शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

महामार्ग ठरताहेत जीवघेणे

By admin | Updated: April 4, 2015 05:54 IST

पुणे-सोलापूर व पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असले तरी रेंगाळलेल्या कामामुळे हे महामार्ग जीवघेणे ठरत असल्याचे दिसून येत आहे.

पळसदेव : पुणे-सोलापूर व पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असले तरी रेंगाळलेल्या कामामुळे हे महामार्ग जीवघेणे ठरत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असले, तरी अनेक ठिकाणी उणिवा राहिला आहेत. अपघातांचे सत्र सुरूच असताना महामार्गावरील पुलाच्या ठिकाणी अपघात घडत आहेत. महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर नवीन पुलांची बांधणी झाली. तसेच, हे पूल प्रशस्त झाले. मात्र, जुने पूल (पूर्वीच्या महामार्गावरील) आहे त्या अवस्थेत तसेच आहेत. जुने पूल अरुंद असल्याने त्या ठिकाणी अपघात घडत आहेत. दोन वाहने सुसाट जात असताना व पूल अरुंद असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहने पुलावरून खाली कोसळतात. त्यामुळे महामार्गावरील जुन्या पुलांची रुंदी वाढविणे व सिमेंटचे सुरक्षित कठडे बसविणे गरजेचे असल्याचे मत वाहनचालकांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. वाहनांना चढ अथवा उताराचे बंधन राहिलेले नाही. यातून पुढे जाण्याची स्पर्धा वाढल्याने अपघातांना आयतेच निमंत्रण मिळत आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जसे प्रशस्त झाले, तसे मात्र जुन्या पुलांची रुंदी वाढविणे, संरक्षक कठडे भक्कम करणे, याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते. त्यामुळे या पुलांवरून व दोन वाहने जात असताना एकमेकांना वाहने घासणे अथवा नियंत्रण सुटल्यास वाहन पुलावरून खाली कोसळण्याचा धोका संभवतो. पुलाचे कठडे तोडून वाहने खाली पडण्याच्या घटना मागील तीन महिन्यांत भिगवण, भादलवाडी, पळसदेव येथील पुलाच्या ठिकाणी घडल्या आहेत. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसते. अपघात झाल्यानंतर पुलाचे कठडे तुटतात. परिणामी पुन्हा अपघाताची शक्यता निर्माण होते. तुटलेले कठडे लवकर बसविले जात नाहीत, कठडे बसविले तर ते लोखंडी बसवून तात्पुरती मलमपट्टी केली जाते.