शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

वडापुरी परिसरातील शेतकरी हवालदिल

By admin | Updated: April 22, 2016 01:05 IST

परिसरात पडलेल्या भीषण दुष्काळाचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पाण्यासह जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावण्यास सुरुवात झाली आहे.

वडापुरी : परिसरात पडलेल्या भीषण दुष्काळाचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पाण्यासह जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावण्यास सुरुवात झाली आहे. या वर्षीच्या हंगामामध्ये पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे पिके हाती लागली नसल्याने जनावरांना लागणारा चारा कमी प्रमाणात निघाल्याने सध्या वडापुरी अवसरी काटी पंधारवाडी या भागातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. दुसऱ्या तालुक्यातून जनावरांना चारा आणून घालण्याची वेळ शेतकरी वर्गाला आली असल्याचे पाहावयास मिळत आहे. वडापुरी परिसरासह तालुक्यात पावसाने गेली चार ते पाच वर्षे झाली. दगा दिल्यामुळे यंदा कमी प्रमाणात ज्वारी, मका, कडवळ याचे कमी प्रमाणात उत्पन्न निघाल्याने कमी प्रमाणात चारा निघाला. परंतु, निघालेला चारासुद्धा आत्ता शिल्लक राहिला नसल्याने चाऱ्याची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे दुभत्या गाईंना जगविण्यासाठी दुसऱ्या तालुक्यातून वाहनाने चारा आणावा लागत असल्याचे चित्र आहे. पडलेल्या भीषण दुष्काळामुळे जमिनीतील पाण्याची खोलवर गेलेली पातळी गेली आहे. सध्या जनावरांना पोटभर चारा मिळत नसल्याने गुरांचे पोट व पाट एक झाल्याचे सध्या चित्र या भागात पाहावयास मिळत आहे. पाच वर्षांपासून सलग पडलेल्या भीषण दुष्काळामुळे भयंकर परस्थिती निर्माण झाली आहे. जर आज ही परिस्थिती असेल तर पावसाळ्यापर्यंत काय परिस्थिती असेल, यामुळे सध्या दुष्काळाची तीव्रता वाढत चालली आहे. > हाताला काम, जनावरांना चारापाणी द्यासुपे : बारामती जिरायती भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दुष्काळी दौरा काढला. या वेळी गावोगावच्या ग्रामस्थांनी प्रामुख्याने वाढीव पाणी, जनावरांना चारा व पाणी तसेच हाताला काम देण्याची मागणी केली.सुपेसह जिरायती पट्ट्यातील बोरकरवाडी, वढाणे, कुतवळवाडी, भोंडवेवाडी, पानसरेवाडी, काळखैरेवाडी, चांदगुडेवाडी, नारोळी, कोळोली आणि बाबुर्डी आदी ठिकाणच्या जिरायती भागाचा दुष्काळी दौरा बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला. पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, ग्रामस्थांच्या हाताला काम देण्याची मागणी तसेच जलसंधारण व ओढा खोलीकरण आदी कामांचा पाढाच ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांसमोर मांडला. तालुकाध्यक्ष संभाजी होळकर म्हणाले की, अद्याप तरी सरकारच्या माध्यमातून दुष्काळातील कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दुष्काळी दौरा काढण्यात आला. या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती होळकर यांनी दिली. या वेळी सतीश खोमणे, करण खलाटे, विक्रम भोसले, शंकरराव चांदगुडे, दीपक मलगुडे, सतीश तावरे, दत्तात्रय कुतवळ उपस्थित होते.