शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

हिरडी गाव प्रकाशमय, छोटीशी कृती ठरली लाख मोलाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:54 IST

ताम्हिणी अंधारबन हे ट्रेकर्सचे अत्यंत आवडीचे ठिकाण आहे. इथल्या दुर्गम भागात हिरडी हे छोटेसे गाव वसलेले आहे.

पुणे : ताम्हिणी अंधारबन हे ट्रेकर्सचे अत्यंत आवडीचे ठिकाण आहे. इथल्या दुर्गम भागात हिरडी हे छोटेसे गाव वसलेले आहे. विजेच्या तारा तुटल्यामुळे अनेक महिन्यांपासून खंडित झालेला वीजपुरवठा गावकºयांनी खूप प्रयत्न करूनही सुरू होत नव्हता. गावकºयाने एका ट्रेकर्सशी बोलताना ही खंत बोलून दाखविली. त्यानंतर त्या ट्रेकर्सने दोन महिने सातत्याने पाठपुरावा करून अखेर त्या गावचा वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत करून दिला. या छोट्याशा कृतिशील प्रयत्नाने त्या गावकºयांची दिवाळी मात्र खरीखुरी प्रकाशमान झाली.राकेश जाधव असे त्या कृतिशील ट्रेकरचे नाव आहे. औंधमधील सहयाद्री ट्रेकर्स ग्रुपचे राकेश सदस्य आहेत. त्यांनी सांगितले, ‘‘अंधारबन इथे ट्रेकिंगला गेलो असता हिरडी गावातले गावकरी भेटले. सहज गप्पांमध्ये त्यांनी विजेच्या तारा तुटल्यामुळे गेल्या ३ महिन्यांपासून गावात लाईट नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागत होता. संबंधित अधिकाºयांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही त्यांना दाद दिली जात नव्हती. या गावाला पूर्ववत वीज मिळवून देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असे त्याचवेळी ठरविले. त्यानंतर पुण्याला परत आल्यावर त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. महावितरणच्या अधिकाºयांचे फोन नंबर, ई-मेल शोधले. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना याची माहिती दिली. त्यानंतर पालकमंत्री, ऊर्जा विभागातील अधिकारी यांना याबाबतचे ई-मेल पाठविले.’’पंधरा दिवसांनी हिरडी गावाशी संबंधित असलेल्या अधिकाºयांचा राकेश यांना फोन आला. तुम्ही कोण आहात, हिरडी गावाशी तुमचा काय संबंध अशी विचारणा अधिकाºयाने त्यांना केली. तुम्ही केलेल्या तक्रारीमुळे वरिष्ठ अधिकाºयांकडून दटावणी झाल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर गावचा वीजपुरवठा सुरळीत झाला असून आता आमच्या अधिकाºयांना ई-मेल पाठवून ते कळवा, अशी विनंती त्याने राकेश यांना केली. जे काम काही दिवसांत होऊ शकत होते, ते शासकीय अनास्थेमुळे महिनोन्महिने रखडले होते.>असं आहे छोटंसं हिरडी गावअंधारबनच्या दुर्गम भागात वसलेल्या हिरडी गावात पूर्वी १८ घरे होती. पण सुख-सुविधांच्या अभावामुळे आज तेथे फक्त ८ कुटुंबे राहत आहेत. बाकीचे पुण्या-मुंबईला स्थलांतरित झाले आहेत. पिण्याचे पाणी गरजेपुरते उपलब्ध आहे. इथे भात, नाचणी व वरई ही पिके घेतली जातात. बाजारहाट करण्यासाठी दोन तासांची दमछाक करणारी खडतर चढाई पार करून ते सामान आणावे लागते. सोमजाईदेवी ग्रामदैवत आहे. महाशिवरात्री, नवरात्री, गौरी-गणपती व दिवाळी कामानिमित्त बाहेरगावी गेलेले लोक आवर्जून येतात.>तक्रारीची दखल घेतल्याचा आनंदनिसर्गसौंदर्याची मुक्त उधळण म्हणजे अंधारबन. आमचा ट्रेक रमतगमत मजेत पूर्ण झाला होता. पण केवळ विजेच्या तारा जोडल्याने अनेक अडचणींचा सामना करीत असलेल्या हिरडी गावच्या विजेची समस्या अस्वस्थ करीत होती. या तुटलेल्या तारा दुरुस्त करून देण्यासाठी माझ्या पातळीवर वैयक्तिक प्रयत्न करण्याचे मी ठरविले. त्यानुसार केलेल्या प्रयत्नांना यश येऊन त्या गावचा वीजपुरवठा सुरळीत झाल्याचा आनंद आहे. शासकीय यंत्रणेकडे केलेल्या तक्रारीची दखल घेतली गेल्याचा सुखद अनुभव यानिमित्ताने आला.- राकेश जाधव, ट्रेकर