शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या हातात पुन्हा आली पाटीपेन्सिल!

By admin | Updated: January 1, 2017 04:31 IST

विद्येविना मती गेली.. मतीविना नीती गेली... नीतीविना गती गेली... गतिविना वित्त गेले... वित्ताविना शूद्र खचले... इतके अनर्थ एका अविद्येने केले...’ हे महात्मा ज्योतिबा

बारामती : ‘विद्येविना मती गेली.. मतीविना नीती गेली... नीतीविना गती गेली... गतिविना वित्त गेले... वित्ताविना शूद्र खचले... इतके अनर्थ एका अविद्येने केले...’ हे महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार आजही लागू पडतात. येथील शारदानगर शैक्षणिक संकुलाच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी आणि त्यांच्या शारदा निकेतनमधील शिक्षकांनी ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा निरंतन वसा घेतला. मागील तीन वर्षापासून आलेल्या कामगारांच्या मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्याचा उपक्रम या वंचित मुलांना शिक्षणाची गोडी लावणारा ठरला आहे. बारामती तालुक्यात माळेगाव, सोमेश्वर, छत्रपती हे साखर कारखाने आहेत. दर वर्षीच्या गळीत हंगामासाठी मोठ्या प्रमाणात बीड, उस्मानाबाद, नगर आदी भागातील ऊसतोडणी कामगार मुलाबाळांसह कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात दाखल होतात. काही वर्षांपूर्वी स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने साखरशाळा सुरू केल्या. आता या साखरशाळा अभावानेच दिसत आहेत. काही ठिकाणी त्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून आलेला विद्यार्थी पुढे ऊसतोडणी कामगारच होणार का, असा प्रश्न निर्माण झाला. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले पाहिजे, सर्वांना मोफत शिक्षण सक्तीचे केले पाहिजे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील सांगितले; परंतु अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. ऊसतोडणी कामगारांची मुले तर ऐन कडाक्याच्या थंडीत आई-वडिलांबरोबर कारखान्यांवर दाखल झालेली असतात. ‘साखरशाळा’ बंद झाल्यामुळे मुलांचे शिक्षण अर्धवट राहते ही बाब सुनंदा पवार यांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्यांच्या शैक्षणिक संकुलातील शारदाबाई पवार विद्यानिकेतनचे प्राचार्य सूर्यकांत मुंढे, समन्वयक प्रल्हाद जाधव, शिक्षक विजयसिंह घाडगे यांना शाळेपासून वंचित राहिलेल्या कामगारांच्या मुलांचा सर्व्हे थेट कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जाऊन करण्यास सांगितले. २०१४ पासून गळीत हंगामात ऊसतोडणीसाठी आलेल्या कुटुंबांचा सर्व्हे केला जातो. त्यामुळे अर्धवट शाळा सोडून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. मोफत शिक्षण दिले जाते. कामगारांची मुले शिक्षणासाठी येण्यासाठी उत्सुक नसतात. त्यामुळे त्यांना ने-आण करण्यासाठी गाडीची सोय केली. शाळेतील मुले, मुली या विद्यार्थ्यांना सामावून घेतात. साधारणत: चार महिने ही सोय केली जाते, असे प्राचार्य सूर्यकांत मुंढे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नव्या वर्षाचे आगळेवेगळे स्वागत...या वर्षी १४ मुलांची सोय करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना नव्या वर्षाची भेट म्हणून इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कपडे, खाऊ देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. ऊसतोडणी कामगारांची मुले प्रोजेक्टरसह अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे खरोखरच ‘वंचितां’च्या मुलांना शिक्षणाची गोडी लावण्याचा केलेला प्रयोग नव्या पिढीला दिशादर्शक आहे.