शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

पिकं जळाली; विहिरींनी गाठला तळ !

By admin | Updated: November 26, 2015 01:00 IST

पिकं जळाली...विहिरींनी तळ गाठला..चाऱ्याअभावी लाखमोलाच्या किमतीची जनावरं विकायची वेळ आली. उपजीविकेसाठी गावातील माणसं शहरात मजुरीला जायला लागली

बारामती : पिकं जळाली...विहिरींनी तळ गाठला..चाऱ्याअभावी लाखमोलाच्या किमतीची जनावरं विकायची वेळ आली. उपजीविकेसाठी गावातील माणसं शहरात मजुरीला जायला लागली. ही परिस्थिती मराठवाडा किंवा विदर्भातील नसून विकासाचा गवगवा झालेल्या बारामती शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बऱ्हाणपूरची आहे. बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील गावांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. शेती हा मुख्य व्यवसाय असणारे हे गाव बारामतीच्या जिरायती पट्ट्यात येते. ज्वारी हे रब्बीतील मुख्य पीक; परंतु यंदा पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे खरीप हंगाम वाया गेला. आता विहिरींच्या घटलेल्या भूजल पातळीमुळे हक्काच्या रब्बी हंगामातील ज्वारीही जळून चालली आहे. चारा पिकांचीही अवस्था अशीच, त्यामुळे रोजचा चाऱ्यासाठी येथील दूध उत्पादकांना ४०० ते ५०० रुपये खर्च करावा लागत आहे. पेरणीचा खर्चही पिके जळाल्याने वाया गेला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. (प्रतिनिधी)दूध व्यवसाय करणे जिकिरीचे ...सध्या या भागात चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. चारा नसल्याने दूध उत्पादक शेतकरी मिळेल तेथून चारा विकत आणत आहे; परंतु चाऱ्याच्या किमतीही दुष्काळामुळे गगनाला भिडल्या आहेत. त्यातच गाईच्या दुधाला १७ ते १८ रुपये, तर म्हशीच्या दुधाला २४ ते २५ रुपये दर मिळत आहे. पशुखाद्याच्या किमतीही वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत दूध व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. अशीच परिस्थीती राहिली तर आमचे गोठे ओस पडतील, अशी व्यथा येथील दूध व्यावसायिकांनी मांडली.