शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

दहावीचा ऐतिहासिक ९९.९५ टक्के निकाल -कोकण विभाग शंभर टक्के; निकालात ४.६५ टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:09 IST

राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दहावीचा निकाल जाहीर केला. ते म्हणाले, कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा ...

राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दहावीचा निकाल जाहीर केला. ते म्हणाले, कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यामुळे शासन निर्णयानुसार राज्य मंडळाऐवजी शाळांनी घेतलेल्या विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल तयार करण्यात आला.

राज्यातील नऊ विभागीय मंडळांतर्गत एकूण १५ लाख ७५ हजार ८०६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ७५ हजार ७५२ विद्यार्थ्यांचे गुण शाळांकडून प्राप्त झाले. त्यातील १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यातील तब्बल १ लाख ४ हजार ६३३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. तर ४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६१ हजार २९४ एवढी आहे. राज्यातील ४ हजार ९२२ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच ९१६ विद्यार्थी पुनर्रपरीक्षेसाठी पात्र ठरले असून, ३६८ विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

------------------------------

निकालाची वैशिष्ट्ये :

-राज्यातील १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण

-एकूण ७२ विषयांपैकी २७ विषयांचा निकाल १०० टक्के

-राज्यातील ९५७ विद्यार्थ्यांना मिळाले १०० टक्के गुण

-दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९७.८४ टक्के

-राज्यातील २२,७६७ शाळांचा निकाल १०० टक्के; तर ९ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला.

-विद्यार्थिनींचा निकाल विद्यार्थ्यांपेक्षा ०.०२ टक्क्यांनी अधिक

--------

विभागीय मंडळनिहाय निकाल

पुणे : ९९.६५

नागपूर : ९९.८४

औरंगाबाद : ९९.९६

मुंबई : ९९.९६

कोल्हापूर : ९९.९२

अमरावती : ९९.९८

नाशिक : ९९.९६

लातूर : ९९.९६

कोकण : १००.००

----------------

राज्य मंडळातर्फे प्रत्यक्ष परीक्षा घेऊन जाहीर केलेला निकाल आणि शाळांच्या माध्यमातून तयार झालेला निकाल यात काही प्रमाणात फरक असणार आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा निकालात ४.६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार असून, सोमवारपासून प्रक्रियेला सुरुवात होईल.

- दिनकर पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

------