शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

‘पानशेत’च्या इतिहासातून धडा मिळेल

By admin | Updated: July 13, 2016 00:25 IST

पानशेत पूरग्रस्तांचा लढा, उभारण्यात आलेले जनआंदोलन, पुनर्वसनासाठी केलेला संघर्ष या सर्व गोष्टींमधून पानशेत पूराचा संपूर्ण इतिहास ‘कहाणी पानशेत पूरग्रस्तांची’ यामध्ये कथन झाला आहे.

पुणे : पानशेत पूरग्रस्तांचा लढा, उभारण्यात आलेले जनआंदोलन, पुनर्वसनासाठी केलेला संघर्ष या सर्व गोष्टींमधून पानशेत पूराचा संपूर्ण इतिहास ‘कहाणी पानशेत पूरग्रस्तांची’ यामध्ये कथन झाला आहे. त्यामुळे या पुस्तकाचा एखाद्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे उपयोग होईल आणि त्यातून सगळे धडा घेतील, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.पानशेत धरण फुटून आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या पुरग्रस्तांच्या समस्या व त्याच्या निराकरणासाठी केलेले प्रयत्न, पाठपुरावा या सर्वांची माहिती देणारे मंगेश खराटे लिखित ‘कहाणी पानशेत पूरग्रस्तांची’ या पुस्तकाचे प्रकाशन चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.आमदार मेधा कुलकर्णी, राज्याचे माजी मदत व पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, उपमहापौर मुकारी अलगुडे, शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी महापौर अंकुश काकडे, माजी नगरसेवक शिवराम मेंगाळे व लेखक मंगेश खराटे आदी उपस्थित होते. बाळासाहेब शिवरकर आणि डॉ. पतंगराव कदम यांनी राजकीय गुपित खोलत हास्याची फटकेबाजी केली. सत्ता कुणाचीही असो, सहज असे काहीच होत नाही. वरिष्ठ असूनही मलाही हातात फाईल घेऊन फिरावे लागले होते, अशी मिश्किल टिप्पणी कदम यांनी केली. सत्ताधारी पक्षाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनाही त्यांनी भाषणात शाब्दिक चिमटा काढला. मंगेश खराटे यांचा व्यवसाय खाटीकाचा. या आपल्या बंधूकडे त्या अधूनमधून जात असतं असे म्हणाले. मटणाचा खिमा मंगेश करतो, यावरून तुम्हीच आता समजून घ्या, असे त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालनकेले. (प्रतिनिधी)