शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिल्ह्यात अनधिकृत गुऱ्हाळ चालकांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:10 IST

हवेली तालुक्यातून भीमा, मुळा–मुठा या दोन नद्या, खडकवासला कालवा व जुना बेबी कालवा या सर्वांना बारमाही पाणी उपलब्ध असते. ...

हवेली तालुक्यातून भीमा, मुळा–मुठा या दोन नद्या, खडकवासला कालवा व जुना बेबी कालवा या सर्वांना बारमाही पाणी उपलब्ध असते. त्यामुळे येथे हजारो हेक्टर ऊस शेतकरी उत्पादित करत असतात. या साखर कारखान्याव्यतिरिक्त हजारोंच्या संख्येनी बारमाही चालणारी उसाची गुऱ्हाळे रात्रंदिवस सुरु आहेत. प्रत्येक गुऱ्हाळांवर आरोग्यास अपायकारक व घातक असलेल्या टायर, चप्पला, प्लास्टिक कागद यांचा भट्टीसाठी सर्रास वापर होत आहे. खुलेआम नागरिकांच्या आरोग्याशी चाललेल्या या खेळाकडे मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्न व औषध प्रशासन मंडळ यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा गुऱ्हाळांवर प्रशासन विभागाने कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे सर्वसामान्य नागरिकांची मागणी होऊ लागली आहे.

अन्न सुरक्षा व मानद कायदा २००६ नुसार कोणत्याही पदार्थाचे उत्पादन व विक्री करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील बहुतांश गुऱ्हाळघर मालकांनी विनापरवाना हा व्यवसाय थाटात सुरू केलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात उत्पादित होणारा गूळ आणि विक्री विनापरवानाच सुरू असल्याचे उघड होत असून अन्न सुरक्षा विभाग नेमके या गोष्टींकडे का दुर्लक्ष करत आहेत हा प्रश्न अनुत्तरित आहे. अनेक गुऱ्हाळे ही परप्रांतीय चालवत आहेत. धुरामुळे घशात खवखव होणे, डोळ्यांची जळजळ होणे, सर्दी, खोकला, दमा आदी आजार होत असतात. दम्याच्या रुग्णांना कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. अगोदरच कोरोनाचे सावट असताना ऑक्सिजन लेव्हल नागरिकांची कमी जास्त होत आहे त्यामध्ये जर अशी परिस्थिती राहिली तर रुग्णांसाठी ती घातक आहे .अशा रुग्णांनी मास्क घालण्याची आवश्यकता असल्याचे कुंजीरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लुकडे यांनी सांगितले.