शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

जिल्हा रुग्णालयांत आरोग्य सेवांची बोंब

By admin | Updated: December 4, 2015 02:39 IST

जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्यसेवेचा पंचनामा आज जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केला. डॉक्टर नसतात, नर्सच डॉक्टरचे काम करतात, हलगर्जीपणामुळे रुग्णांचा जीव

पुणे : जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्यसेवेचा पंचनामा आज जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केला. डॉक्टर नसतात, नर्सच डॉक्टरचे काम करतात, हलगर्जीपणामुळे रुग्णांचा जीव जातोय अशा तक्रारी करीत सदस्यांनी ठराव करा व शासनाच्या आरोग्य विभागाच्या उपसंचालकांना द्या, अशी मागणी लावून धरली.डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे इंदापूरच्या ग्रामीण रुग्णालयात एका महिलेला दुसऱ्याचा एचआयव्ही पॉझिटीव्हचा रिपोर्ट देण्यात आला. ती महिला गरोदर असल्याने पुढे तिच्यासह तिच्या बाळाचा प्रश्न गंभीर झाला होता... हा प्रश्न ऋतुजा पाटील व श्रीमंत ढाले यांनी उपस्थित केला आणि सर्वच तालुक्यांतील सदस्यांनी आरोग्यसेवेच्या तक्रारी मांडल्या. हे केवळ इंदापुरातच होतेय असे नाही, तर सर्वच तालुक्यांत हे घडतेय असे सांगूत जुन्नरच्या सदस्यांनी सर्पदंशाच्या तीन केस येथे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दगावल्याचे सांगितले. रुग्ण ग्रामीण रुग्णालयात जातो तेव्हा तेथे डॉक्टर नसतात, नर्स असतात. अ‍ॅम्ब्युलन्सची सुविधा नसते, व्हेंटिलेटर नसते, शासनाने ज्या सुविधा पुरविल्या आहेत, त्या तरी तेथे मिळाव्यात, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली. यावर हा विषय गंभीर आहे; त्यामुळे संबंधितांना बोलावून याबाबत चर्चा करू, असे सांगितले. त्यानंतर, आपत्कालीन व्यवस्थेचा प्रश्न शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांनी उपस्थित केला. याला सर्वच तालुक्यांतील सदस्यांनी पाठिंबा देत ही मागणी पुढे रेटली. यानंतर अध्यक्षांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांना माहिती घ्या, अशी सूचना केली. आजच्या बैैठकीत गावठाण मोजणीला सर्वच सदस्यांनी पाठिंबा देत ठरावाला मंजुरी दिली. पेपरफुटीमुळे जिल्हा परिषदेची बदनामी झाली असल्याचे बुचके यांनी सांगितले. संबंधितांवर काय कारवाई केली याची माहिती द्या, अशी मागणी केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्याचे निलंबन करून त्याच्यावर फौजदारी कारवाई केली असून, समन्वयकाचेही निलंबन केल्याचे सांगितले. दशरथ काळभोर यांनी जिल्हा परिषद कमचाऱ्यांना मेडिक्लेमची बिले का मिळत नाहीत, असा प्रश्न विचारला. निधी नसल्याने काही बिले बाकी असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नारायणगाव ग्रामपंचायत बरखास्तीचे काय?सभेत नारायणगाव ग्रामपंचायतीने केलेल्या कारवाईचा मुद्दाही उपस्थित झाला. या वेळी ग्रामपंचायत बरखास्तीचे काय? असे आशा बुचके यांनी विचारले. यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे. ते काय सूचना करतात त्यावर अवलंबून असून, त्यांनाच अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.पाणी अडवाभोर, वेल्हा व मुळशी या तालुक्यांत सर्वांत जास्त धरणे आहेत; पण यंदा आताच्या परिस्थितीत धरणात ५० टक्केही पाणी नाही. बंधाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्यात पाणी अडून राहत नाही. पाणी खाली चालले आहे. तरी आमच्या दुर्गम भागाकडे जरा लक्ष देऊन निदान या बंधाऱ्यांचे पाणी तरी अडवा, अशी मागणी कुलदीप कोंडे यांनी केली.