शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

दुसऱ्या हंगामातही राज्यात उच्चांकी दर

By admin | Updated: March 27, 2017 02:26 IST

गतवर्षीप्रमाणे यंदाही माळेगाव सहकारी साखर कारखान्याने राज्यात एफआरपीपेक्षा जादा दर देऊन राज्यात अग्रक्रमांक

बारामती : गतवर्षीप्रमाणे यंदाही माळेगाव सहकारी साखर कारखान्याने राज्यात एफआरपीपेक्षा जादा दर देऊन राज्यात अग्रक्रमांक पटकावला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे, ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी दिली. सन २०१५/१६ च्या गळीत हंगामातील उर्वरित १३८ रुपये प्रतिटनी सभासदांच्या खात्यावर जमा केले. कारखान्याने पहिला हप्तादेखील सर्वाधिक २७५० जाहीर केला. १३४ दिवसांनी कारखान्याचा गळीत हंगाम संपला आहे. उसाची कमतरता असतानादेखील सभासद आणि गेटकेनधारकांच्या उसामुळे ६ लाख ८७ हजार ९९६ टन गाळप करण्यात यश आले. या हंगामातील उसासाठी सभासदांना २८५० आणि खोडकी, अनुदानासह ३ हजार रुपयेइतका उच्चांकी दर मिळणार आहे, हा दर राज्यात सर्वाधिक आहे. या गळीत हंगामात ११.६० इतका सरासरी साखर उतारा राखून ६ लाख, ८७ हजार ९९६ टन उसाचे गाळप केले. ७ लाख ९७ हजार १०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. या हंगामातील एफआरपीप्रमाणे २३९६ रुपयांचा पहिला हप्ता सभासदांना दिला आहे. कारखान्याच्या सभासदांना खोडकी, अनुदानासह ३ हजार रुपये दर मिळणार आहे. गेटकेनधारकांना २७५० रुपये दर मिळणार आहे. कारखान्याचे विस्तारीकरण सर्वसाधारण सभेत मंजूर झाल्याप्रमाणे शासनाची आणि न्यायालयाची परवानगी घेऊन करण्यात येणार आहे. विस्तारीकरणामुळे परीक्षेतील अतिरिक्त उसाचे गाळप करण्यास अडचण येणार नाही, यासाठी येणाऱ्या पन्नास टक्के खर्चाची तरतूद कारखान्याने केली आहे. उर्वरित ५० टक्केकर्ज घेणार आहे. माळेगावच्या उसाच्या दरामुळे स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे शेजारच्या कारखान्यांसह खासगी कारखान्यांना एफआरपीपेक्षा अधिक दर द्यावा लागणार आहे. विरोधकांकडे हा कारखाना नसता, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जादा दर मिळाला नसता, असे त्यांनी सांगितले. माळेगाव कारखान्याने सहवीजनिर्मिती, स्पिरीट, इथेनॉल, आदी उपपदार्थांचे उच्चांकी उत्पादन केले. त्याबरोबर आॅनलाईन खरेदी पद्धतीमुळे १० कोटी ५० लाख रुपयांची बचत झाली. माळेगाव कारखान्याच्या कारभाराबाबत अजित पवार सातत्याने सभासदांना दिशाभूल करणारे वक्तव्य करतात. बारामती तालुक्यातील पणदरे येथील कार्यक्रमात पवार यांनी दर किती दिला तरी उसाचे चिपाडे झाले आहेत, अशी टीका केली होती. यापूर्वीदेखील कारखाने अगदी एप्रिलपर्यंत चालले आहेत, ही वस्तुस्थिती आहे.अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील कारखाने जास्त काळ चालले, तेव्हा उसाचे चिपाडे झाली नाहीत का, याचे उत्तर त्यांनी द्यावे, अशी टीका रंजन तावरे यांनी केली. माळेगाववर टीका करण्यापूर्वी त्यांच्या ताब्यातील कारखान्यांकडे असलेल्या फरकाची रक्कम द्यावी, तोपर्यंत माळेगावच्या दराबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार अजित पवार यांना नाही. अजित पवार यांच्या टीकेकडे लक्ष न देता सभासदांच्या हितासाठी कारखाना चालविला. जास्त उत्पादन केले. त्यामुळे अधिकच दर देणे शक्य झाले आहे, असे तावरे यांनी सांगितले. या वेळी अ‍ॅड. जी. बी. गावडे, विजयसिंह गवारे, अविनाश देवकाते, शशिकांत जगताप, जनार्धन झांबरे, प्रमोद गावडे, सुनील सातव, दीपक नवले, चिंतामणी नवले, लक्ष्मण जगताप, जवाहर इंगुले, विलास देवकाते, राजाभाऊ देवकाते, युवराज जाधव, प्रशांत शिंदे, शशिकांत तावरे, धनंजय गवारे, संग्राम काटे, संजय तावरे, अधीक्षक जवाहर सस्ते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जास्तीचा दर देण्याकडे विशेष लक्षमाळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पॅनलचा पराभव करून आमच्याकडे सत्ता दिली. त्यामुळे सभासदांना जास्तीचा दर मिळावा, याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे सन २०१५-१६ च्या हंगामात सर्वाधिक २८०० रुपये दर दिला आहे. त्यातील १३८ रुपये सरकारच्या परवानगीने सभासदांच्या खात्यावर जमा केले. हंगामातील गाळपाला खोडकी अनुदानासह २८७५ रु. दर देणे शक्य झाल्याचे तावरे यांनी सांगितले.