शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

हिवरे बाजार कोण्या मंत्री-आमदाराची वाट बघत बसले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:12 IST

इन्ट्रो सन १९९२ पासून गावाच्या विकासासाठी जलसंधारणासह स्वच्छता, श्रमदान आणि पर्यावरण संतुलनासाठी काम करतोय. त्यातून गावाला शिस्त लागली. याचा ...

इन्ट्रो

सन १९९२ पासून गावाच्या विकासासाठी जलसंधारणासह स्वच्छता, श्रमदान आणि पर्यावरण संतुलनासाठी काम करतोय. त्यातून गावाला शिस्त लागली. याचा फायदा कोरोनाच्या महामारीत गावात ४७ जण बाधित झाले असताना मोठा झाला. आजमितीस हिवरेबाजारमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही. केवळ ‘चतु:सूत्री’ या उपक्रमातून संपूर्ण गाव कोरोनामुक्त केले. त्यामुळे ‘कृषी’ सप्ताहसह आता राज्यात हिवरे बाजारचा ‘कोविड’ सप्ताह राबवला जात आहे. ‘लोकमत’ने आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्याशी साधलेला हा संवाद -

-अभिजित कोळपे

कोरोनाची सुरुवात कशी झाली?

पवार - २० मार्चला गावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर पुढील काही दिवसांत झपाट्याने आणखी काही जणांना कोरोनाची लागण झाल्याने आम्ही खडबडून जागे झालो. गावातील प्राथमिक शिक्षक, दूध डेअऱ्यांचे कामगार, विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव, कर्मचारी तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी या १७-१८ जणांचे पथक तयार केले. या पथकाने घरोघरी जाऊन प्रत्येक माणसाची तपासणी केली. त्यानंतर ५ एप्रिलच्या अहवालात ४७ गावकऱ्यांना कोरोना संसर्ग आढळून आला.

मग काय उपाय केले? चतु:सूत्री योजना काय?

पवार - १) कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पथक : गावात घरोघरी जाऊन कुटुंबातील प्रत्येक माणसाची (मॅन टू मॅन) तपासणी होते. २) क्वारंटाइन सेंटर : आढळलेल्या कोरोनाबाधिताला तत्काळ क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल केले जाते. ३) उपचार व सल्ला : बाधिताला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून योग्य सल्ला देणे व गरजेनुसार योग्य उपचार सुरु करणे. ४) ऑक्सिजन व तापमान तपासणी : सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीन वेळात रुग्णाची नियमित तपासणी या पथकामार्फत करणे. या चतु:सूत्रीने आम्ही काम चालू केल्याने गाव कोरोनामुक्त झाले. आता १ ते २५ मे यादरम्यान एकही कोरोनाबाधित आढळला नाही.

अहमदनगर जिल्ह्यात उपक्रम राबविण्याचा निर्णय कोणी घेतला?

पवार : पहिला रुग्ण आढळल्यानंतर पुढील १५ दिवसांत आम्ही संपूर्ण गावाची तपासणी केली. यात ४-५ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली होती. त्यानंतर मात्र आम्ही सर्व ४७ कोरोनाबाधितांना १५ दिवसांत कोरोनामुक्त करण्याचा ध्यास घेऊन काम सुरू केले. त्याचा परिणाम आम्हाला टप्प्याटप्प्याने जाणवू लागला. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावाची पाहणी केली. आम्ही राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती घेतली. त्यातून त्यांनी हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवण्याचा निर्णय घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

पवार : पंतप्रधान नरेंद मोदी यांनी जेव्हा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना कोरोनाबाधित रुग्ण कसे बरे केले, असे विचारले. तेव्हा भोसले यांनी हिवरे बाजार येथील उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविल्याचे सांगितले. तेव्हा पंतप्रधानांनी हिवरेबाजारच्या उपक्रमाची माहिती विचारली. दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान कार्यालयातून या उपक्रमाची माहिती घेण्यासाठी फोन आला होता.

तुमचे मंत्री, खासदार, आमदार कोठे आहेत?

पवार : कोरोनाच्या संकटात मंत्री, खासदार किंवा आमदार गावोगावी जाऊ शकत नाही. ते राज्याचे धोरण ठरवू शकतात. त्यामुळे गावागावांत या संकटाचा सामना करण्यासाठी गावातील तरुणांनी जबाबदारी घेतली पाहिजे. आमच्या गावात आम्हाला याचाच फायदा झाला. आम्ही कोणाचीही वाट बघत बसलो नाही.

संकटात लोकांनी काय करायला हवे?

पवार : संकटात हेवे-दावे विसरून सर्वांनी एकमेकांना मदत करायला हवी. त्यासाठी आपलं गाव, तालुका, जिल्हा एक मानून काम करणे गरजेचे आहे. राजकारण सोडून समाजकारण केले तरच आपण या संकटातून बाहेर पडू.

कोरोनाचे रुग्ण वाढू नये, यासाठी काय खबरदारी घेता?

पवार : तिसरी लाट येणार हे गृहीत धरून सध्या आम्ही १८ वर्षांखालील मुलांचे तसेच गरोदर माता आणि ‘फ्रंटलाइन वर्कर’ यांच्या लसीकरणावर भर देत आहोत. गावातून बाहेर जाणाऱ्या आणि गावात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करतो. त्यात कोणी बाधित आढळल्यास तातडीने क्वारंटाइन करून वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार करतो.

‘कृषी’ सप्ताहात ‘कोविड’ सप्ताह कसा राबवणार?

पवार : कृषी सप्ताहात शेतीची कशी काळजी घ्यायची, बदलत्या हवामानानुसार कोणती पिके घ्यायची, संकटात काय करायचे याचे मार्गदर्शन करतो. आता कोरोनाचे संकट आले असताना त्यातून वाचण्यासाठी काय करायला हवे, आपले घर, गाव, तालुका, जिल्हा यावर कसा मात करेल यासाठी गावात उपक्रम केले. या उपक्रमांची माहिती ‘कोविड’ सप्ताहात सांगणार आहोत. प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी याचा फायदा होईल.