शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

जन आरोग्य अभियानातर्फे विकसित होणार आरोग्य सनद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:14 IST

पुणे : सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करणे, खाजगी रुग्णालयांचे नियमन, आरोग्य कर्मचाऱ्यांना न्याय, आरोग्यसेवा हक्काचा कायदा या मागण्यांसाठी जन ...

पुणे : सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करणे, खाजगी रुग्णालयांचे नियमन, आरोग्य कर्मचाऱ्यांना न्याय, आरोग्यसेवा हक्काचा कायदा या मागण्यांसाठी जन आरोग्य अभियान आणि जन आंदोलन संघर्ष समितीतर्फे महाराष्ट्रव्यापी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. ‘आरोग्य सेवेची कमतरता आणि बाजारीकरण यांपासून स्वातंत्र्य’ यासाठी आंदोलन सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्रात लोकांच्या आरोग्य हक्कावर आधारित, लोककेंद्रित आरोग्य व्यवस्था सुनिश्चित करणे, यासाठी आवश्यक बदल घडवून आणणे, हा यामागचा उद्देश आहे. याअंतर्गत जिल्हा आणि शहरस्तरीय आरोग्य सनद विकसित करुन आरोग्य हक्कांची जनसुनावणी केली जाणार आहे.

जनआरोग्य अभियानातर्फे राज्यभरात १५ हून अधिक जिल्हे आणि शहरांमध्ये आरोग्य हक्क समित्या स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यात पुण्यासह मुंबई, नाशिक, बीड, पालघर, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई, सांगली, कोल्हापूर, नंदूरबार, औरंगाबाद, अहमदनगर, रायगड, सोलापूर, उस्मानाबाद आणि नागपूर यांचा समावेश आहे. या समित्यांमध्ये सामाजिक संघटना, आरोग्य कार्यकर्ते, जनसंघटना, कामगार संघटना आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सार्वजनिक रुग्णालयांना भेट देऊन, तिथल्या परिस्थितीबद्दल कर्मचारी आणि समुदायांशी बोलून आणि सार्वजनिक आरोग्य सेवांचे विश्लेषण करून, तातडीने सुधारणा घडवण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. सामान्य लोकांची फळी उभी करण्यासाठी सोशल मीडिया मोहीमदेखील सुरू केली आहे.

सार्वजनिक आरोग्य सेवांसाठी बजेट आणि मनुष्यबळ वाढवून त्यांना बळकट करणे, ही आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. रुग्णांच्या हितासाठी, गैरव्यवहार थांबवण्यासाठी महाराष्ट्रात खासगी रुग्णालयांच्या नियंत्रणाचा कायदा लागू करण्याची मागणी ही चळवळ करत आहे. आणि सार्वजनिक व्यवस्थेअंतर्गत नियंत्रित खाजगी हॉस्पिटल्सचा समावेश करून, महाराष्ट्रातील सर्व रहिवाशांना मोफत, दर्जेदार आरोग्यसेवा हक्क म्हणून उपलब्ध होईल, असा आरोग्य सेवा हक्क कायदा आणि व्यवस्था तयार होणे, हे आंदोलनाचे ध्येय आहे. आरोग्यसेवेत काम करणारे डॉक्टर, नर्सेस, आशा व इतर कर्मचारी हे आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत. त्यांना सन्माननीय व सुरक्षित नोकरी व काम करण्याची योग्य परिस्थिती असायलाच हवी, यासाठीही आंदोलन काम करणार आहे.