शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

इथेनॉल निर्मिती करणारा हरणेश्‍वर कारखान्याचा लिलाव होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:11 IST

इंदापूर तालुक्यातील कळस येथील शर्कराकंदापासून इथेनॉल निर्मिती करणारा "हरणेश्‍वर अॅग्रो हा प्रकल्प गेली १३ वर्षे पासून बंद ...

इंदापूर तालुक्यातील कळस येथील शर्कराकंदापासून इथेनॉल निर्मिती करणारा "हरणेश्‍वर अॅग्रो हा प्रकल्प गेली १३ वर्षे पासून बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा कारखाना राजकारणाचा बळी ठरला आहे

कर्जाचा मोठा डोंगर झाल्याने न्यायालयीन प्रकियेनुसार २० एप्रिल रोजी कारखान्याचा लिलाव होणार आहे.

कळस येथील माळरानावर १९९९ साली भाजपाचे नेते बाबासाहेब चवरे यांनी सुमारे २०९ एकर क्षेत्रावर या कारखान्याची भाजपा नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते पायाभरणी केली. पुढे २००५ साली सुरु झालेल्या या कारखान्यामधून शर्कराकंदापासून इथेनॉल निर्मिती,व उसापासून गूळ पावडर,निर्मिती करण्यास सुरवात झाली. उजनी जलाशयावरून यासाठी पाईपलाइन करून पाणीही आणण्यात आले. याठिकाणी कामगारांसाठी वसाहतही उभी करण्यात आली, मात्र राजकीय षडयंत्र व प्रशासकीय उदासीनता यामुळे उसापासून साखर निर्मिती साठी या कारखान्याला आघाडी सरकारच्या काळात अंतराची अट दाखवून परवाना नाकारण्यात आला. शर्कराकंदापासून इथेनॉल निर्मिती,व उसापासून गूळ पावडर,यावर ह्या कारखान्याची आर्थिक गणिते कोलमडली. या प्रकल्पासाठी येथील शेतकऱ्यांनी आपली जमीन शेअर्स रुपी मोबदल्यात कारखान्याला दिली, मात्र २००९ नंतर हा प्रकल्प गेली १३ वर्षे बंदच आहे, कारखान्यावर अनेक बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले आहे त्यामुळे कारखाना डबघाईला आला आहे, तडजोडीअंतर्गत सुमारे २५ कोटी रुपयांचे अनेक बँकाचे कर्ज आहे.यामधील ४ कोटी रूपये भरले असल्याचा दावा व्यावस्थापनाने केला आहे. मात्र कर्ज असलेल्या बँकानी न्याय प्रकियेनुसार २० एप्रिल रोजी कारखान्याचा लिलाव जाहीर केला आहे. कारखान्याची स्थावर व मशनिरी अशी सुमारे ४५ कोटी रूपयांची मालमत्ता आहे मात्र लिलाव झाल्यास मोठे नुकसान होणार आहे.

इंदापूर, बारामती, दौंड फलटण ,पुरंदर येथील सुमारे बारा हजार सभासदांनीं आपले शेअर्स जमा केले होते त्यांचेही नुकसान झाले आहे .

कारखान्यावर बँकाचे कर्ज असल्याने २० एप्रिल रोजी लिलाव घोषीत केला आहे मात्र कोविडमुळे असा निर्णय घेता येत नाही आम्ही वकिलामार्फत आमची बाजु मांडली आहे यामध्ये मोठे राजकारण आहे मात्र आम्ही कायद्याच्या आधारे लढुन याठिकाणी प्रकल्प सुरु करणयासाठी प्रयत्नशील आहोत.

माऊली चवरे ,संचालक