शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

उच्च शिक्षित तरुणांना विकासाच्या संधी मिळत नाहीत- गिरीश प्रभुणे यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:22 IST

पुणेः- केवळ लिहिता-वाचता आले, एवढे सोडता पारंपरिक शिक्षणाचा माझ्या सामाजिक कार्याला काहीही फायदा झाला नाही. आजही उच्च शिक्षण घेऊन ...

पुणेः- केवळ लिहिता-वाचता आले, एवढे सोडता पारंपरिक शिक्षणाचा माझ्या सामाजिक कार्याला काहीही फायदा झाला नाही. आजही उच्च शिक्षण घेऊन तरुणांना नोक-या नाहीत. मी ज्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत आहे, त्या समाजातील तरुण उच्च शिक्षित असूनही, त्यांना विकासाच्या संधी मिळत नसल्याची खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा, पुणे आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था, सातारा यांच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, विचारवंत आणि वक्ते स्व. डाॅ. निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना जीवनगौरव पुरस्कार रविवारी (दि.१०) प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी डाॅ. संभाजी मलघे यांना ''''''''आचार्यदर्शन'''''''' या ग्रंथासाठी आणि प्रा. जे. पी. देसाई यांना ''''''''माझी भाषणे, प्रसंग आणि आठवणी'''''''' या ग्रंथासाठी साहित्य पुरस्कार, तर पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांना सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले, तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, तसेच महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, अध्यक्ष उद्धव कानडे, उपाध्यक्ष रवींद्र डोमाळे आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थचे अध्यक्ष शिरीष चिटणीस आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रभुणे यांनी साहित्यातून सामाजिक काम करण्याची प्रेरणा मिळाली असल्याची भावना व्यक्त केली .

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले की, पूर्वीच्या काळात वेगवेगळ्या विचारधारांच्या चळवळी कार्यरत होत्या आणि प्रत्येकाला एकमेकांच्या चळवळीविषयी आदर होता. काळाच्या ओघात या उदारतेची जागा कट्टरतेने घेतली. ही कट्टरता इतकी वाढली की, एकमेकांच्या कामाचा आदर करणे आपण विसरून गेलो आहोत.

प्रा. मिलिंद जोशी यांनी समाजातील विचारवंतांनी देखील डावे-उजवे आदी सर्व भेद, भाव, द्वेष, कल दूर सारून समान व्यासपीठावर एकत्र येऊन समाजाला एकसूत्रात बांधण्याचे काम केले पाहिजे असे नमूद केले.

प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी, तर उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन इटकर यांनी आभार मानले.

.....