शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

हिवरे बाजार कोण्या मंत्री-आमदाराची वाट बघत बसले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:12 IST

इन्ट्रो सन १९९२ पासून गावाच्या विकासासाठी जलसंधारणासह स्वच्छता, श्रमदान आणि पर्यावरण संतुलनासाठी काम करतोय. त्यातून गावाला शिस्त लागली. याचा ...

इन्ट्रो

सन १९९२ पासून गावाच्या विकासासाठी जलसंधारणासह स्वच्छता, श्रमदान आणि पर्यावरण संतुलनासाठी काम करतोय. त्यातून गावाला शिस्त लागली. याचा फायदा कोरोनाच्या महामारीत गावात ४७ जण बाधित झाले असताना मोठा झाला. आजमितीस हिवरेबाजारमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही. केवळ ‘चतु:सूत्री’ या उपक्रमातून संपूर्ण गाव कोरोनामुक्त केले. त्यामुळे ‘कृषी’ सप्ताहसह आता राज्यात हिवरे बाजारचा ‘कोविड’ सप्ताह राबवला जात आहे. ‘लोकमत’ने आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्याशी साधलेला हा संवाद -

-अभिजित कोळपे

कोरोनाची सुरुवात कशी झाली?

पवार - २० मार्चला गावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर पुढील काही दिवसांत झपाट्याने आणखी काही जणांना कोरोनाची लागण झाल्याने आम्ही खडबडून जागे झालो. गावातील प्राथमिक शिक्षक, दूध डेअऱ्यांचे कामगार, विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव, कर्मचारी तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी या १७-१८ जणांचे पथक तयार केले. या पथकाने घरोघरी जाऊन प्रत्येक माणसाची तपासणी केली. त्यानंतर ५ एप्रिलच्या अहवालात ४७ गावकऱ्यांना कोरोना संसर्ग आढळून आला.

मग काय उपाय केले? चतु:सूत्री योजना काय?

पवार - १) कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पथक : गावात घरोघरी जाऊन कुटुंबातील प्रत्येक माणसाची (मॅन टू मॅन) तपासणी होते. २) क्वारंटाइन सेंटर : आढळलेल्या कोरोनाबाधिताला तत्काळ क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल केले जाते. ३) उपचार व सल्ला : बाधिताला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून योग्य सल्ला देणे व गरजेनुसार योग्य उपचार सुरु करणे. ४) ऑक्सिजन व तापमान तपासणी : सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीन वेळात रुग्णाची नियमित तपासणी या पथकामार्फत करणे. या चतु:सूत्रीने आम्ही काम चालू केल्याने गाव कोरोनामुक्त झाले. आता १ ते २५ मे यादरम्यान एकही कोरोनाबाधित आढळला नाही.

अहमदनगर जिल्ह्यात उपक्रम राबविण्याचा निर्णय कोणी घेतला?

पवार : पहिला रुग्ण आढळल्यानंतर पुढील १५ दिवसांत आम्ही संपूर्ण गावाची तपासणी केली. यात ४-५ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली होती. त्यानंतर मात्र आम्ही सर्व ४७ कोरोनाबाधितांना १५ दिवसांत कोरोनामुक्त करण्याचा ध्यास घेऊन काम सुरू केले. त्याचा परिणाम आम्हाला टप्प्याटप्प्याने जाणवू लागला. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावाची पाहणी केली. आम्ही राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती घेतली. त्यातून त्यांनी हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवण्याचा निर्णय घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

पवार : पंतप्रधान नरेंद मोदी यांनी जेव्हा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना कोरोनाबाधित रुग्ण कसे बरे केले, असे विचारले. तेव्हा भोसले यांनी हिवरे बाजार येथील उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविल्याचे सांगितले. तेव्हा पंतप्रधानांनी हिवरेबाजारच्या उपक्रमाची माहिती विचारली. दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान कार्यालयातून या उपक्रमाची माहिती घेण्यासाठी फोन आला होता.

तुमचे मंत्री, खासदार, आमदार कोठे आहेत?

पवार : कोरोनाच्या संकटात मंत्री, खासदार किंवा आमदार गावोगावी जाऊ शकत नाही. ते राज्याचे धोरण ठरवू शकतात. त्यामुळे गावागावांत या संकटाचा सामना करण्यासाठी गावातील तरुणांनी जबाबदारी घेतली पाहिजे. आमच्या गावात आम्हाला याचाच फायदा झाला. आम्ही कोणाचीही वाट बघत बसलो नाही.

संकटात लोकांनी काय करायला हवे?

पवार : संकटात हेवे-दावे विसरून सर्वांनी एकमेकांना मदत करायला हवी. त्यासाठी आपलं गाव, तालुका, जिल्हा एक मानून काम करणे गरजेचे आहे. राजकारण सोडून समाजकारण केले तरच आपण या संकटातून बाहेर पडू.

कोरोनाचे रुग्ण वाढू नये, यासाठी काय खबरदारी घेता?

पवार : तिसरी लाट येणार हे गृहीत धरून सध्या आम्ही १८ वर्षांखालील मुलांचे तसेच गरोदर माता आणि ‘फ्रंटलाइन वर्कर’ यांच्या लसीकरणावर भर देत आहोत. गावातून बाहेर जाणाऱ्या आणि गावात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करतो. त्यात कोणी बाधित आढळल्यास तातडीने क्वारंटाइन करून वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार करतो.

‘कृषी’ सप्ताहात ‘कोविड’ सप्ताह कसा राबवणार?

पवार : कृषी सप्ताहात शेतीची कशी काळजी घ्यायची, बदलत्या हवामानानुसार कोणती पिके घ्यायची, संकटात काय करायचे याचे मार्गदर्शन करतो. आता कोरोनाचे संकट आले असताना त्यातून वाचण्यासाठी काय करायला हवे, आपले घर, गाव, तालुका, जिल्हा यावर कसा मात करेल यासाठी गावात उपक्रम केले. या उपक्रमांची माहिती ‘कोविड’ सप्ताहात सांगणार आहोत. प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी याचा फायदा होईल.