शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

हिरडी गाव प्रकाशमय, छोटीशी कृती ठरली लाख मोलाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:54 IST

ताम्हिणी अंधारबन हे ट्रेकर्सचे अत्यंत आवडीचे ठिकाण आहे. इथल्या दुर्गम भागात हिरडी हे छोटेसे गाव वसलेले आहे.

पुणे : ताम्हिणी अंधारबन हे ट्रेकर्सचे अत्यंत आवडीचे ठिकाण आहे. इथल्या दुर्गम भागात हिरडी हे छोटेसे गाव वसलेले आहे. विजेच्या तारा तुटल्यामुळे अनेक महिन्यांपासून खंडित झालेला वीजपुरवठा गावकºयांनी खूप प्रयत्न करूनही सुरू होत नव्हता. गावकºयाने एका ट्रेकर्सशी बोलताना ही खंत बोलून दाखविली. त्यानंतर त्या ट्रेकर्सने दोन महिने सातत्याने पाठपुरावा करून अखेर त्या गावचा वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत करून दिला. या छोट्याशा कृतिशील प्रयत्नाने त्या गावकºयांची दिवाळी मात्र खरीखुरी प्रकाशमान झाली.राकेश जाधव असे त्या कृतिशील ट्रेकरचे नाव आहे. औंधमधील सहयाद्री ट्रेकर्स ग्रुपचे राकेश सदस्य आहेत. त्यांनी सांगितले, ‘‘अंधारबन इथे ट्रेकिंगला गेलो असता हिरडी गावातले गावकरी भेटले. सहज गप्पांमध्ये त्यांनी विजेच्या तारा तुटल्यामुळे गेल्या ३ महिन्यांपासून गावात लाईट नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागत होता. संबंधित अधिकाºयांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही त्यांना दाद दिली जात नव्हती. या गावाला पूर्ववत वीज मिळवून देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असे त्याचवेळी ठरविले. त्यानंतर पुण्याला परत आल्यावर त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. महावितरणच्या अधिकाºयांचे फोन नंबर, ई-मेल शोधले. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना याची माहिती दिली. त्यानंतर पालकमंत्री, ऊर्जा विभागातील अधिकारी यांना याबाबतचे ई-मेल पाठविले.’’पंधरा दिवसांनी हिरडी गावाशी संबंधित असलेल्या अधिकाºयांचा राकेश यांना फोन आला. तुम्ही कोण आहात, हिरडी गावाशी तुमचा काय संबंध अशी विचारणा अधिकाºयाने त्यांना केली. तुम्ही केलेल्या तक्रारीमुळे वरिष्ठ अधिकाºयांकडून दटावणी झाल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर गावचा वीजपुरवठा सुरळीत झाला असून आता आमच्या अधिकाºयांना ई-मेल पाठवून ते कळवा, अशी विनंती त्याने राकेश यांना केली. जे काम काही दिवसांत होऊ शकत होते, ते शासकीय अनास्थेमुळे महिनोन्महिने रखडले होते.>असं आहे छोटंसं हिरडी गावअंधारबनच्या दुर्गम भागात वसलेल्या हिरडी गावात पूर्वी १८ घरे होती. पण सुख-सुविधांच्या अभावामुळे आज तेथे फक्त ८ कुटुंबे राहत आहेत. बाकीचे पुण्या-मुंबईला स्थलांतरित झाले आहेत. पिण्याचे पाणी गरजेपुरते उपलब्ध आहे. इथे भात, नाचणी व वरई ही पिके घेतली जातात. बाजारहाट करण्यासाठी दोन तासांची दमछाक करणारी खडतर चढाई पार करून ते सामान आणावे लागते. सोमजाईदेवी ग्रामदैवत आहे. महाशिवरात्री, नवरात्री, गौरी-गणपती व दिवाळी कामानिमित्त बाहेरगावी गेलेले लोक आवर्जून येतात.>तक्रारीची दखल घेतल्याचा आनंदनिसर्गसौंदर्याची मुक्त उधळण म्हणजे अंधारबन. आमचा ट्रेक रमतगमत मजेत पूर्ण झाला होता. पण केवळ विजेच्या तारा जोडल्याने अनेक अडचणींचा सामना करीत असलेल्या हिरडी गावच्या विजेची समस्या अस्वस्थ करीत होती. या तुटलेल्या तारा दुरुस्त करून देण्यासाठी माझ्या पातळीवर वैयक्तिक प्रयत्न करण्याचे मी ठरविले. त्यानुसार केलेल्या प्रयत्नांना यश येऊन त्या गावचा वीजपुरवठा सुरळीत झाल्याचा आनंद आहे. शासकीय यंत्रणेकडे केलेल्या तक्रारीची दखल घेतली गेल्याचा सुखद अनुभव यानिमित्ताने आला.- राकेश जाधव, ट्रेकर