शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

भोरगिरी आणि भिमाशंकर परिसरात मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:09 IST

या परिसरात गेली अनेक दिवस पावसाने दडी मारली होती. भोरगिरी, भिमाशंकर या परिसरात मागील १८ तासात जोरदार पाऊस ...

या परिसरात गेली अनेक दिवस पावसाने दडी मारली होती.

भोरगिरी, भिमाशंकर या परिसरात मागील १८ तासात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भीमाशंकर भोरगिरी परिसरात ३३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भिवेगाव, भोमाळे, टोकावडे, मंदोशी, मोरोशी, खरपूड, कुडे, नायफड,भोरगिरी, कारकुडी, धामणगाव खुर्द, शिरगाव या गावांच्या परिसरात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. पश्चिम भागातील शेतकरी चक्रीवादळाच्या नुकसाणीतून कुठे सावरत असतानाच बुधवारी रात्री झालेल्या पाऊसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेताचे बांध वाहून गेले भात पिके गाडली गेली शेती उद्ध्वस्त झाली. भीमा नदीला महापूर आल्याने पाभे गावात पाणी शिरले होते.भोमाळे, पाभे गावातील भिमानदिवरील दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने पुलाचे कठडे तुटले. संरक्षक खांब वाहून गेले. दरम्यान पावसाचा जोर कमी झाला असून भिमानदीचा पूर ओसरला आहे. मंदोशी गावाच्या जावळेवाडीतील नवा पूल वाहून गेल्याने नागरिकांना जाण्यायेण्यासाठी रस्ता बंद झाला आहे. नायफड येथील माती बंधारा फुटल्याने बंधाऱ्याच्या पाण्याने व मातीने खाली असलेल्या शेताचे बांध, ताली, भातरोप असणारे २५ ते ३० शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील धान्य कपडे चीजवस्तू व संसारोपयोगी वस्तू भिजुन गेल्या. गडदुबाई मंदिरासमोरील भराव पाऊसाच्या पाण्याने वाहून गेला आहे. शेती पिकांचे झालेल्या नुकसानीचे महसुल विभागाने पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तहसीलदार डाँ.वैशाली वाघमारे, वाडा मंडलधिकारी शरद गोडे आणि तलाठी कर्मचाऱ्यांसह डेहणे भोरगिरी परीसरातील नुकसानग्रस्त भागाची पहाणी करुन नुकसानीचा अंदाज घेतला आहे.

कोट

तालुक्याच्या पश्चिम भागातअतिवृष्टी झाली होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाझर तलाव, शेतीचे बांध फुटून भात रोपे पिके मातीत गेली आहे. घरांमध्ये पाणी शिरले यासह पिकांचे मोठे नुकसान झाले पिकांसह नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी प्रांत व तहसिलदार याच्याकडे केली आहे.

-अतुल देशमुख (जिल्हा परिषद ,सदस्य )

फोटो ओळ: नायफड येथे वाघदरा येथील मातीचा बंधारा पाऊसाने फुटून गेला.

फोटो ओळ: अतिवृष्टीने भात रोपे वाहून गेली.

फोटो ओळ: नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना तहसिलदार वैशाली वाघमारे.