शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

आनंदी जीवनशैलीने मधुमेहमुक्ती शक्य

By admin | Updated: March 5, 2016 00:35 IST

‘मधुमेह हा रोग नसून, अभावग्रस्त शरीराची ती एक स्थिती आहे. व्यायाम, योगोपचार, आहार- विहार, आनंददायी जीवनशैली आणि आयुर्वेदाच्या साहाय्याने भारत मधुमेहमुक्त होऊ शकतो

चिंचवड : ‘‘मधुमेह हा रोग नसून, अभावग्रस्त शरीराची ती एक स्थिती आहे. व्यायाम, योगोपचार, आहार- विहार, आनंददायी जीवनशैली आणि आयुर्वेदाच्या साहाय्याने भारत मधुमेहमुक्त होऊ शकतो,’’ असे प्रतिपादन आयुर्वेदाचार्य डॉ. रवी आचार्य यांनी केले.शाहूनगर, चिंचवड येथील शिवशंभो फाउंडेशनच्या शिवशंभो व्याख्यानमालेत ‘मधुमेहमुक्त भारत’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी उमा खापरे, योगेश बाबर, भगवान पठारे, लक्ष्मण टक्केकर, संजय मंगुडकर, भावेन पाठक, प्रदीप साळुंखे, संजय तोरखडे उपस्थित होते.डॉ. आचार्य म्हणाले, ‘‘जागतिक मधुमेह दिनी १९९०मध्ये भारतात चार टक्के मधुमेही रुग्ण होते; गेल्या वर्षी हे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. जागतिकीकरणामुळे अनेक उपभोग्य वस्तूंची रेलचेल वाढली. जीवनशैलीत खूप मोठे बदल झाले. रात्री उशिरा पिझ्झा आणि शीतपेये असा आहार तरुण पिढी घेऊ लागली. कामातील प्रचंड ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेही तरुणांचा देश अशी भारताची ओळख निर्माण होईल की काय, अशी भीती आहे. मधुमेहाची कारणमीमांसा केल्यावर अनुवंशिकता, आहारातील अनियमितता, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव आणि जन्मजात मधुमेह ही मुख्य कारणे आढळतात. ड आणि ब-१२ जीवनसत्त्वाअभावी अशक्तपणा, थकवा जाणवतो आणि तीच मधुमेहाच्या संकटाची नांदी असते. ‘ड’ जीवनसत्त्वासाठी कोवळा सूर्यप्रकाश लाभदायक असतो. पहिल्या प्रहरी म्हणजेच पहाटे पाच ते सात दरम्यान किमान अर्धा तास पायी चालणे, १५ मिनिटे प्राणायाम, १५ मिनिटे सूर्यनमस्कार, अर्धा तास योगासने करावीत. आहाराच्या वेळा पाळाव्यात, असे ते म्हणाले. केशव घोळवे यांनी मनोगत व्यक्त केले. अजित भालेराव, राजेश हजारे, सुधीर झाडबुके, नलिनी इंगळकर, जनार्दन लोंढे, प्रकाश येवले, कैलाश पोखरकर यांनी संयोजन केले. सविता बारवकर यांनी सूत्रसंचालन केले. रेणुका हजारे यांनी आभार मानले. (वार्ताहर)