शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

माळेगाव कारखान्याचा उच्चांकी २७५० रुपये दर

By admin | Updated: January 4, 2017 05:17 IST

येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने उच्चांकी उचल देण्याची परंपरा कायम राखली आहे. सध्या उसाची कमतरता असतानादेखील धाडसाने कारखाना सुरू करण्यात आला.

बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने उच्चांकी उचल देण्याची परंपरा कायम राखली आहे. सध्या उसाची कमतरता असतानादेखील धाडसाने कारखाना सुरू करण्यात आला. यंदाच्या गळीत हंगामासाठी २७५० रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील अन्य सहकारी साखर कारखान्यांच्या तुलनेत हा दर सर्वाधिक आहे. या संदर्भात संचालक मंडळाची बैठक झाली. मागील वर्षी या कारखान्याने २८०० रुपये उच्चांकी दर दिला होता. तीच परंपरा कायम राखत प्रतिकूूल परिस्थितीतदेखील या कारखान्याने २७५० रुपये दर जाहीर केला आहे. एफआरपीपेक्षा ३५४ रुपये जादा दर दिला आहे. राज्यात गेटकेनधारकांना एफआरपीपेक्षा १७५ ते २०० रुपये जादा दर दिला आहे. गेटकेनधारकांना हा अंतिम दर आहे. तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना २७५० रुपये पहिला हप्ता देण्यात येणार आहे. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे, कार्यकारी संचालक विजय वाबळे यांच्यासह संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. माळेगावच्या सभासदांना पहिला हप्तादेखील सर्वाधिक देण्यात आला आहे. या संदर्भात माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माळेगाव सर्वाधिक दर देणार, असे जाहीर केले होते. त्यामुळे आमच्यावर सभासद, गेटकेनधारकांनी विश्वास ठेवला. काही मंडळींनी चुकीची माहिती देण्याच्या प्रयत्न केला, परंतु त्यांच्या भूलथापांना बळी न पडता माळेगाव कारखान्याला ऊस दिला. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून पहिली उचल राज्यात सर्वाधिक दिली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दराची स्पर्धा करावी..सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची नेतेमंडळी चुकीची माहिती देत आहेत. या नेत्यांनी त्यांच्या ताब्यातील छत्रपती, सोमेश्वरसह अन्य खासगी कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जादा दर देण्यासाठी स्पर्धा करावी, असेही तावरे यांनी जाहीर आव्हान दिले. शेतकऱ्यांना जादा दराचा फायदा कसा होईल, याकडे लक्ष दिल्यास अधिक चांगले होईल, असा टोला त्यांनी मारला.अधिक शेअर्स कापणार नाही... : सध्या शेअर्स कपातीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण केली जात आहे. शेतकऱ्यांनी चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता, कारखान्याकडे ८ अ, ७/१२ जमा करावा, त्यांच्या क्षेत्रापेक्षा अधिक शेअर्स कापले जाणार नाहीत, असे तावरे यांनी सांगितले.