशील मराठी विद्यापीठ निर्माण करणे आणि मराठी लोकव्यवहाराची भाषा होण्यासाठी अर्धन्यायिक दर्जा असणारे प्रभावी मराठी भाषा प्राधिकरण कायद्याद्वारे प्रस्थापित करून स्वायत्त आयोग नेमणे या त्रिसूत्रीनेच मराठी भाषेला तिचे उचित स्थान प्राप्त होईल हा विचारपूर्वक आराखडा ‘मराठीच्या भल्यासाठी’ मंचाने तयार केला. त्याची आवश्यकता शासनाला पटवून देणे, त्यासाठी संवाद व पाठपुरावा करणे व प्रसंगी रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने शांततापूर्ण आंदोलन करण्याची तयारी ठेवणे हा कार्यक्रम ठरवला. मागील दीड वर्षात मधू मंगेश कर्णिक व प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह मी अशा तिघांनी कार्यकारणीच्या सदस्यांच्या सहकार्याने शासनाशी सातत्यपूर्ण संवाद केला. महाविकास आघाडी सरकारने संवेदनशीलता दाखविल्यामुळे सक्तीने मराठी शिकवण्याचा कायदा झाला. मराठी विद्यापीठ कायदा तत्त्वतः मान्य झाला. प्रत्येक जिल्ह्यात मराठी अधिकारी नेमण्याचा निर्णय झाला.

महाराष्ट्राचा सर्व लोकव्यवहार मराठीत होण्यासाठी हा कायदा कसा महत्त्वाचा आहे हे पटवून देणे व डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात कायदा सादर होईल यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. शालेय विद्यार्थ्यात वाचन संस्कृती निर्माण करण्यासाठी शासन निर्णय व्हावा. इ- मराठी, मराठी विद्यापीठाचे स्वरूप ठरविणे व मराठीतून विज्ञान व तंत्रज्ञानाचे महाविद्यालयीन व विश्वविद्यालयीन शिक्षण इंग्रजीच्या जोडीने उपलब्ध करून देण्यासाठी पाठ्यपुस्तक निर्मिती करणे. त्यासाठी अनुवाद केंद्र स्थापन करणे यासाठी विवेक सावंत, नागनाथ कोतापल्ले, महेंद्र कदम व रणधीर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात आले. ‘मराठीच्या भल्यासाठी’ ने आता मराठी विकासाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मराठी भाषा प्राधिकरण कायदा, मराठी विद्यापीठ पुढील वर्षी सुरू करणे व शालेय विद्यार्थ्यात वाचन संस्कृती निर्माण करणे हे तीन विषय आम्ही पुढील कामासाठी निश्चित केले आहेत. प्रश्न आहे तो आपली मराठी भाषिक ओळख अधिक लख्ख करण्याचा व आपली अस्मिता अधिक प्रखर करण्याचा. कारण ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी!’