शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या हातात पुन्हा आली पाटीपेन्सिल!

By admin | Updated: January 1, 2017 04:31 IST

विद्येविना मती गेली.. मतीविना नीती गेली... नीतीविना गती गेली... गतिविना वित्त गेले... वित्ताविना शूद्र खचले... इतके अनर्थ एका अविद्येने केले...’ हे महात्मा ज्योतिबा

बारामती : ‘विद्येविना मती गेली.. मतीविना नीती गेली... नीतीविना गती गेली... गतिविना वित्त गेले... वित्ताविना शूद्र खचले... इतके अनर्थ एका अविद्येने केले...’ हे महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार आजही लागू पडतात. येथील शारदानगर शैक्षणिक संकुलाच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी आणि त्यांच्या शारदा निकेतनमधील शिक्षकांनी ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा निरंतन वसा घेतला. मागील तीन वर्षापासून आलेल्या कामगारांच्या मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्याचा उपक्रम या वंचित मुलांना शिक्षणाची गोडी लावणारा ठरला आहे. बारामती तालुक्यात माळेगाव, सोमेश्वर, छत्रपती हे साखर कारखाने आहेत. दर वर्षीच्या गळीत हंगामासाठी मोठ्या प्रमाणात बीड, उस्मानाबाद, नगर आदी भागातील ऊसतोडणी कामगार मुलाबाळांसह कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात दाखल होतात. काही वर्षांपूर्वी स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने साखरशाळा सुरू केल्या. आता या साखरशाळा अभावानेच दिसत आहेत. काही ठिकाणी त्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून आलेला विद्यार्थी पुढे ऊसतोडणी कामगारच होणार का, असा प्रश्न निर्माण झाला. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले पाहिजे, सर्वांना मोफत शिक्षण सक्तीचे केले पाहिजे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील सांगितले; परंतु अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. ऊसतोडणी कामगारांची मुले तर ऐन कडाक्याच्या थंडीत आई-वडिलांबरोबर कारखान्यांवर दाखल झालेली असतात. ‘साखरशाळा’ बंद झाल्यामुळे मुलांचे शिक्षण अर्धवट राहते ही बाब सुनंदा पवार यांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्यांच्या शैक्षणिक संकुलातील शारदाबाई पवार विद्यानिकेतनचे प्राचार्य सूर्यकांत मुंढे, समन्वयक प्रल्हाद जाधव, शिक्षक विजयसिंह घाडगे यांना शाळेपासून वंचित राहिलेल्या कामगारांच्या मुलांचा सर्व्हे थेट कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जाऊन करण्यास सांगितले. २०१४ पासून गळीत हंगामात ऊसतोडणीसाठी आलेल्या कुटुंबांचा सर्व्हे केला जातो. त्यामुळे अर्धवट शाळा सोडून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. मोफत शिक्षण दिले जाते. कामगारांची मुले शिक्षणासाठी येण्यासाठी उत्सुक नसतात. त्यामुळे त्यांना ने-आण करण्यासाठी गाडीची सोय केली. शाळेतील मुले, मुली या विद्यार्थ्यांना सामावून घेतात. साधारणत: चार महिने ही सोय केली जाते, असे प्राचार्य सूर्यकांत मुंढे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नव्या वर्षाचे आगळेवेगळे स्वागत...या वर्षी १४ मुलांची सोय करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना नव्या वर्षाची भेट म्हणून इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कपडे, खाऊ देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. ऊसतोडणी कामगारांची मुले प्रोजेक्टरसह अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे खरोखरच ‘वंचितां’च्या मुलांना शिक्षणाची गोडी लावण्याचा केलेला प्रयोग नव्या पिढीला दिशादर्शक आहे.