शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

आनंदी जीवनशैलीने मधुमेहमुक्ती शक्य

By admin | Updated: March 5, 2016 00:35 IST

‘मधुमेह हा रोग नसून, अभावग्रस्त शरीराची ती एक स्थिती आहे. व्यायाम, योगोपचार, आहार- विहार, आनंददायी जीवनशैली आणि आयुर्वेदाच्या साहाय्याने भारत मधुमेहमुक्त होऊ शकतो

चिंचवड : ‘‘मधुमेह हा रोग नसून, अभावग्रस्त शरीराची ती एक स्थिती आहे. व्यायाम, योगोपचार, आहार- विहार, आनंददायी जीवनशैली आणि आयुर्वेदाच्या साहाय्याने भारत मधुमेहमुक्त होऊ शकतो,’’ असे प्रतिपादन आयुर्वेदाचार्य डॉ. रवी आचार्य यांनी केले.शाहूनगर, चिंचवड येथील शिवशंभो फाउंडेशनच्या शिवशंभो व्याख्यानमालेत ‘मधुमेहमुक्त भारत’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी उमा खापरे, योगेश बाबर, भगवान पठारे, लक्ष्मण टक्केकर, संजय मंगुडकर, भावेन पाठक, प्रदीप साळुंखे, संजय तोरखडे उपस्थित होते.डॉ. आचार्य म्हणाले, ‘‘जागतिक मधुमेह दिनी १९९०मध्ये भारतात चार टक्के मधुमेही रुग्ण होते; गेल्या वर्षी हे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. जागतिकीकरणामुळे अनेक उपभोग्य वस्तूंची रेलचेल वाढली. जीवनशैलीत खूप मोठे बदल झाले. रात्री उशिरा पिझ्झा आणि शीतपेये असा आहार तरुण पिढी घेऊ लागली. कामातील प्रचंड ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेही तरुणांचा देश अशी भारताची ओळख निर्माण होईल की काय, अशी भीती आहे. मधुमेहाची कारणमीमांसा केल्यावर अनुवंशिकता, आहारातील अनियमितता, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव आणि जन्मजात मधुमेह ही मुख्य कारणे आढळतात. ड आणि ब-१२ जीवनसत्त्वाअभावी अशक्तपणा, थकवा जाणवतो आणि तीच मधुमेहाच्या संकटाची नांदी असते. ‘ड’ जीवनसत्त्वासाठी कोवळा सूर्यप्रकाश लाभदायक असतो. पहिल्या प्रहरी म्हणजेच पहाटे पाच ते सात दरम्यान किमान अर्धा तास पायी चालणे, १५ मिनिटे प्राणायाम, १५ मिनिटे सूर्यनमस्कार, अर्धा तास योगासने करावीत. आहाराच्या वेळा पाळाव्यात, असे ते म्हणाले. केशव घोळवे यांनी मनोगत व्यक्त केले. अजित भालेराव, राजेश हजारे, सुधीर झाडबुके, नलिनी इंगळकर, जनार्दन लोंढे, प्रकाश येवले, कैलाश पोखरकर यांनी संयोजन केले. सविता बारवकर यांनी सूत्रसंचालन केले. रेणुका हजारे यांनी आभार मानले. (वार्ताहर)