शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

रत्नागिरीत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मुंबईसह कोकणात हवामान विभागाने रेड अ‍ॅलर्ट दिल्यानंतर मुंबईत पाऊस झाला नसला तरी कोकणात अनेक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मुंबईसह कोकणात हवामान विभागाने रेड अ‍ॅलर्ट दिल्यानंतर मुंबईत पाऊस झाला नसला तरी कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून, रत्नागिरीत अतिवृष्टी झाली. विदर्भातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस झाला असलातरी मध्य महाराष्ट्र अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

गेल्या २४ तासांत रत्नागिरी २४०, कणकवली, राजापूर १३०, दोडामार्ग, सावंतवाडी १२०, दापोली, मुल्दे ११०, गुहागर, लांजा, म्हसळा, संगमेश्वर, देवरुख, वालपोई ९०, माणगाव ८०, कुडाळ, पोलादपूर ७० मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

मध्य महाराष्ट्रात चांदगड, गगनबावडा ५०, महाबळेश्वर ३०, आजारा, लोणावळा २० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यातील धर्माबाद ९०, परभणी ७०, हदगाव ६०, अहमदपूर, किनवट, माहूर ५०, अर्धापूर, जिंतूर, उमारी ४० मिमी पावसाची नोंद झाली.

विदर्भातील आर्णी ८०, बल्लारपूर, गौड पिंपरी ५०, चंद्रपूर, उमरखेड ४०, दिग्रस, घाटंजी, जिवती, राजुरा ३० मिमी पाऊस झाला असून, सर्वदूर हलका पाऊस झाला आहे. घाटमाथ्यावर मात्र पावसाचे प्रमाण अजूनही कमी आहे.

रविवारी रात्रभर मुसळधार पावसानंतर सोमवारी दिवसभरात रत्नागिरीमध्ये पावसाने विश्रांती घेतली असून, दिवसभरात केवळ ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर ३ आणि कोल्हापूर १ मिमी पाऊस झाला आहे.

घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता

हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवस येलो अ‍ॅलर्ट दिला असून जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांबरोबरच विदर्भातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.