शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

उच्च शिक्षित तरुणांना विकासाच्या संधी मिळत नाहीत- गिरीश प्रभुणे यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:22 IST

पुणेः- केवळ लिहिता-वाचता आले, एवढे सोडता पारंपरिक शिक्षणाचा माझ्या सामाजिक कार्याला काहीही फायदा झाला नाही. आजही उच्च शिक्षण घेऊन ...

पुणेः- केवळ लिहिता-वाचता आले, एवढे सोडता पारंपरिक शिक्षणाचा माझ्या सामाजिक कार्याला काहीही फायदा झाला नाही. आजही उच्च शिक्षण घेऊन तरुणांना नोक-या नाहीत. मी ज्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत आहे, त्या समाजातील तरुण उच्च शिक्षित असूनही, त्यांना विकासाच्या संधी मिळत नसल्याची खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा, पुणे आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था, सातारा यांच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, विचारवंत आणि वक्ते स्व. डाॅ. निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना जीवनगौरव पुरस्कार रविवारी (दि.१०) प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी डाॅ. संभाजी मलघे यांना ''''''''आचार्यदर्शन'''''''' या ग्रंथासाठी आणि प्रा. जे. पी. देसाई यांना ''''''''माझी भाषणे, प्रसंग आणि आठवणी'''''''' या ग्रंथासाठी साहित्य पुरस्कार, तर पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांना सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले, तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, तसेच महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, अध्यक्ष उद्धव कानडे, उपाध्यक्ष रवींद्र डोमाळे आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थचे अध्यक्ष शिरीष चिटणीस आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रभुणे यांनी साहित्यातून सामाजिक काम करण्याची प्रेरणा मिळाली असल्याची भावना व्यक्त केली .

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले की, पूर्वीच्या काळात वेगवेगळ्या विचारधारांच्या चळवळी कार्यरत होत्या आणि प्रत्येकाला एकमेकांच्या चळवळीविषयी आदर होता. काळाच्या ओघात या उदारतेची जागा कट्टरतेने घेतली. ही कट्टरता इतकी वाढली की, एकमेकांच्या कामाचा आदर करणे आपण विसरून गेलो आहोत.

प्रा. मिलिंद जोशी यांनी समाजातील विचारवंतांनी देखील डावे-उजवे आदी सर्व भेद, भाव, द्वेष, कल दूर सारून समान व्यासपीठावर एकत्र येऊन समाजाला एकसूत्रात बांधण्याचे काम केले पाहिजे असे नमूद केले.

प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी, तर उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन इटकर यांनी आभार मानले.

.....