शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

महामार्ग ‘असून अडचण, नसून खोळंबा’

By admin | Updated: May 27, 2017 01:20 IST

सासडवमधून जाणाऱ्या पालखीमार्गाचे रखडलेले रुंदीकरण, उड्डाणपुलाचा अभाव, अरुंद रस्ते, त्यात भरधाव जाणारी वाहने यांमुळे सासवडमधून जाणारा महामार्ग येथील नागरिकांसाठी

बाळासाहेब कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : सासडवमधून जाणाऱ्या पालखीमार्गाचे रखडलेले रुंदीकरण, उड्डाणपुलाचा अभाव, अरुंद रस्ते, त्यात भरधाव जाणारी वाहने यांमुळे सासवडमधून जाणारा महामार्ग येथील नागरिकांसाठी ‘असून अडचण, नसून खोळंबा’ झाला आहे. या महामार्गामुळे सासवडचे दोन भाग पडल्याने रस्ता ओलांडताना नागरिकांची त्रेधा उडत आहे. सासवड शहरातून पालखी महामार्ग जात असून, त्यामुळे सासवडचे दोन भाग झाले आहेत. एका बाजूला शाळा, महाविद्यालय, भाजी मंडई, सासवडगाव, बाजारपेठ, बस स्थानक, पीएमटी स्थानक असून दुसऱ्या बाजूला वाढलेली लोकवस्ती आहे.सासवड शहराचा झपाट्याने विकास होत असून सोनोरी, अंबाडी, पारगाव या गावांकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला मोठ्या इमारती उभ्या आहेत. त्यामध्ये अनेक कुटुंबे राहतात. रहिवासी विभाग मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व लोकांना महामार्ग ओलांडून शाळा, महाविद्यालय, भाजी बाजार, बाजारपेठत यावे लागते. हा महामार्ग झाला तरी त्यावर कोणत्याच सोयी नाहीत. रास्ता ओलांडण्यासाठी पांढरे पट्टे नाहीत, वाहतूक नियंत्रक दिवे नाहीत, दुभाजक नाहीत; त्यामुळे वाहने वेगाने येत असतात. यामुळे महामार्ग ओलांडणे कठीण होते. त्यातही विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांची सर्वाधिक गैरसोय होते. हा महामार्ग तयार करताना एसटी स्थानकाजवळ उड्डाणपूल होणार होता, असे संगितले जाते. त्याचबरोबर शहरात जाण्यासाठी लहान रस्ते होणार होते. मात्र, यापैकी काहीच झालेले नाही. रस्ता मोठा झाला; पण इतर सोयी झाल्या नाहीत. राज्य शासनाच्या ताब्यात रस्ता होता, तो आता केंद्र शासनाकडे जाणार आहे. पालखी महामार्ग म्हणून त्याचा विकास होणार होता, असे समजते. मात्र, अद्याप काहीही काम झालेले नाही. यामुळे शहरात जाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते.