शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

दहावीच्या मूल्यांकनाबाबत न्यायालयात दाद मागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:10 IST

पुणे : कोरोनानंतर ज्यांना परीक्षा देण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी इयत्ता दहावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तसेच इयत्ता अकरावीसाठी सीईटी ...

पुणे : कोरोनानंतर ज्यांना परीक्षा देण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी इयत्ता दहावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तसेच इयत्ता अकरावीसाठी सीईटी प्रवेश प्रक्रिया घेण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे, या दोन मुद्द्यांवर उच्च न्यायालयातील याचिका मागे घेण्यात आली आहे. परंतु, इयत्ता नववीच्या गुणांवर आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापनावर निकाल जाहीर करणे अयोग्य आहे. त्यामुळे या मुद्द्यांवर पुढील तीन ते चार दिवसांत न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

शैक्षणिक गुणवत्ता जपली जावी, या उद्देशाने इयत्ता दहावीच्या परीक्षा घेण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण व्हावा, हा त्यामागील उद्देश कधीच नव्हता, असे नमूद करून कुलकर्णी म्हणाले की, शासनाने कोरोनानंतर परीक्षेचा पर्याय खुला ठेवला आणि अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी इयत्ता नववी व दहावीत विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन झालेले नाही. कोरोनामुळे शाळाच भरल्या नाहीत. त्यामुळे ७० टक्के विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे अवघड आहे. सतरा नंबरचा परीक्षा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार हासुद्धा गंभीर प्रश्न आहे.

इयत्ता दहावीबरोबरच बारावीच्या परीक्षांबाबत शासनाने योग्य निर्णय घेतला नाही. तर; शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना बरोबर घेऊन न्यायालयात याचिका दाखल करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. वर्षभर केलेल्या कष्टाच्या जोरावर दहावीत यश संपादन केल्याचे समाधान विद्यार्थ्यांना मिळावे, ही त्यामागची भूमिका आहेत, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

------------

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपणाला दहावीच्या परीक्षा संदर्भातील याचिका दाखल करण्याबाबत सांगितले असल्याची चर्चा केली जात आहे, यात कितपत तथ्य आहे? त्या प्रश्नाला उत्तर देताना कुलकर्णी म्हणाले, गेल्या ४० वर्षांपासून मी शिक्षण क्षेत्रात काम करत आहे.कोणत्या प्रश्नांवर न्यायालयात जावे हे मला समजते.परंतु, आरएसएसने शैक्षणिक गुणवत्तेसाठी न्यायालयात याचिका दाखल करा,असे मला सांगितले असते तर त्यात काही गैर नाही.