शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

आळेफाटा, राजुरी ,बेल्हे, ओतूर गावांतील आरोग्याचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:05 IST

राजुरी, आळेफाटा, ओतूर, बेल्हे व इतर गावांमध्ये ग्रामपंचायतीचे सार्वजनिक स्वछतेकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्याचा ...

राजुरी, आळेफाटा, ओतूर, बेल्हे व इतर गावांमध्ये ग्रामपंचायतीचे सार्वजनिक स्वछतेकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी तक्रारी करून देखील कोणतीही दखल घेतली जात नाही. यासंदर्भात ग्रामसभेत तक्रार अर्ज करणाऱ्यांना धमकावले जात आहे .असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला.पुणे नाशिक महामार्गावर समर्थ रेसिडेन्सी इमारतीमधील 70 ते 75 सदनिकातील शौचालय व सांडपाण्यामुळे भरवस्तीत दूषित पाण्याचे तलाव साचले आहेत. राजूर येथील मातंगवस्ती व मुस्लीम दफनभूमी ओढ्यामध्ये गावातील घनकचरा टाकण्यात येत आहे. घनकचऱ्याचे स्थलांतर करण्यासाठी ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करण्यात आला होता. ग्रामस्थांनी मागणीस पदाधिकारी व ग्रामविकास आधिकारी यांनी केराची टोपली दाखवली आहे. ओतूर येथील शासकीय आरोग्य केंद्र तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता आहे. लोकभारती पक्षाचे जुन्नर तालुकाध्यक्ष जालीदभाई पटेल, महिला अध्यक्ष छायाताई उपाळकर, शाहु फुले-आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंबादास पवार, उपाध्यक्ष शौकत शेख, शरद बोराडे, वीशाल गडगे , कमलताई माळवे,वंदना माळवे,कल्पना खरात आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आरोग्याचा प्रश्नासंदर्भात येथे लोकभारती पक्ष,आझाद हिंद प्रतिष्ठान, शाहू फुले आंबेडकर सामाजिक विकास परिषद, सामाजिक संघटनाच्या वतीने जुन्नर तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणात सहभागी कार्यकर्ते.