शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

इथेनॉल निर्मिती करणारा हरणेश्‍वर कारखान्याचा लिलाव होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:11 IST

इंदापूर तालुक्यातील कळस येथील शर्कराकंदापासून इथेनॉल निर्मिती करणारा "हरणेश्‍वर अॅग्रो हा प्रकल्प गेली १३ वर्षे पासून बंद ...

इंदापूर तालुक्यातील कळस येथील शर्कराकंदापासून इथेनॉल निर्मिती करणारा "हरणेश्‍वर अॅग्रो हा प्रकल्प गेली १३ वर्षे पासून बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा कारखाना राजकारणाचा बळी ठरला आहे

कर्जाचा मोठा डोंगर झाल्याने न्यायालयीन प्रकियेनुसार २० एप्रिल रोजी कारखान्याचा लिलाव होणार आहे.

कळस येथील माळरानावर १९९९ साली भाजपाचे नेते बाबासाहेब चवरे यांनी सुमारे २०९ एकर क्षेत्रावर या कारखान्याची भाजपा नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते पायाभरणी केली. पुढे २००५ साली सुरु झालेल्या या कारखान्यामधून शर्कराकंदापासून इथेनॉल निर्मिती,व उसापासून गूळ पावडर,निर्मिती करण्यास सुरवात झाली. उजनी जलाशयावरून यासाठी पाईपलाइन करून पाणीही आणण्यात आले. याठिकाणी कामगारांसाठी वसाहतही उभी करण्यात आली, मात्र राजकीय षडयंत्र व प्रशासकीय उदासीनता यामुळे उसापासून साखर निर्मिती साठी या कारखान्याला आघाडी सरकारच्या काळात अंतराची अट दाखवून परवाना नाकारण्यात आला. शर्कराकंदापासून इथेनॉल निर्मिती,व उसापासून गूळ पावडर,यावर ह्या कारखान्याची आर्थिक गणिते कोलमडली. या प्रकल्पासाठी येथील शेतकऱ्यांनी आपली जमीन शेअर्स रुपी मोबदल्यात कारखान्याला दिली, मात्र २००९ नंतर हा प्रकल्प गेली १३ वर्षे बंदच आहे, कारखान्यावर अनेक बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले आहे त्यामुळे कारखाना डबघाईला आला आहे, तडजोडीअंतर्गत सुमारे २५ कोटी रुपयांचे अनेक बँकाचे कर्ज आहे.यामधील ४ कोटी रूपये भरले असल्याचा दावा व्यावस्थापनाने केला आहे. मात्र कर्ज असलेल्या बँकानी न्याय प्रकियेनुसार २० एप्रिल रोजी कारखान्याचा लिलाव जाहीर केला आहे. कारखान्याची स्थावर व मशनिरी अशी सुमारे ४५ कोटी रूपयांची मालमत्ता आहे मात्र लिलाव झाल्यास मोठे नुकसान होणार आहे.

इंदापूर, बारामती, दौंड फलटण ,पुरंदर येथील सुमारे बारा हजार सभासदांनीं आपले शेअर्स जमा केले होते त्यांचेही नुकसान झाले आहे .

कारखान्यावर बँकाचे कर्ज असल्याने २० एप्रिल रोजी लिलाव घोषीत केला आहे मात्र कोविडमुळे असा निर्णय घेता येत नाही आम्ही वकिलामार्फत आमची बाजु मांडली आहे यामध्ये मोठे राजकारण आहे मात्र आम्ही कायद्याच्या आधारे लढुन याठिकाणी प्रकल्प सुरु करणयासाठी प्रयत्नशील आहोत.

माऊली चवरे ,संचालक