शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी

By admin | Updated: May 12, 2016 01:18 IST

जिल्ह्यातील विशेषत: खेड पट्टयातील आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर भागात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची कांदा पिके झाकण्यासाठी मोठी तारांबळ उडाली होती.

पुणे : जिल्ह्यातील विशेषत: खेड पट्टयातील आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर भागात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची कांदा पिके झाकण्यासाठी मोठी तारांबळ उडाली होती. तसेच दुचाकी चालकांची अचानक आलेल्या पावसाने त्रेधातिरपिट उडाली. अनेक दिवसांपासून उष्णतेने हैराण झालेले नागरिक या पावसामुळे सुखावले आहेत. तसेच काही भागांमध्ये गटारी तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले होते. या पाण्यामधून वाहनचालकांना कसरत करत आपली वाहने काढावी लागत होती.आळंदीत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊसआळंदी : कित्येक दिवसांपासून उष्णतेचा सामना करणाऱ्या आळंदी, केळगाव, डुडूळगाव, चऱ्होली आणि मोशी परिसरातील नागरिकांना बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने दिलासा मिळाला.तासभर झालेल्या मुसळधार पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. ऐनदुपारी झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची काही वेळ तारांबळ उडाली. रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी वाहनचालकांनी भेटेल तिथे आसरा घेत पावसापासून बचाव केला. वाऱ्यासह पाऊस असल्याने काही झाडेही उन्मळून पडली. काही काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. वाऱ्यामुळे पावसाची रिपरिप मोठ्या प्रमाणात जाणवत होती. रस्ताच दिसेनासा झाल्याने आळंदी-भोसरी रस्त्यावर वाहनचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत होती. चौकात जागोजागी पाण्याची डबकी साचल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना अवघड जात होते. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात सायंकाळच्या वेळी नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडताना दिसून येत होते. चासकमानला अवकाळी पावसाने झोडपले४चासकमान : गेल्या काही दिवसांपासून तापत्या उन्हामुळे अंगाची लाही लाही सोसत असलेल्या लोकांना अवकाळी पावसाने हजेरी लावत चांगलाच दणका दिला. या अवकाळी पावसाने खेडच्या पश्चिम भागासह चासकमान परिसरात हैदोस घातला. अवकाळी पावसामुळे अनेकांचे हाल झाले. शिवाय, अनेकांना आर्थिक फटकाही बसला. शेतातील पिकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे. ४बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावल्याने लोकांची तारांबळ उडाली. पाऊस सुमारे एक तास सुरू होता आणि जोर कायम असल्याने चासकमान बाजारपेठेतील रस्त्यावर पाणी साचले होते. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने उन्हाळी कांद्यासह बाजरी, धना, मेथी व मक्याचे मोठे नुकसान झाले. विठ्ठल दाजी टोके यांच्या शेडची भिंत कोसळली.४राम बबन टोके यांच्या घरासमोर नारळाचे झाड तुटले व घरावर विद्युत खांब कोसळला. लहू मुळूक व सुभाष रासकर यांचे कांदे भिजून नुकसान झाले. सलग एक तासाहून अधिक काळ झालेल्या पावसाने काही ठिकाणी उकाड्यापासून दिलासा मिळाला खरा, परंतु अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतात उघड्यावर पडलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. परिसरातील वीटभट्ट्यांचेसुद्धा अचानक आलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.