शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या मूल्यांकनाबाबत न्यायालयात दाद मागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:10 IST

पुणे : कोरोनानंतर ज्यांना परीक्षा देण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी इयत्ता दहावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तसेच इयत्ता अकरावीसाठी सीईटी ...

पुणे : कोरोनानंतर ज्यांना परीक्षा देण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी इयत्ता दहावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तसेच इयत्ता अकरावीसाठी सीईटी प्रवेश प्रक्रिया घेण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे, या दोन मुद्द्यांवर उच्च न्यायालयातील याचिका मागे घेण्यात आली आहे. परंतु, इयत्ता नववीच्या गुणांवर आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापनावर निकाल जाहीर करणे अयोग्य आहे. त्यामुळे या मुद्द्यांवर पुढील तीन ते चार दिवसांत न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

शैक्षणिक गुणवत्ता जपली जावी, या उद्देशाने इयत्ता दहावीच्या परीक्षा घेण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण व्हावा, हा त्यामागील उद्देश कधीच नव्हता, असे नमूद करून कुलकर्णी म्हणाले की, शासनाने कोरोनानंतर परीक्षेचा पर्याय खुला ठेवला आणि अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी इयत्ता नववी व दहावीत विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन झालेले नाही. कोरोनामुळे शाळाच भरल्या नाहीत. त्यामुळे ७० टक्के विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे अवघड आहे. सतरा नंबरचा परीक्षा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार हासुद्धा गंभीर प्रश्न आहे.

इयत्ता दहावीबरोबरच बारावीच्या परीक्षांबाबत शासनाने योग्य निर्णय घेतला नाही. तर; शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना बरोबर घेऊन न्यायालयात याचिका दाखल करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. वर्षभर केलेल्या कष्टाच्या जोरावर दहावीत यश संपादन केल्याचे समाधान विद्यार्थ्यांना मिळावे, ही त्यामागची भूमिका आहेत, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

------------

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपणाला दहावीच्या परीक्षा संदर्भातील याचिका दाखल करण्याबाबत सांगितले असल्याची चर्चा केली जात आहे, यात कितपत तथ्य आहे? त्या प्रश्नाला उत्तर देताना कुलकर्णी म्हणाले, गेल्या ४० वर्षांपासून मी शिक्षण क्षेत्रात काम करत आहे.कोणत्या प्रश्नांवर न्यायालयात जावे हे मला समजते.परंतु, आरएसएसने शैक्षणिक गुणवत्तेसाठी न्यायालयात याचिका दाखल करा,असे मला सांगितले असते तर त्यात काही गैर नाही.