शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीत छुपी वाढ; नागरिक त्रस्त

By admin | Updated: May 24, 2016 06:19 IST

इंदापूर, दौंडसाठी जादाचे पाणी सोडताना शहराच्या पाणीकपातीमध्ये कोणतीही वाढ करण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र प्रत्यक्षात शहराच्या विविध भागांत पाणीकपातीमध्ये

पुणे : इंदापूर, दौंडसाठी जादाचे पाणी सोडताना शहराच्या पाणीकपातीमध्ये कोणतीही वाढ करण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र प्रत्यक्षात शहराच्या विविध भागांत पाणीकपातीमध्ये वाढ झाल्याचे अनुभव नागरिकांना येत आहेत. या पाणीकपातीमधील छुप्या वाढीमुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत.यंदा सरासरीपेक्षा निम्माच पाऊस झाल्याने सप्टेंबर महिन्यापासून शहराच्या पाण्यात ३० टक्के कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत केली आहे. मात्र, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या आग्रहाखातर पुणेकरांनी बचत केलेल्या पाण्यातून दौंड, इंदापूरसाठी वाढीव पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे पुणेकरांना आणखी वाढीव पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. ती भीती खरी होताना दिसून येत आहे.कोथरूड तसेच शहरातील पेठांमध्ये पाणी खूपच कमी दाबाने येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पाणीकपातीमध्ये वाढ झाल्याचा हा परिणाम असल्याचा समज नागरिकांचा होत आहे, तरी महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी याची चौकशी करून खुलासा करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचच्या वतीने विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे यांनी केली आहे.पाणी सोडण्याच्या वेळा व पाण्याचा दाब कमी झाल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. त्याचबरोबर विद्युतविषयक कामे करायची असल्याचे सांगून आठवड्यातून एक -दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे धोरण पालिकेकडून स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे आणखी काही दिवस नागरिकांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागणार आहेत.सप्टेंबर महिन्यापासून 30%पाण्यात कपात पुणेकरांनी बचत केलेल्या पाण्यातून दौंड, इंदापूरसाठी वाढीव पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे पुणेकरांना आणखी वाढीव पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.