शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
4
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
5
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
6
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
7
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
8
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
9
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
10
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
11
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
12
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
13
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
14
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
15
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
16
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
18
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
19
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
20
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले

कठोर मेहनतीला स्मार्ट वर्कची जोड हवी : मयूर सूर्यवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:09 IST

(एकेक किरण तेजाचा लोगो) इन्ट्रो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत अपयश येऊनही न खचता, प्रत्येक प्रयत्नावेळी झालेल्या चुका सुधारून ...

(एकेक किरण तेजाचा लोगो)

इन्ट्रो

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत अपयश येऊनही न खचता, प्रत्येक प्रयत्नावेळी झालेल्या चुका सुधारून पुन्हा नव्याने तयारी केली. त्यामुळे पहिल्या दोन पूर्वपरीक्षेत अपयश आल्यानंतर, तिसऱ्या प्रयत्नात पूर्व, मुख्य परीक्षा पास करत थेट मुलाखतीपर्यंत झेप घेतली. मात्र, थोडक्यात पुन्हा संधी हुकली. अपयश हे स्पर्धा परीक्षेचा एक भागच आहे असे मानून त्यामुळे हार न मानता पुन्हा जोमाने तयारी सुरू केली. चौथ्या प्रयत्नात कठोर मेहनतीला स्मार्ट वर्कची जोड देत अभ्यास केला. त्यामुळे थेट जिल्हाधिकारीपदी निवड झाल्याचे मयूर विकास सूर्यवंशी यांनी सांगितले. सध्या ओडिशा राज्यातील संबलपूर येथे ते उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

पुणे विद्यापीठातून बी. ई. (मेकॅनिकल)ची पदवी मिळवलेले मयूर सूर्यवंशी मूळचे जळगाव जिल्ह्यातील आहेत. आईवडील, शिक्षक असल्याने कायम त्यांचा पाठिंबा मिळाला. त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी पुणे आणि दिल्ली येथून केली आहे. वरिष्ठ अधिकारी मित्र, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आईवडिलांच्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळवल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

* परीक्षा पद्धत समजून घेऊन अभ्यासाचे नियोजन करा :

आयोगाने दिलेला अभ्यासक्रम सुरुवातीला समजून घ्या, गेल्या १० वर्षांतील पूर्व आणि मुख्य परीक्षेचे पेपर अभ्यासने, त्याचे आकलन करणे, वेळेचे अभ्यास सुरू करण्याआधी अचूक नियाेजन करणे, दिवसातून कमीत कमी १० तास अभ्यास करणे गरजेचे आहे. पूर्व परीक्षेवेळी कोणताही विषय वैकल्पिक (ऑप्शनलला) न टाकता संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, चालू घडामोडींचे आकलन व माहिती ठेवण्यासाठी कुरूक्षेत्र, योजना या मासिकांचा नियमित अभ्यास करावा, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी भरपूर सराव, कमीत कमी ५० पेपर तरी सोडवणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाची कमीत कमी ३ वेळी उजळणी करावी. विविध विषयांवर मित्रांबराेबर ग्रुप स्टडीमधून केलेला अभ्यास मुख्य परीक्षेला फायदेशीर ठरतो. स्वत:ची उत्तरे प्राध्यपकांकडून, मित्रांकडून तपासून घ्यावी, त्यात सुधारणा करणे. मागील वेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळा, योगा, ध्यान नियमितपणे करा, त्यातून मन एकाग्र होते अन् केलेल्या अभ्यास लक्षात राहतो. त्याचबरोबर सातत्य, चिकाटी आणि मेहनत ही त्रिसूत्री कायम लक्षात ठेवून वाटचाल केल्यास यश हमखाश मिळेल.

* सोशल मीडियाचा योग्य वापर करा :

यूपीएससीची तयारी करताना संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वेळेचे नियोजन म्हत्त्वाचे असते. त्यासाठी तुम्हाला इतर गोष्टींना मुरड घालावी लागते. सोशल मीडियाचा यासाठी जपून वापर करणे गरजेचे आहे. अभ्यास करताना आम्ही व्हॉटस्ॲपवर पूर्व, मुख्य आणि मुलाखतीच्या प्रत्येक टप्प्यावर विषयानुसार ग्रुप बनवले होते. त्या माध्यमातून शिक्षकांबरोबरच यशस्वी आणि सध्या कार्यरत असलेले अधिकारी आम्हाला या माध्यमातून सहज मार्गदर्शन करायचे. त्यामुळे कोणत्याही क्षणी काही अडचण आली की, या ग्रुपचा आम्हाला मोठा फायदा व्हायचा. लोकसभा व राज्यसभा वृत्तवाहिनीवरील विविध विषयांवरच्या चर्चाही ऐकल्यास त्याचाही फायदा होताे. त्यामुळे मी किंवा माझ्या सर्व मित्रांनी सोशल मीडियाचा विधायक वापर केल्याने आम्हाला त्याचा चांगला फायदा झाला आहे.

(फोटो : मयूर सूर्यवंशी आयएएस या नावाने आजच्या फोल्डरमध्ये टाकला आहे)