शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

महामार्ग ‘असून अडचण, नसून खोळंबा’

By admin | Updated: May 27, 2017 01:20 IST

सासडवमधून जाणाऱ्या पालखीमार्गाचे रखडलेले रुंदीकरण, उड्डाणपुलाचा अभाव, अरुंद रस्ते, त्यात भरधाव जाणारी वाहने यांमुळे सासवडमधून जाणारा महामार्ग येथील नागरिकांसाठी

बाळासाहेब कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : सासडवमधून जाणाऱ्या पालखीमार्गाचे रखडलेले रुंदीकरण, उड्डाणपुलाचा अभाव, अरुंद रस्ते, त्यात भरधाव जाणारी वाहने यांमुळे सासवडमधून जाणारा महामार्ग येथील नागरिकांसाठी ‘असून अडचण, नसून खोळंबा’ झाला आहे. या महामार्गामुळे सासवडचे दोन भाग पडल्याने रस्ता ओलांडताना नागरिकांची त्रेधा उडत आहे. सासवड शहरातून पालखी महामार्ग जात असून, त्यामुळे सासवडचे दोन भाग झाले आहेत. एका बाजूला शाळा, महाविद्यालय, भाजी मंडई, सासवडगाव, बाजारपेठ, बस स्थानक, पीएमटी स्थानक असून दुसऱ्या बाजूला वाढलेली लोकवस्ती आहे.सासवड शहराचा झपाट्याने विकास होत असून सोनोरी, अंबाडी, पारगाव या गावांकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला मोठ्या इमारती उभ्या आहेत. त्यामध्ये अनेक कुटुंबे राहतात. रहिवासी विभाग मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व लोकांना महामार्ग ओलांडून शाळा, महाविद्यालय, भाजी बाजार, बाजारपेठत यावे लागते. हा महामार्ग झाला तरी त्यावर कोणत्याच सोयी नाहीत. रास्ता ओलांडण्यासाठी पांढरे पट्टे नाहीत, वाहतूक नियंत्रक दिवे नाहीत, दुभाजक नाहीत; त्यामुळे वाहने वेगाने येत असतात. यामुळे महामार्ग ओलांडणे कठीण होते. त्यातही विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांची सर्वाधिक गैरसोय होते. हा महामार्ग तयार करताना एसटी स्थानकाजवळ उड्डाणपूल होणार होता, असे संगितले जाते. त्याचबरोबर शहरात जाण्यासाठी लहान रस्ते होणार होते. मात्र, यापैकी काहीच झालेले नाही. रस्ता मोठा झाला; पण इतर सोयी झाल्या नाहीत. राज्य शासनाच्या ताब्यात रस्ता होता, तो आता केंद्र शासनाकडे जाणार आहे. पालखी महामार्ग म्हणून त्याचा विकास होणार होता, असे समजते. मात्र, अद्याप काहीही काम झालेले नाही. यामुळे शहरात जाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते.