शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

पिकं जळाली; विहिरींनी गाठला तळ !

By admin | Updated: November 26, 2015 01:00 IST

पिकं जळाली...विहिरींनी तळ गाठला..चाऱ्याअभावी लाखमोलाच्या किमतीची जनावरं विकायची वेळ आली. उपजीविकेसाठी गावातील माणसं शहरात मजुरीला जायला लागली

बारामती : पिकं जळाली...विहिरींनी तळ गाठला..चाऱ्याअभावी लाखमोलाच्या किमतीची जनावरं विकायची वेळ आली. उपजीविकेसाठी गावातील माणसं शहरात मजुरीला जायला लागली. ही परिस्थिती मराठवाडा किंवा विदर्भातील नसून विकासाचा गवगवा झालेल्या बारामती शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बऱ्हाणपूरची आहे. बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील गावांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. शेती हा मुख्य व्यवसाय असणारे हे गाव बारामतीच्या जिरायती पट्ट्यात येते. ज्वारी हे रब्बीतील मुख्य पीक; परंतु यंदा पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे खरीप हंगाम वाया गेला. आता विहिरींच्या घटलेल्या भूजल पातळीमुळे हक्काच्या रब्बी हंगामातील ज्वारीही जळून चालली आहे. चारा पिकांचीही अवस्था अशीच, त्यामुळे रोजचा चाऱ्यासाठी येथील दूध उत्पादकांना ४०० ते ५०० रुपये खर्च करावा लागत आहे. पेरणीचा खर्चही पिके जळाल्याने वाया गेला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. (प्रतिनिधी)दूध व्यवसाय करणे जिकिरीचे ...सध्या या भागात चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. चारा नसल्याने दूध उत्पादक शेतकरी मिळेल तेथून चारा विकत आणत आहे; परंतु चाऱ्याच्या किमतीही दुष्काळामुळे गगनाला भिडल्या आहेत. त्यातच गाईच्या दुधाला १७ ते १८ रुपये, तर म्हशीच्या दुधाला २४ ते २५ रुपये दर मिळत आहे. पशुखाद्याच्या किमतीही वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत दूध व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. अशीच परिस्थीती राहिली तर आमचे गोठे ओस पडतील, अशी व्यथा येथील दूध व्यावसायिकांनी मांडली.