शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग ‘असून अडचण, नसून खोळंबा’

By admin | Updated: May 27, 2017 01:20 IST

सासडवमधून जाणाऱ्या पालखीमार्गाचे रखडलेले रुंदीकरण, उड्डाणपुलाचा अभाव, अरुंद रस्ते, त्यात भरधाव जाणारी वाहने यांमुळे सासवडमधून जाणारा महामार्ग येथील नागरिकांसाठी

बाळासाहेब कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : सासडवमधून जाणाऱ्या पालखीमार्गाचे रखडलेले रुंदीकरण, उड्डाणपुलाचा अभाव, अरुंद रस्ते, त्यात भरधाव जाणारी वाहने यांमुळे सासवडमधून जाणारा महामार्ग येथील नागरिकांसाठी ‘असून अडचण, नसून खोळंबा’ झाला आहे. या महामार्गामुळे सासवडचे दोन भाग पडल्याने रस्ता ओलांडताना नागरिकांची त्रेधा उडत आहे. सासवड शहरातून पालखी महामार्ग जात असून, त्यामुळे सासवडचे दोन भाग झाले आहेत. एका बाजूला शाळा, महाविद्यालय, भाजी मंडई, सासवडगाव, बाजारपेठ, बस स्थानक, पीएमटी स्थानक असून दुसऱ्या बाजूला वाढलेली लोकवस्ती आहे.सासवड शहराचा झपाट्याने विकास होत असून सोनोरी, अंबाडी, पारगाव या गावांकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला मोठ्या इमारती उभ्या आहेत. त्यामध्ये अनेक कुटुंबे राहतात. रहिवासी विभाग मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व लोकांना महामार्ग ओलांडून शाळा, महाविद्यालय, भाजी बाजार, बाजारपेठत यावे लागते. हा महामार्ग झाला तरी त्यावर कोणत्याच सोयी नाहीत. रास्ता ओलांडण्यासाठी पांढरे पट्टे नाहीत, वाहतूक नियंत्रक दिवे नाहीत, दुभाजक नाहीत; त्यामुळे वाहने वेगाने येत असतात. यामुळे महामार्ग ओलांडणे कठीण होते. त्यातही विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांची सर्वाधिक गैरसोय होते. हा महामार्ग तयार करताना एसटी स्थानकाजवळ उड्डाणपूल होणार होता, असे संगितले जाते. त्याचबरोबर शहरात जाण्यासाठी लहान रस्ते होणार होते. मात्र, यापैकी काहीच झालेले नाही. रस्ता मोठा झाला; पण इतर सोयी झाल्या नाहीत. राज्य शासनाच्या ताब्यात रस्ता होता, तो आता केंद्र शासनाकडे जाणार आहे. पालखी महामार्ग म्हणून त्याचा विकास होणार होता, असे समजते. मात्र, अद्याप काहीही काम झालेले नाही. यामुळे शहरात जाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते.