शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

लॉकडाऊनच्या काळात उच्च मध्यमवर्गीयांमध्ये सर्वाधिक व्यसनाधिनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:08 IST

´पुणे : लॉकडाऊनच्या काळात ३१ ते ५० या वयोगटातील लोक व्यसनाधिनतेकडे जास्त झुकताना दिसले. त्याचबरोबर १० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न् ...

´पुणे : लॉकडाऊनच्या काळात ३१ ते ५० या वयोगटातील लोक व्यसनाधिनतेकडे जास्त झुकताना दिसले. त्याचबरोबर १० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न् असलेले लोक जास्त व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहेत. लॉकडाऊनचा समाजावर झालेला परिणाम तपासण्यासाठी पोलिसांकडून प्रोजेक्ट आरसा राबविला होता. त्यात हे धक्कादायक निष्कर्ष समोर आले. पुणे शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, विशेष शाखेचे उपायुक्त मितेश घट्टे, पोलीस संशाेधन केंद्र प्रमुख अनंत भोईटे यांच्या पुढाकाराने मन:सृष्टी संस्थेने हा प्रकल्प केला. गेल्या २ महिन्यात आरसा हा संशोधन उपक्रम राबविला. या उपक्रमात पुण्यातील ३ हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. त्यात सिने अभिनेते, डॉक्टर, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांपासून रिक्षाचालक, रोजंदारीवरील कामगार, प्रशासकीय अधिकारी यांचा सहभाग होता.

या संशोधनाच्या निष्कर्षामध्ये असे जाणवले की, ३१ ते ५० आणि ज्येष्ठ नागरिक यांना लॉकडाऊनमधील परिस्थितीशी जुळवून घेणे जास्त कठीण गेले. ज्येष्ठ नागरिकांना एकटेपणा वाढला. महिलांवर कामाचा ताण वाढला. रोजंदारीवर काम करणारा वर्ग निराश व व्यसनाधीनतेकडे झुकताना दिसला. गुन्हेगारी प्रवृत्तीकडे कल सर्वात जास्त याच वर्गात दिसून आला. त्यामुळे या वर्गासाठी लवकरात लवकर रोजगार निर्मिती करणे गरजेचे आहे. मजुरांच्या खालोखाल विद्यार्थी वर्ग सुद्धा गुन्हेगारी प्रवत्तीकडे कल दाखवत आहे. त्यामुळे विद्यार्थी चांगल्या गोष्टीत रमतील, असे उपक्रम शासन व समाजाने सुरु करणे गरजेचे आहे.

नैराश्य वाढल्यामुळे व्यसनाधीनता वाढू शकते आणि व्यसनाधीनता वाढल्यामुळे गुन्हेगारी वाढू शकते. या तीनही गोष्टींचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे, असे हे संशोधन सांगते.

लाॅकडाऊनच्या काळात अनेक जण नवीन गोष्टी शिकले. त्यामध्ये स्वयंपाक, कला, वाचन, लिखाण, भाषा, वेगवेगळ्या प्रकाराचे ऑनलाईन कोर्सेस अशा अनेक गोष्टी आहेत. स्वत:च्या आरोग्यासाठी व्यायाम, योग, ध्यान या गोष्टी करणे का महत्वाचे आहे हे मोठ्या प्रमाणात लोकांच्या लक्षात आले. मित्र, नातेवाईक यांच्याशी नव्याने झालेला संपर्क अनेकांसाठी सुखावणारा ठरला आहे. काही कुटुंबातील नाती खूप चांगली सुद्धा झाली आहेत.

या प्रकल्पात पोलिसांच्या सहकार्याने मन:सृष्टी या शारीरीक व मानसिक आरोग्य विषयक सामाजिक काम करणाऱ्या संस्थेच्या ३० स्वयंसेवकांनी एक महिन्याहून अधिक काळ काम केले. यापुढील काळात लॉकडाऊन सारखा उपाय करावा लागला तर कोणत्या गोष्टी लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे आहे. या उत्तम अंदाज समाज व प्रशासकीय यंत्रणांना देणारे हे संशोधन आहे.