शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भोरगिरी आणि भिमाशंकर परिसरात मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:09 IST

या परिसरात गेली अनेक दिवस पावसाने दडी मारली होती. भोरगिरी, भिमाशंकर या परिसरात मागील १८ तासात जोरदार पाऊस ...

या परिसरात गेली अनेक दिवस पावसाने दडी मारली होती.

भोरगिरी, भिमाशंकर या परिसरात मागील १८ तासात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भीमाशंकर भोरगिरी परिसरात ३३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भिवेगाव, भोमाळे, टोकावडे, मंदोशी, मोरोशी, खरपूड, कुडे, नायफड,भोरगिरी, कारकुडी, धामणगाव खुर्द, शिरगाव या गावांच्या परिसरात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. पश्चिम भागातील शेतकरी चक्रीवादळाच्या नुकसाणीतून कुठे सावरत असतानाच बुधवारी रात्री झालेल्या पाऊसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेताचे बांध वाहून गेले भात पिके गाडली गेली शेती उद्ध्वस्त झाली. भीमा नदीला महापूर आल्याने पाभे गावात पाणी शिरले होते.भोमाळे, पाभे गावातील भिमानदिवरील दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने पुलाचे कठडे तुटले. संरक्षक खांब वाहून गेले. दरम्यान पावसाचा जोर कमी झाला असून भिमानदीचा पूर ओसरला आहे. मंदोशी गावाच्या जावळेवाडीतील नवा पूल वाहून गेल्याने नागरिकांना जाण्यायेण्यासाठी रस्ता बंद झाला आहे. नायफड येथील माती बंधारा फुटल्याने बंधाऱ्याच्या पाण्याने व मातीने खाली असलेल्या शेताचे बांध, ताली, भातरोप असणारे २५ ते ३० शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील धान्य कपडे चीजवस्तू व संसारोपयोगी वस्तू भिजुन गेल्या. गडदुबाई मंदिरासमोरील भराव पाऊसाच्या पाण्याने वाहून गेला आहे. शेती पिकांचे झालेल्या नुकसानीचे महसुल विभागाने पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तहसीलदार डाँ.वैशाली वाघमारे, वाडा मंडलधिकारी शरद गोडे आणि तलाठी कर्मचाऱ्यांसह डेहणे भोरगिरी परीसरातील नुकसानग्रस्त भागाची पहाणी करुन नुकसानीचा अंदाज घेतला आहे.

कोट

तालुक्याच्या पश्चिम भागातअतिवृष्टी झाली होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाझर तलाव, शेतीचे बांध फुटून भात रोपे पिके मातीत गेली आहे. घरांमध्ये पाणी शिरले यासह पिकांचे मोठे नुकसान झाले पिकांसह नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी प्रांत व तहसिलदार याच्याकडे केली आहे.

-अतुल देशमुख (जिल्हा परिषद ,सदस्य )

फोटो ओळ: नायफड येथे वाघदरा येथील मातीचा बंधारा पाऊसाने फुटून गेला.

फोटो ओळ: अतिवृष्टीने भात रोपे वाहून गेली.

फोटो ओळ: नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना तहसिलदार वैशाली वाघमारे.