शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

जिल्ह्यात अनधिकृत गुऱ्हाळ चालकांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:10 IST

हवेली तालुक्यातून भीमा, मुळा–मुठा या दोन नद्या, खडकवासला कालवा व जुना बेबी कालवा या सर्वांना बारमाही पाणी उपलब्ध असते. ...

हवेली तालुक्यातून भीमा, मुळा–मुठा या दोन नद्या, खडकवासला कालवा व जुना बेबी कालवा या सर्वांना बारमाही पाणी उपलब्ध असते. त्यामुळे येथे हजारो हेक्टर ऊस शेतकरी उत्पादित करत असतात. या साखर कारखान्याव्यतिरिक्त हजारोंच्या संख्येनी बारमाही चालणारी उसाची गुऱ्हाळे रात्रंदिवस सुरु आहेत. प्रत्येक गुऱ्हाळांवर आरोग्यास अपायकारक व घातक असलेल्या टायर, चप्पला, प्लास्टिक कागद यांचा भट्टीसाठी सर्रास वापर होत आहे. खुलेआम नागरिकांच्या आरोग्याशी चाललेल्या या खेळाकडे मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्न व औषध प्रशासन मंडळ यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा गुऱ्हाळांवर प्रशासन विभागाने कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे सर्वसामान्य नागरिकांची मागणी होऊ लागली आहे.

अन्न सुरक्षा व मानद कायदा २००६ नुसार कोणत्याही पदार्थाचे उत्पादन व विक्री करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील बहुतांश गुऱ्हाळघर मालकांनी विनापरवाना हा व्यवसाय थाटात सुरू केलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात उत्पादित होणारा गूळ आणि विक्री विनापरवानाच सुरू असल्याचे उघड होत असून अन्न सुरक्षा विभाग नेमके या गोष्टींकडे का दुर्लक्ष करत आहेत हा प्रश्न अनुत्तरित आहे. अनेक गुऱ्हाळे ही परप्रांतीय चालवत आहेत. धुरामुळे घशात खवखव होणे, डोळ्यांची जळजळ होणे, सर्दी, खोकला, दमा आदी आजार होत असतात. दम्याच्या रुग्णांना कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. अगोदरच कोरोनाचे सावट असताना ऑक्सिजन लेव्हल नागरिकांची कमी जास्त होत आहे त्यामध्ये जर अशी परिस्थिती राहिली तर रुग्णांसाठी ती घातक आहे .अशा रुग्णांनी मास्क घालण्याची आवश्यकता असल्याचे कुंजीरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लुकडे यांनी सांगितले.