शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अलंकापुरी सुनी सुनी...

By admin | Updated: July 11, 2015 04:13 IST

याच पद्धतीची भावना उरी ठेवून आपली आषाढी पायी वारी पंढरीच्या विठुचरणी समर्पित करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविक भक्तांच्या

शेलपिंपळगाव : याच पद्धतीची भावना उरी ठेवून आपली आषाढी पायी वारी पंढरीच्या विठुचरणी समर्पित करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविक भक्तांच्या मेळाव्याने ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर माऊलींच्या सहवासात पंढरीच्या विठोबाकडे प्रस्थान ठेवले आणि अवघ्या काही तासांतच अलंकापुरी वारकऱ्यांविना सुनी सुनी झाली. श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या १८५व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यानिमित्त गेल्या चार-पाच दिवसांपासून अलंकापुरीत वारकरी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. संपूर्ण आळंदीत भाविकांचा ओघ दिसून येत होता. जमलेल्या वैष्णवांचा अलंकापुरीत टाळ-मृदंगाचा निनाद व ‘ज्ञानोबा-माऊली-तुकाराम’चा जयघोष सुरू होता. मात्र, माऊलींची पालखी शुक्रवारी सकाळी पुण्यनगरीकडे मार्गस्थ झाली आणि मागील तीन-चार दिवसांपासून वारकऱ्यांचा सुरू असलेला गजर मावळला. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास माऊलींच्या विधिवत पूजेनंतर तसेच शितोळे सरकारांच्या मानपानानंतर मानाच्या अश्वांचे आजोळघरी आगमन झाले. अश्वांना मानपान देऊन माऊलींची पालखी आजोळघरातून ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या साह्याने सजविलेल्या हायटेक रथात विराजमान करून सोहळ्याने पुढील प्रवासासाठी प्रस्थान ठेवले. या वेळी जमलेल्या जनसमुदायाने आकाशाकडे दोन्ही हात वर करून ‘बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय’ असा मोठा जयघोष केला.सकाळी नऊच्या सुमारास वाजत-गाजत साईमंदिरापासून पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून गजबजलेली अलंकापुरीत काही तासांतच शुकशुकाट झाला होता. (वार्ताहर)