शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

कठोर मेहनतीला स्मार्ट वर्कची जोड हवी : मयूर सूर्यवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:09 IST

(एकेक किरण तेजाचा लोगो) इन्ट्रो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत अपयश येऊनही न खचता, प्रत्येक प्रयत्नावेळी झालेल्या चुका सुधारून ...

(एकेक किरण तेजाचा लोगो)

इन्ट्रो

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत अपयश येऊनही न खचता, प्रत्येक प्रयत्नावेळी झालेल्या चुका सुधारून पुन्हा नव्याने तयारी केली. त्यामुळे पहिल्या दोन पूर्वपरीक्षेत अपयश आल्यानंतर, तिसऱ्या प्रयत्नात पूर्व, मुख्य परीक्षा पास करत थेट मुलाखतीपर्यंत झेप घेतली. मात्र, थोडक्यात पुन्हा संधी हुकली. अपयश हे स्पर्धा परीक्षेचा एक भागच आहे असे मानून त्यामुळे हार न मानता पुन्हा जोमाने तयारी सुरू केली. चौथ्या प्रयत्नात कठोर मेहनतीला स्मार्ट वर्कची जोड देत अभ्यास केला. त्यामुळे थेट जिल्हाधिकारीपदी निवड झाल्याचे मयूर विकास सूर्यवंशी यांनी सांगितले. सध्या ओडिशा राज्यातील संबलपूर येथे ते उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

पुणे विद्यापीठातून बी. ई. (मेकॅनिकल)ची पदवी मिळवलेले मयूर सूर्यवंशी मूळचे जळगाव जिल्ह्यातील आहेत. आईवडील, शिक्षक असल्याने कायम त्यांचा पाठिंबा मिळाला. त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी पुणे आणि दिल्ली येथून केली आहे. वरिष्ठ अधिकारी मित्र, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आईवडिलांच्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळवल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

* परीक्षा पद्धत समजून घेऊन अभ्यासाचे नियोजन करा :

आयोगाने दिलेला अभ्यासक्रम सुरुवातीला समजून घ्या, गेल्या १० वर्षांतील पूर्व आणि मुख्य परीक्षेचे पेपर अभ्यासने, त्याचे आकलन करणे, वेळेचे अभ्यास सुरू करण्याआधी अचूक नियाेजन करणे, दिवसातून कमीत कमी १० तास अभ्यास करणे गरजेचे आहे. पूर्व परीक्षेवेळी कोणताही विषय वैकल्पिक (ऑप्शनलला) न टाकता संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, चालू घडामोडींचे आकलन व माहिती ठेवण्यासाठी कुरूक्षेत्र, योजना या मासिकांचा नियमित अभ्यास करावा, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी भरपूर सराव, कमीत कमी ५० पेपर तरी सोडवणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाची कमीत कमी ३ वेळी उजळणी करावी. विविध विषयांवर मित्रांबराेबर ग्रुप स्टडीमधून केलेला अभ्यास मुख्य परीक्षेला फायदेशीर ठरतो. स्वत:ची उत्तरे प्राध्यपकांकडून, मित्रांकडून तपासून घ्यावी, त्यात सुधारणा करणे. मागील वेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळा, योगा, ध्यान नियमितपणे करा, त्यातून मन एकाग्र होते अन् केलेल्या अभ्यास लक्षात राहतो. त्याचबरोबर सातत्य, चिकाटी आणि मेहनत ही त्रिसूत्री कायम लक्षात ठेवून वाटचाल केल्यास यश हमखाश मिळेल.

* सोशल मीडियाचा योग्य वापर करा :

यूपीएससीची तयारी करताना संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वेळेचे नियोजन म्हत्त्वाचे असते. त्यासाठी तुम्हाला इतर गोष्टींना मुरड घालावी लागते. सोशल मीडियाचा यासाठी जपून वापर करणे गरजेचे आहे. अभ्यास करताना आम्ही व्हॉटस्ॲपवर पूर्व, मुख्य आणि मुलाखतीच्या प्रत्येक टप्प्यावर विषयानुसार ग्रुप बनवले होते. त्या माध्यमातून शिक्षकांबरोबरच यशस्वी आणि सध्या कार्यरत असलेले अधिकारी आम्हाला या माध्यमातून सहज मार्गदर्शन करायचे. त्यामुळे कोणत्याही क्षणी काही अडचण आली की, या ग्रुपचा आम्हाला मोठा फायदा व्हायचा. लोकसभा व राज्यसभा वृत्तवाहिनीवरील विविध विषयांवरच्या चर्चाही ऐकल्यास त्याचाही फायदा होताे. त्यामुळे मी किंवा माझ्या सर्व मित्रांनी सोशल मीडियाचा विधायक वापर केल्याने आम्हाला त्याचा चांगला फायदा झाला आहे.

(फोटो : मयूर सूर्यवंशी आयएएस या नावाने आजच्या फोल्डरमध्ये टाकला आहे)