शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

महामार्ग ठरताहेत जीवघेणे

By admin | Updated: April 4, 2015 05:54 IST

पुणे-सोलापूर व पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असले तरी रेंगाळलेल्या कामामुळे हे महामार्ग जीवघेणे ठरत असल्याचे दिसून येत आहे.

पळसदेव : पुणे-सोलापूर व पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असले तरी रेंगाळलेल्या कामामुळे हे महामार्ग जीवघेणे ठरत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असले, तरी अनेक ठिकाणी उणिवा राहिला आहेत. अपघातांचे सत्र सुरूच असताना महामार्गावरील पुलाच्या ठिकाणी अपघात घडत आहेत. महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर नवीन पुलांची बांधणी झाली. तसेच, हे पूल प्रशस्त झाले. मात्र, जुने पूल (पूर्वीच्या महामार्गावरील) आहे त्या अवस्थेत तसेच आहेत. जुने पूल अरुंद असल्याने त्या ठिकाणी अपघात घडत आहेत. दोन वाहने सुसाट जात असताना व पूल अरुंद असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहने पुलावरून खाली कोसळतात. त्यामुळे महामार्गावरील जुन्या पुलांची रुंदी वाढविणे व सिमेंटचे सुरक्षित कठडे बसविणे गरजेचे असल्याचे मत वाहनचालकांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. वाहनांना चढ अथवा उताराचे बंधन राहिलेले नाही. यातून पुढे जाण्याची स्पर्धा वाढल्याने अपघातांना आयतेच निमंत्रण मिळत आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जसे प्रशस्त झाले, तसे मात्र जुन्या पुलांची रुंदी वाढविणे, संरक्षक कठडे भक्कम करणे, याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते. त्यामुळे या पुलांवरून व दोन वाहने जात असताना एकमेकांना वाहने घासणे अथवा नियंत्रण सुटल्यास वाहन पुलावरून खाली कोसळण्याचा धोका संभवतो. पुलाचे कठडे तोडून वाहने खाली पडण्याच्या घटना मागील तीन महिन्यांत भिगवण, भादलवाडी, पळसदेव येथील पुलाच्या ठिकाणी घडल्या आहेत. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसते. अपघात झाल्यानंतर पुलाचे कठडे तुटतात. परिणामी पुन्हा अपघाताची शक्यता निर्माण होते. तुटलेले कठडे लवकर बसविले जात नाहीत, कठडे बसविले तर ते लोखंडी बसवून तात्पुरती मलमपट्टी केली जाते.