शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिरडी गाव प्रकाशमय, छोटीशी कृती ठरली लाख मोलाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:54 IST

ताम्हिणी अंधारबन हे ट्रेकर्सचे अत्यंत आवडीचे ठिकाण आहे. इथल्या दुर्गम भागात हिरडी हे छोटेसे गाव वसलेले आहे.

पुणे : ताम्हिणी अंधारबन हे ट्रेकर्सचे अत्यंत आवडीचे ठिकाण आहे. इथल्या दुर्गम भागात हिरडी हे छोटेसे गाव वसलेले आहे. विजेच्या तारा तुटल्यामुळे अनेक महिन्यांपासून खंडित झालेला वीजपुरवठा गावकºयांनी खूप प्रयत्न करूनही सुरू होत नव्हता. गावकºयाने एका ट्रेकर्सशी बोलताना ही खंत बोलून दाखविली. त्यानंतर त्या ट्रेकर्सने दोन महिने सातत्याने पाठपुरावा करून अखेर त्या गावचा वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत करून दिला. या छोट्याशा कृतिशील प्रयत्नाने त्या गावकºयांची दिवाळी मात्र खरीखुरी प्रकाशमान झाली.राकेश जाधव असे त्या कृतिशील ट्रेकरचे नाव आहे. औंधमधील सहयाद्री ट्रेकर्स ग्रुपचे राकेश सदस्य आहेत. त्यांनी सांगितले, ‘‘अंधारबन इथे ट्रेकिंगला गेलो असता हिरडी गावातले गावकरी भेटले. सहज गप्पांमध्ये त्यांनी विजेच्या तारा तुटल्यामुळे गेल्या ३ महिन्यांपासून गावात लाईट नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागत होता. संबंधित अधिकाºयांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही त्यांना दाद दिली जात नव्हती. या गावाला पूर्ववत वीज मिळवून देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असे त्याचवेळी ठरविले. त्यानंतर पुण्याला परत आल्यावर त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. महावितरणच्या अधिकाºयांचे फोन नंबर, ई-मेल शोधले. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना याची माहिती दिली. त्यानंतर पालकमंत्री, ऊर्जा विभागातील अधिकारी यांना याबाबतचे ई-मेल पाठविले.’’पंधरा दिवसांनी हिरडी गावाशी संबंधित असलेल्या अधिकाºयांचा राकेश यांना फोन आला. तुम्ही कोण आहात, हिरडी गावाशी तुमचा काय संबंध अशी विचारणा अधिकाºयाने त्यांना केली. तुम्ही केलेल्या तक्रारीमुळे वरिष्ठ अधिकाºयांकडून दटावणी झाल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर गावचा वीजपुरवठा सुरळीत झाला असून आता आमच्या अधिकाºयांना ई-मेल पाठवून ते कळवा, अशी विनंती त्याने राकेश यांना केली. जे काम काही दिवसांत होऊ शकत होते, ते शासकीय अनास्थेमुळे महिनोन्महिने रखडले होते.>असं आहे छोटंसं हिरडी गावअंधारबनच्या दुर्गम भागात वसलेल्या हिरडी गावात पूर्वी १८ घरे होती. पण सुख-सुविधांच्या अभावामुळे आज तेथे फक्त ८ कुटुंबे राहत आहेत. बाकीचे पुण्या-मुंबईला स्थलांतरित झाले आहेत. पिण्याचे पाणी गरजेपुरते उपलब्ध आहे. इथे भात, नाचणी व वरई ही पिके घेतली जातात. बाजारहाट करण्यासाठी दोन तासांची दमछाक करणारी खडतर चढाई पार करून ते सामान आणावे लागते. सोमजाईदेवी ग्रामदैवत आहे. महाशिवरात्री, नवरात्री, गौरी-गणपती व दिवाळी कामानिमित्त बाहेरगावी गेलेले लोक आवर्जून येतात.>तक्रारीची दखल घेतल्याचा आनंदनिसर्गसौंदर्याची मुक्त उधळण म्हणजे अंधारबन. आमचा ट्रेक रमतगमत मजेत पूर्ण झाला होता. पण केवळ विजेच्या तारा जोडल्याने अनेक अडचणींचा सामना करीत असलेल्या हिरडी गावच्या विजेची समस्या अस्वस्थ करीत होती. या तुटलेल्या तारा दुरुस्त करून देण्यासाठी माझ्या पातळीवर वैयक्तिक प्रयत्न करण्याचे मी ठरविले. त्यानुसार केलेल्या प्रयत्नांना यश येऊन त्या गावचा वीजपुरवठा सुरळीत झाल्याचा आनंद आहे. शासकीय यंत्रणेकडे केलेल्या तक्रारीची दखल घेतली गेल्याचा सुखद अनुभव यानिमित्ताने आला.- राकेश जाधव, ट्रेकर