शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

दरमहा तीनशे प्रकरणांवर सुनावणी

By admin | Updated: June 2, 2017 02:48 IST

‘स्थायी लोकअदालत’ या आधुनिक न्यायप्रक्रियेनुसार सुरू असलेल्या न्यायालयात आजतागायत पुण्यातील शंभरहून अधिक प्रकरणे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘स्थायी लोकअदालत’ या आधुनिक न्यायप्रक्रियेनुसार सुरू असलेल्या न्यायालयात आजतागायत पुण्यातील शंभरहून अधिक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तसेच दरमहा सुमारे तीनशे प्रकरणांवर सुनावणी केली जाते.न्यायालयात वषार्नुवर्षे चालणारे खटले, न्यायाच्या अपेक्षेत हेलपाटे करणारे नागरिक अशी परिस्थिती अनेक न्यायालयांमध्ये दिसून येते. वेळ आणि पैशाचा अपव्यय करूनही निकाल कधी लागेल,याची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी स्थायी लोकअदालतमुळे दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यात मुंबई, नागपूर, औरंगाबाद व पुणे या चार ठिकाणी ‘स्थायी लोकअदालत’ स्थापन करण्यात आली आहे.‘स्थायी लोकअदालत’मुळे नागरिकांना जलद न्याय मिळण्यास मदत होणार आहे. मध्यम मार्ग काढून तडजोडीची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यात येतात. मात्र, त्याला नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही. याबाबत जनजागृती होण्याची आवश्यकता आहे, असेही व्यवस्था राबविणाऱ्यांचे म्हणणे आहे. लोकउपयोगी सेवांसंबंधित तक्रारींच्या निवारणासाठी ‘स्थायी लोकअदालत’ स्थापन करण्यात आले आहे. लोकांमध्ये संवाद घडवून मध्यममार्ग काढून खटला निकाली काढण्यास प्राधान्य दिले जाते. यामध्ये वाहतूक, सेवा, टपाल, तार, दूरध्वनी, वीज, पाणीपुरवठा, नदी, नाले, बंदरे, आरोग्य सेवा, विमा, निवृत्त वेतन यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. शिक्षण व निवारा (बांधकाम व्यवसाय) यांचाही समावेश लोकउपयोगी सेवांमध्ये करण्यात आला आहे. त्याबाबतच्या खटल्यांची सुनावाणीही ‘स्थायी लोकअदालत’मध्ये करण्यात येते. ‘स्थायी लोकअदालत’मध्ये निवृत्त न्यायाधीश अध्यक्ष असून सार्वजनिक उपयुक्तता सेवांबाबत दोन अनुभवी व्यक्ती सदस्यपदी काम पाहतात. त्याचप्रमाणे स्थायी लोकअदालतमध्ये पंचवीस लाख रुपये किंमतीपर्यंतचे वाद सामंजस्याने सोडविले जातात. महत्त्वाचे म्हणजे प्रकरणांचा निकाल गुणवत्तेनुसार लावला जातो. त्यामुळे बरीचशी प्रकरणे प्रचलित न्यायालयांमध्ये दाखल होण्यापूर्वीच निकाली निघू शकतात.दूरध्वनी सेवेसंदर्भात अधिक तक्रारीपुण्यातील या न्यायालयात आतापर्यंत सर्वाधिक तक्रारी या दूरध्वनीसेवेसंदर्भात आल्या असून त्यानंतर बांधकाम व्यावसायिकांविरोधात तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण अधिक आहे. आरोग्य संदर्भात चार तक्रारी दाखल झाल्या आहेत. ‘स्थायी लोकअदालत’मध्ये संमतीने निकाल होत असल्याने त्यामध्ये संवादातून तोडगा निघू शकतो. त्यामुळे लोकांनी याचा वापर करून घेण्याची गरज आहे. मात्र नवीन खटले दाखल होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थायी लोक अदालत जास्तीत जास्त उपयोग करावा. - दिनकर कांबळे