शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

व्यंगचित्रातून इतिहास घडू शकतो

By admin | Updated: November 25, 2015 00:44 IST

चित्रकलेत व्यंगचित्रांना महत्त्वाचे स्थान आहे. व्यंगचित्रातून इतिहासही घडू शकतो, असे मत यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्ते केले.

पुणे : चित्रकलेत व्यंगचित्रांना महत्त्वाचे स्थान आहे. व्यंगचित्रातून इतिहासही घडू शकतो, असे मत यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्ते केले. सरस्वती लायब्ररी व साहित्यवेध प्रतिष्ठान पुणे तर्फे सुरेश लोटलीकर यांच्या कुंचल्यातून साकार झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या सर्व ८९ अध्यक्षांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादान येथे भरविण्यात आले आहे. प्रर्दशन उद्घाटनच्या प्रसंगी डॉ. सबनीस बोलत होते. यावेळी डॉ. सबनीस यांच्या हस्ते अर्कचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच डॉ सबनीस यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल यंदाचे अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी.डी. पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी, अ.भा. मराठी साहित्य संमेलन २०१५ चे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, सुरेश लोटलीकर, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, एमआयटी पुणेचे प्रकाश जोशी, स्थायी समिती अध्यक्ष श्याम देशपांडे, कैलास भिंगारे उपस्थित होते. डॉ सबनीस म्हणाले, व्यंगचित्रातून इतिहास घडू शकतो. बाळासाहेबांच्या व्यंगचित्राच्या कुंचल्यातून शिवसेनेचा जन्म झाला. तसेच व्यंगचित्रे पाहिल्यानंतर रसिकांच्या मनात गुदगूली झाली पाहिजे. आणि अशी गुदगुली बाळासोहब व आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रातून अनुभवायला मिळते.८८वे अखिल भारतीय साहित्य संमेलन महाराष्ट्राबोहर आयोजित केल्यामुळे वेगवेगळ््या लोकांनी विरोध दर्शवला होता. परंतू आगामी साहित्य संमेलन हे फक्त आर्थिक अंगाने भव्यदिव्य होणार नसून सात्विकतेने व नैतिकतेने भव्यदिव्य होणार आहे. तसेच संमेलनातून येणारा संपूर्ण निधी दुष्काळ ग्रस्तांना देणार असल्याची माहिती सबनीस यांनी दिली. डॉ मोरे म्हणाले, साहित्य संमेलन हा एक गाडा आहे. (प्रतिनिधी)