शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कठोर मेहनतीला स्मार्ट वर्कची जोड हवी : मयूर सूर्यवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:09 IST

(एकेक किरण तेजाचा लोगो) इन्ट्रो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत अपयश येऊनही न खचता, प्रत्येक प्रयत्नावेळी झालेल्या चुका सुधारून ...

(एकेक किरण तेजाचा लोगो)

इन्ट्रो

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत अपयश येऊनही न खचता, प्रत्येक प्रयत्नावेळी झालेल्या चुका सुधारून पुन्हा नव्याने तयारी केली. त्यामुळे पहिल्या दोन पूर्वपरीक्षेत अपयश आल्यानंतर, तिसऱ्या प्रयत्नात पूर्व, मुख्य परीक्षा पास करत थेट मुलाखतीपर्यंत झेप घेतली. मात्र, थोडक्यात पुन्हा संधी हुकली. अपयश हे स्पर्धा परीक्षेचा एक भागच आहे असे मानून त्यामुळे हार न मानता पुन्हा जोमाने तयारी सुरू केली. चौथ्या प्रयत्नात कठोर मेहनतीला स्मार्ट वर्कची जोड देत अभ्यास केला. त्यामुळे थेट जिल्हाधिकारीपदी निवड झाल्याचे मयूर विकास सूर्यवंशी यांनी सांगितले. सध्या ओडिशा राज्यातील संबलपूर येथे ते उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

पुणे विद्यापीठातून बी. ई. (मेकॅनिकल)ची पदवी मिळवलेले मयूर सूर्यवंशी मूळचे जळगाव जिल्ह्यातील आहेत. आईवडील, शिक्षक असल्याने कायम त्यांचा पाठिंबा मिळाला. त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी पुणे आणि दिल्ली येथून केली आहे. वरिष्ठ अधिकारी मित्र, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आईवडिलांच्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळवल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

* परीक्षा पद्धत समजून घेऊन अभ्यासाचे नियोजन करा :

आयोगाने दिलेला अभ्यासक्रम सुरुवातीला समजून घ्या, गेल्या १० वर्षांतील पूर्व आणि मुख्य परीक्षेचे पेपर अभ्यासने, त्याचे आकलन करणे, वेळेचे अभ्यास सुरू करण्याआधी अचूक नियाेजन करणे, दिवसातून कमीत कमी १० तास अभ्यास करणे गरजेचे आहे. पूर्व परीक्षेवेळी कोणताही विषय वैकल्पिक (ऑप्शनलला) न टाकता संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, चालू घडामोडींचे आकलन व माहिती ठेवण्यासाठी कुरूक्षेत्र, योजना या मासिकांचा नियमित अभ्यास करावा, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी भरपूर सराव, कमीत कमी ५० पेपर तरी सोडवणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाची कमीत कमी ३ वेळी उजळणी करावी. विविध विषयांवर मित्रांबराेबर ग्रुप स्टडीमधून केलेला अभ्यास मुख्य परीक्षेला फायदेशीर ठरतो. स्वत:ची उत्तरे प्राध्यपकांकडून, मित्रांकडून तपासून घ्यावी, त्यात सुधारणा करणे. मागील वेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळा, योगा, ध्यान नियमितपणे करा, त्यातून मन एकाग्र होते अन् केलेल्या अभ्यास लक्षात राहतो. त्याचबरोबर सातत्य, चिकाटी आणि मेहनत ही त्रिसूत्री कायम लक्षात ठेवून वाटचाल केल्यास यश हमखाश मिळेल.

* सोशल मीडियाचा योग्य वापर करा :

यूपीएससीची तयारी करताना संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वेळेचे नियोजन म्हत्त्वाचे असते. त्यासाठी तुम्हाला इतर गोष्टींना मुरड घालावी लागते. सोशल मीडियाचा यासाठी जपून वापर करणे गरजेचे आहे. अभ्यास करताना आम्ही व्हॉटस्ॲपवर पूर्व, मुख्य आणि मुलाखतीच्या प्रत्येक टप्प्यावर विषयानुसार ग्रुप बनवले होते. त्या माध्यमातून शिक्षकांबरोबरच यशस्वी आणि सध्या कार्यरत असलेले अधिकारी आम्हाला या माध्यमातून सहज मार्गदर्शन करायचे. त्यामुळे कोणत्याही क्षणी काही अडचण आली की, या ग्रुपचा आम्हाला मोठा फायदा व्हायचा. लोकसभा व राज्यसभा वृत्तवाहिनीवरील विविध विषयांवरच्या चर्चाही ऐकल्यास त्याचाही फायदा होताे. त्यामुळे मी किंवा माझ्या सर्व मित्रांनी सोशल मीडियाचा विधायक वापर केल्याने आम्हाला त्याचा चांगला फायदा झाला आहे.

(फोटो : मयूर सूर्यवंशी आयएएस या नावाने आजच्या फोल्डरमध्ये टाकला आहे)