शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

आरोग्य सेवा सर्वांपर्यंत पोहचावी

By admin | Updated: June 16, 2016 04:00 IST

एकेकाळी भारत हा ज्ञानी देश होता. एका पिढीकडून दुस-या पिढीकडे ज्ञान दिले जात होते. कुणी ज्ञानावर अधिकार सांगत नव्हते, तोपर्यंत भारत समृद्ध राहिला. जेव्हा ते ज्ञान देणे थांबले तेव्हा

पुणे : एकेकाळी भारत हा ज्ञानी देश होता. एका पिढीकडून दुस-या पिढीकडे ज्ञान दिले जात होते. कुणी ज्ञानावर अधिकार सांगत नव्हते, तोपर्यंत भारत समृद्ध राहिला. जेव्हा ते ज्ञान देणे थांबले तेव्हा देश गुलाम झाला, म्हणूनच आपण जे ज्ञान मिळविले ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्यसेवा एका विशिष्ठ वर्गापुरती मर्यादित राहिली तर सुदृढ भारताची संकल्पना साकारणे शक्य नाही, याकडे लक्ष वेधले. गॅलँक्सी केअर हॉस्पीटलच्या उदघाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां.ब मुजुमदार तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गिरीश बापट, गिरीश महाजन, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे तसेच केअर हॉस्पीटलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संंचालक डॉ. बी. सोमा राजू, उपाध्यक्ष डॉ. एन कृष्णा रेड्डी आणि वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ‘‘आज हेल्थकेअरचा लँंडस्केप बदलतोय, पूर्वी डॉक्टरांची वानवा होती, पण आता परिस्थिती बदलली आहे, तंत्रज्ञानावर आधारित हेल्थकेअर सर्वत्र पहायला मिळत आहे. थ्रीडी इमेजनरी आॅपरेशन्स, रोबोटिक्सच्या माध्यमातून शस्त्रक्रिया केल्या जात आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. आरोग्यसेवा ही सर्वांना परवडेल अशा दरात उपलब्ध करून दिली पाहिजे. शासनाने विम्यावर आधारित महात्मा फुले जन आरोग्य सेवा आणली आहे. डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, ‘‘२००५ मध्ये हे गॅलेक्सी हॉस्पीटल सुरू केले. लॅप्रॉस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करणारे तंत्र विकसित केले ज्या तंत्राला पुण्याचे नाव दिले गेले. जगभरात ‘पुणे टेक्निक’ या नावाने ते ओळखले जाते. बारा ते तेरा डॉक्टरांना ते शिकविले गेले आहे, ज्याचा विविध देशांमध्ये वापर केला जात आहे. रोबोटिक्सच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करणारे हे देशातील पहिले रूग्णालय आहे.’’ पूर्वी विद्यार्थ्याला ६० ते ७० टक्के गुण पडले तरी पेढे वाटले जायचे, आज मात्र मार्कांचे अवमूल्यन किती व्हावे याला देखील मर्यादा असल्या पाहिजेत. कुठेतरी चुकतयं. ८० टक्याची मुलगी आत्महत्या करीत आहे, हे चित्र बदलायचे असेल तर शिक्षणपद्धतीत बदल व्हायला पाहिजे.- डॉ. शां. ब. मुजुमदार