शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

आरोग्य सेवा सर्वांपर्यंत पोहचावी

By admin | Updated: June 16, 2016 04:00 IST

एकेकाळी भारत हा ज्ञानी देश होता. एका पिढीकडून दुस-या पिढीकडे ज्ञान दिले जात होते. कुणी ज्ञानावर अधिकार सांगत नव्हते, तोपर्यंत भारत समृद्ध राहिला. जेव्हा ते ज्ञान देणे थांबले तेव्हा

पुणे : एकेकाळी भारत हा ज्ञानी देश होता. एका पिढीकडून दुस-या पिढीकडे ज्ञान दिले जात होते. कुणी ज्ञानावर अधिकार सांगत नव्हते, तोपर्यंत भारत समृद्ध राहिला. जेव्हा ते ज्ञान देणे थांबले तेव्हा देश गुलाम झाला, म्हणूनच आपण जे ज्ञान मिळविले ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्यसेवा एका विशिष्ठ वर्गापुरती मर्यादित राहिली तर सुदृढ भारताची संकल्पना साकारणे शक्य नाही, याकडे लक्ष वेधले. गॅलँक्सी केअर हॉस्पीटलच्या उदघाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां.ब मुजुमदार तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गिरीश बापट, गिरीश महाजन, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे तसेच केअर हॉस्पीटलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संंचालक डॉ. बी. सोमा राजू, उपाध्यक्ष डॉ. एन कृष्णा रेड्डी आणि वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ‘‘आज हेल्थकेअरचा लँंडस्केप बदलतोय, पूर्वी डॉक्टरांची वानवा होती, पण आता परिस्थिती बदलली आहे, तंत्रज्ञानावर आधारित हेल्थकेअर सर्वत्र पहायला मिळत आहे. थ्रीडी इमेजनरी आॅपरेशन्स, रोबोटिक्सच्या माध्यमातून शस्त्रक्रिया केल्या जात आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. आरोग्यसेवा ही सर्वांना परवडेल अशा दरात उपलब्ध करून दिली पाहिजे. शासनाने विम्यावर आधारित महात्मा फुले जन आरोग्य सेवा आणली आहे. डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, ‘‘२००५ मध्ये हे गॅलेक्सी हॉस्पीटल सुरू केले. लॅप्रॉस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करणारे तंत्र विकसित केले ज्या तंत्राला पुण्याचे नाव दिले गेले. जगभरात ‘पुणे टेक्निक’ या नावाने ते ओळखले जाते. बारा ते तेरा डॉक्टरांना ते शिकविले गेले आहे, ज्याचा विविध देशांमध्ये वापर केला जात आहे. रोबोटिक्सच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करणारे हे देशातील पहिले रूग्णालय आहे.’’ पूर्वी विद्यार्थ्याला ६० ते ७० टक्के गुण पडले तरी पेढे वाटले जायचे, आज मात्र मार्कांचे अवमूल्यन किती व्हावे याला देखील मर्यादा असल्या पाहिजेत. कुठेतरी चुकतयं. ८० टक्याची मुलगी आत्महत्या करीत आहे, हे चित्र बदलायचे असेल तर शिक्षणपद्धतीत बदल व्हायला पाहिजे.- डॉ. शां. ब. मुजुमदार