शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

अघटित रोखण्यासाठी पोलिसांची मदत करा

By admin | Updated: November 25, 2015 01:12 IST

दहशतवादासारख्या समाजविघातक कारवाया रोखण्यासाठी पोलिसांनी काहीतरी केले पाहिजे, असे वाटत असेल तर नागरिकांनीही सजग राहून पोलिसांची मदत केली पाहिजे.

पुणे : दहशतवादासारख्या समाजविघातक कारवाया रोखण्यासाठी पोलिसांनी काहीतरी केले पाहिजे, असे वाटत असेल तर नागरिकांनीही सजग राहून पोलिसांची मदत केली पाहिजे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चुकीच्या गोष्टीबद्दल नागरिकांनी पोलिसांना सांगावे, तो आपला हक्क आहे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केले.दीक्षित यांनी मंगळवारी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूलला भेट दिली. ते या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी त्यांचा सत्कार केला.या वेळी प्रवीण दीक्षित यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी प्रवीण दीक्षित यांच्या पत्नी अरूंधती दीक्षित, डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह शामकांत देशमुख, सहसचिव जोत्स्ना एकबोटे, मॉर्डन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मानसी शास्त्री, मॉर्डन हायस्कूल शाला समितीचे अध्यक्ष चित्तरंजन कांबळे, प्रमुख्याध्यापक शरद इनामदार, माजी विद्यार्थी, मॉर्डन हायस्कुलचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा देत प्रवीण दीक्षित म्हणाले, या शाळेतील शिक्षकांनी माझ्यावर चांगले संस्कार केले. त्यांनी स्वत:च्या मुलांपेक्षा जास्त लक्ष आमच्याकडे दिले असेल, त्यामुळेच आम्ही घडू शकलो. शिक्षण हे मातृभाषेतच घेतले पाहिजे. परखड विचार आणि साहित्याची समज यासाठी मातृभाषातील शिक्षणच महत्त्वाचे ठरते. विद्यार्थ्यांना नवनिर्मिती करण्यासाठी शाळेकडून प्रोत्साहन देण्यात यावे. मुलांचा राग आला तरी त्याला हिणवू नये. कारण मुले अतिशय संवेदनशील असतात. शिक्षकांनी दुर्लक्ष करण्याचा त्याचा मनावर खोलवर परिणाम होऊ शकतो.एकबोटे म्हणाले, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटिच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला चांगले शिक्षण कसे मिळेल यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहीजेत. एसएमएसला लगेच उत्तर देणारे आणि एवढ्या मोठ्या पदावर असूनदेखील बोलण्यामध्ये अतिशय सौम्यपणा असलेले दीक्षित हे एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत. मुख्याध्यापिका शास्त्री यांनी मॉर्डन हायस्कूलच्या ८० वर्षांच्या वाटचालीची माहिती उपस्थितांसमोर मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृगजा कुलकर्णी यांनी केले. निवेश पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)