शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

मुस्लिम विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाण सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:08 IST

राहुल शिंदे पुणे : राज्याच्या शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय ...

राहुल शिंदे

पुणे : राज्याच्या शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) संवर्गातील विद्यार्थ्यांपेक्षा मुस्लिम विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाण जास्त असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यातही मुस्लिम मुलींपेक्षा मुस्लिम मुले शाळा जास्त प्रमाणात सोडत आहेत.

शालेय शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संवर्गनिहाय माहिती दिली आहे. त्यात प्राथमिकपेक्षा उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावरून शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मुस्लिम कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, रोजगाराच्या अपुऱ्या संधी, कुटुंबाच्या व्यवसायात करावी लागणारी मदत आदी कारणांमुळे मुस्लिम मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जाते. मात्र हीच कारणे एससी, एसटी, ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांनाही लागू असतानाही या संवर्गातील विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाण मुस्लिम विद्यार्थ्यांपेक्षा कमी आहे.

चौकट

संवर्गनिहाय शाळा सोडणाऱ्या मुला-मुलींची टक्केवारी (माध्यमिक)

संवर्ग -मुले -मुली -एकूण

खुला -०.८३ -१.३४ -१.०६

एससी -७.६४ -७.४० -७.५२

एसटी -१२.४८ -१२.९९ -१२.७१

ओबीसी -४.१३ -४.८९ -४.४८

मुस्लिम -१६.२७ -१०.७७ -१३.६४

चौकट

“मुस्लिम कुटुंबातील अनेक पालकांना शाश्वत रोजगार नसतो. त्यांची कमाईसुद्धा खूप नसते. त्यामुळे मुस्लिम मुलांमध्ये बालमजुरी व शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. मुस्लिम मुलींच्या तुलनेत मुस्लिम मुले रोजगाराचा शोध लवकर घेतात. परिणामी, मुलींपेक्षा मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाण जास्त आहे. यात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.”

- शुभा शमिम , शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या

चौकट

“मुस्लिम समाजातील अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. कुटुंबातील पालकच अशिक्षित असल्याने मुला-मुलींच्या शिक्षणाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. शिक्षण सुरू असतानाच मुले कुटुंबाच्या व्यवसायात मदतीला सुरुवात करतात. त्यामुळे त्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. शासनाने याचा विचार करून एक अभ्यास गट स्थापन करून मुस्लिम मुला-मुलींच्या शिक्षणासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.”

-अन्वर राजन, सामाजिक कार्यकर्ते