शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कठोर मेहनतीला स्मार्ट वर्कची जोड हवी : मयूर सूर्यवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:09 IST

(एकेक किरण तेजाचा लोगो) इन्ट्रो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत अपयश येऊनही न खचता, प्रत्येक प्रयत्नावेळी झालेल्या चुका सुधारून ...

(एकेक किरण तेजाचा लोगो)

इन्ट्रो

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत अपयश येऊनही न खचता, प्रत्येक प्रयत्नावेळी झालेल्या चुका सुधारून पुन्हा नव्याने तयारी केली. त्यामुळे पहिल्या दोन पूर्वपरीक्षेत अपयश आल्यानंतर, तिसऱ्या प्रयत्नात पूर्व, मुख्य परीक्षा पास करत थेट मुलाखतीपर्यंत झेप घेतली. मात्र, थोडक्यात पुन्हा संधी हुकली. अपयश हे स्पर्धा परीक्षेचा एक भागच आहे असे मानून त्यामुळे हार न मानता पुन्हा जोमाने तयारी सुरू केली. चौथ्या प्रयत्नात कठोर मेहनतीला स्मार्ट वर्कची जोड देत अभ्यास केला. त्यामुळे थेट जिल्हाधिकारीपदी निवड झाल्याचे मयूर विकास सूर्यवंशी यांनी सांगितले. सध्या ओडिशा राज्यातील संबलपूर येथे ते उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

पुणे विद्यापीठातून बी. ई. (मेकॅनिकल)ची पदवी मिळवलेले मयूर सूर्यवंशी मूळचे जळगाव जिल्ह्यातील आहेत. आईवडील, शिक्षक असल्याने कायम त्यांचा पाठिंबा मिळाला. त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी पुणे आणि दिल्ली येथून केली आहे. वरिष्ठ अधिकारी मित्र, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आईवडिलांच्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळवल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

* परीक्षा पद्धत समजून घेऊन अभ्यासाचे नियोजन करा :

आयोगाने दिलेला अभ्यासक्रम सुरुवातीला समजून घ्या, गेल्या १० वर्षांतील पूर्व आणि मुख्य परीक्षेचे पेपर अभ्यासने, त्याचे आकलन करणे, वेळेचे अभ्यास सुरू करण्याआधी अचूक नियाेजन करणे, दिवसातून कमीत कमी १० तास अभ्यास करणे गरजेचे आहे. पूर्व परीक्षेवेळी कोणताही विषय वैकल्पिक (ऑप्शनलला) न टाकता संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, चालू घडामोडींचे आकलन व माहिती ठेवण्यासाठी कुरूक्षेत्र, योजना या मासिकांचा नियमित अभ्यास करावा, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी भरपूर सराव, कमीत कमी ५० पेपर तरी सोडवणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाची कमीत कमी ३ वेळी उजळणी करावी. विविध विषयांवर मित्रांबराेबर ग्रुप स्टडीमधून केलेला अभ्यास मुख्य परीक्षेला फायदेशीर ठरतो. स्वत:ची उत्तरे प्राध्यपकांकडून, मित्रांकडून तपासून घ्यावी, त्यात सुधारणा करणे. मागील वेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळा, योगा, ध्यान नियमितपणे करा, त्यातून मन एकाग्र होते अन् केलेल्या अभ्यास लक्षात राहतो. त्याचबरोबर सातत्य, चिकाटी आणि मेहनत ही त्रिसूत्री कायम लक्षात ठेवून वाटचाल केल्यास यश हमखाश मिळेल.

* सोशल मीडियाचा योग्य वापर करा :

यूपीएससीची तयारी करताना संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वेळेचे नियोजन म्हत्त्वाचे असते. त्यासाठी तुम्हाला इतर गोष्टींना मुरड घालावी लागते. सोशल मीडियाचा यासाठी जपून वापर करणे गरजेचे आहे. अभ्यास करताना आम्ही व्हॉटस्ॲपवर पूर्व, मुख्य आणि मुलाखतीच्या प्रत्येक टप्प्यावर विषयानुसार ग्रुप बनवले होते. त्या माध्यमातून शिक्षकांबरोबरच यशस्वी आणि सध्या कार्यरत असलेले अधिकारी आम्हाला या माध्यमातून सहज मार्गदर्शन करायचे. त्यामुळे कोणत्याही क्षणी काही अडचण आली की, या ग्रुपचा आम्हाला मोठा फायदा व्हायचा. लोकसभा व राज्यसभा वृत्तवाहिनीवरील विविध विषयांवरच्या चर्चाही ऐकल्यास त्याचाही फायदा होताे. त्यामुळे मी किंवा माझ्या सर्व मित्रांनी सोशल मीडियाचा विधायक वापर केल्याने आम्हाला त्याचा चांगला फायदा झाला आहे.

(फोटो : मयूर सूर्यवंशी आयएएस या नावाने आजच्या फोल्डरमध्ये टाकला आहे)